एक्स्प्लोर

फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनाचं संकट आटोक्यात, सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीचा दावा

या समितीच्या दाव्यानुसार, भारतात कोरोनाबाधितांचा संख्या एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त होणार नाह. सध्या भारतात कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांहून अधिक आहे.

नवी दिल्ली : भारतातील कोरोना व्हायरस महामारीचं संकट सर्वोच्च पातळीवर जाऊन आलं आहे आणि आणि कोरोनाचं संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे. यावर सरकारने नेमलेल्या वैज्ञानिकांची समितीचा दावा आहे की, कोरोना महामारी फेब्रुवारी 2021 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, भारतात कोरोनाबाधितांचा संख्या एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त होणार नाह. सध्या भारतात कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांहून अधिक आहे. एका इंग्रजी वृत्तापत्राला दिलेल्या माहिती या समितीने म्हटलं की, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी घेत असलेल्या उपाययोजना सुरू ठेवल्या पाहिजेत.

लॉकडाऊन नसतं तर 25 लाखांहून अधिक मृत्यू झाले असते

सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. आयआयटी हैदराबादचे प्रमुख विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या मते, जर मार्चमध्ये भारताने लॉकडाऊन लागू केले नसते तर देशभरात 25 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असता. आतापर्यंत या साथीच्या आजारामुळे 1 लाख 14 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम

निती आयोगाचे सदस्य आणि कोविड तज्ज्ञ पॅनेलचे प्रमुख डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांत नवीन कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यूंचं घटलं आहे. मात्र हिवाळ्यात भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची लस एकदा आली की ती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत. भारत आता चांगल्या स्थितीत आला आहे, परंतु अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण 90 टक्के लोकांना आताही कोरोनाची लागण सहज होऊ शकते.

भारतातील सक्रीय रूग्णांच्या संख्येत सतत घट होत असल्याची नोंद झाली असुन सलग दुसऱ्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा कमी म्हणजे 7,83,311इतकी आढळली. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एकूण पॉझिटीव्ह रूग्णांच्या 10.45 टक्के इतकी आहे. आतापर्यंत एकूण 65,97,209 रूग्ण बरे झाले आहेत. मुक्त होणाऱ्या तसेच सक्रीय रूग्ण संख्येतील अंतर वाढून 58 लाखांच्या (58,13,898 )वर गेले आहे .देशात रुग्ण बरे होण्याचा दर वाढून आता तो 88.03 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत 72,614 कोविड रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर 61,871नवीन रूग्ण आढळले आहेत. नवीन बरे झालेल्या रूग्णांपैकी 79%रूग्ण 10 राज्ये /केंद्रशासित प्रदेशात एकत्रित आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवशी, 14000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून, रूग्ण बरे होण्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Election Age Limit 21 : Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव आणणार
Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव आणणार
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget