एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Lockdown | लॉकडाऊनची झळ ग्रामीण भागातही; 24 टक्के लोकं अर्धपोटी : सर्व्हे

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशातील सिव्हिल सोसायटी संस्थांनी 12 राज्यांमधील 5000 ग्रामीण कुटुंबांचा सर्व्हे केला. सर्व्हेमधून वेगवेगळे निष्कर्ष समोर आले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन लागू करण्यात आला असून 17 मे रोजी या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन वाढणार असून 17 मेनंतर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार असल्याची घोषणा काल (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. परंतु, या देशव्यापी लॉकडाऊनचा लोकांवर काय परिणाम झाला आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात आलाच असेल. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी देशातील सिव्हिल सोसायटी संस्थांनी 12 राज्यांमधील 5000 ग्रामीण कुटुंबांचा सर्व्हे केला. सर्व्हेमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, या कठिण काळाशी दोन हात करण्यासाठी या कुटुंबांमधील अर्ध्या व्यक्ती गरजेपेक्षा कमी जेवत आहेत.

68 टक्के कुटुंबांचं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या जेवणातील खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे. 50 टक्के कुटुंबियांनी सांगितलं की, 'ते एका दिवसात जेवढ्या वेळा जेवत होते, आता त्यापेक्षा कमी वेळा जेवत आहेत. तर 24 टक्के कुटुंबांनी उधारीवर उदरनिर्वाह करत असल्याचं सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ : केंद्रीय नितीन गडकरी यांच्याकडून Atmanirbhar Bharat Abhiyan योजनेचं कौतुक

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सर्व्हेमधील 84 टक्के कुटुंबियांचं म्हणणं आहे की, त्यांनी पीडीएसमार्फत राशन खरेदी केलं आहे. 16 टक्के कुटुंबांना पोटभर जेवणंही नशीबात नाही. देशात लॉकडाऊन लागू केल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेक लोकांच्या हाताला काम नाही. काम नाही, खिशात पैसे नाहीत. त्यामुळे देशभरातील अनेक लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जेवणाची भ्रांत आहे. याची झळ ग्रामीण भागातही दिसून येत आहे.

12 राज्य, 47 जिल्हे, 5162 कुटुंब

देशांतील 12 राज्यांच्या 47 जिल्ह्यांमधील 5162 ग्रामीण कुटुंबांमध्ये हा सर्वे करण्यात आला. मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, आसाम आणि कर्नाटकात 28 एप्रिलपासून 2 मे दरम्यान, हा सर्वे करण्यात आला.

केंद्र सरकारने देशाचा करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. तसेच देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 हजारांच्या पार गेला आहे. तर 2415 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 24 हजार 386 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

देशात गेल्या 24 तासांत 122 लोकांचा मृत्यू, एका दिवसात सर्वाधिक 1931 रुग्ण कोरोनामुक्त

पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर पॅकेजवरुन काँग्रेसमध्ये वेगवेगळी मतं, काही नेत्यांचा विरोध तर काहींकडून कौतुक

पंतप्रधान मोदींकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा, नियमांचा तपशील 18 मे पूर्वी जाहीर होणार

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरतीMumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावलेAbu Azmi On BJP | वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीकाGulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Embed widget