एक्स्प्लोर

Lockdown | लॉकडाऊनची झळ ग्रामीण भागातही; 24 टक्के लोकं अर्धपोटी : सर्व्हे

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशातील सिव्हिल सोसायटी संस्थांनी 12 राज्यांमधील 5000 ग्रामीण कुटुंबांचा सर्व्हे केला. सर्व्हेमधून वेगवेगळे निष्कर्ष समोर आले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन लागू करण्यात आला असून 17 मे रोजी या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन वाढणार असून 17 मेनंतर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार असल्याची घोषणा काल (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. परंतु, या देशव्यापी लॉकडाऊनचा लोकांवर काय परिणाम झाला आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात आलाच असेल. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी देशातील सिव्हिल सोसायटी संस्थांनी 12 राज्यांमधील 5000 ग्रामीण कुटुंबांचा सर्व्हे केला. सर्व्हेमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, या कठिण काळाशी दोन हात करण्यासाठी या कुटुंबांमधील अर्ध्या व्यक्ती गरजेपेक्षा कमी जेवत आहेत.

68 टक्के कुटुंबांचं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या जेवणातील खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे. 50 टक्के कुटुंबियांनी सांगितलं की, 'ते एका दिवसात जेवढ्या वेळा जेवत होते, आता त्यापेक्षा कमी वेळा जेवत आहेत. तर 24 टक्के कुटुंबांनी उधारीवर उदरनिर्वाह करत असल्याचं सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ : केंद्रीय नितीन गडकरी यांच्याकडून Atmanirbhar Bharat Abhiyan योजनेचं कौतुक

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सर्व्हेमधील 84 टक्के कुटुंबियांचं म्हणणं आहे की, त्यांनी पीडीएसमार्फत राशन खरेदी केलं आहे. 16 टक्के कुटुंबांना पोटभर जेवणंही नशीबात नाही. देशात लॉकडाऊन लागू केल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेक लोकांच्या हाताला काम नाही. काम नाही, खिशात पैसे नाहीत. त्यामुळे देशभरातील अनेक लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जेवणाची भ्रांत आहे. याची झळ ग्रामीण भागातही दिसून येत आहे.

12 राज्य, 47 जिल्हे, 5162 कुटुंब

देशांतील 12 राज्यांच्या 47 जिल्ह्यांमधील 5162 ग्रामीण कुटुंबांमध्ये हा सर्वे करण्यात आला. मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, आसाम आणि कर्नाटकात 28 एप्रिलपासून 2 मे दरम्यान, हा सर्वे करण्यात आला.

केंद्र सरकारने देशाचा करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. तसेच देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 हजारांच्या पार गेला आहे. तर 2415 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 24 हजार 386 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

देशात गेल्या 24 तासांत 122 लोकांचा मृत्यू, एका दिवसात सर्वाधिक 1931 रुग्ण कोरोनामुक्त

पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर पॅकेजवरुन काँग्रेसमध्ये वेगवेगळी मतं, काही नेत्यांचा विरोध तर काहींकडून कौतुक

पंतप्रधान मोदींकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा, नियमांचा तपशील 18 मे पूर्वी जाहीर होणार

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Maharashtra Live blog updates: सांगलीच्या इस्लापुरमध्ये मध्यरात्री पाच दुकानांना लागली आग
Maharashtra Live blog updates: सांगलीच्या इस्लापुरमध्ये मध्यरात्री पाच दुकानांना लागली आग
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
Embed widget