एक्स्प्लोर

Coronavirus | सरकार म्हणतं देशात कोरोना स्थिती उत्तम; तर जगभरातील 40 टक्के नवे रुग्ण भारतातून WHO चा दावा

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचे जवळपास 92 टक्के माइल्ड केस आहेत. त्यापैकी केवळ 5.8 टक्के रुग्णांमध्ये ऑक्सिजन थेरपीचा वापर करण्यात आला. तर केवळ 1.7 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासली.

नवी दिल्ली : भारतात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, जगभरात एका दिवसांत समोर येणाऱ्या नव्या कोरोना बाधितांच्या आकड्यापैकी 40 टक्के रुग्ण भारतातील आहेत. तसेच भारतातील मृतांचा आकडाही एका दिवसांत जगभरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या एकूण आकड्यापैकी 26 टक्के आहे. परंतु, संसदेच्या अधिवेशनादरम्यान सरकारच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत कोरोनाच्या प्रादुर्भावाची आकडेवारी सादर केली. त्यावेळी ते म्हणाले की, 11 सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाचे एकूण 45 लाख 62 हजार रुग्ण होते आणि 76 हजार 271 लोकांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.67 टक्के एवढा होता. तर जगभरातील मृत्यूदर 3.2 टक्के एवढा होता. तोपर्यंत देशात 35 लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले होते.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचे जवळपास 92 टक्के माइल्ड केस आहेत. त्यापैकी केवळ 5.8 टक्के रुग्णांमध्ये ऑक्सिजन थेरपीचा वापर करण्यात आला. तर केवळ 1.7 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासली.

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती उत्तम

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारत प्रति 10 लाख लोकसंख्येपैकी सरासरी कोरोना रुग्ण आणि मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यास यशस्वी झाला आहे. देशात प्रति 10 लाख लोकसंख्येपैकी सरासरी 3328 कोरोना बाधित आणि 55 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा कोरोनाने प्रभावित झालेल्या आपल्यासारख्या दुसऱ्या देशांपैकी अत्यंत कमी आहे.'

काही अशी राज्य आहेत, जिथे कोरोचा प्रादुर्भाव वाढला आहे. सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तमिळनाडु, केरल, कर्नाटक, तेलंगाना, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांत एक लाखांहून अधिक कोरोना बाधितांची संख्या आहे.

सरकारचं म्हणणं आहे की, आधी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे देशाला मोठा फायदा झाला आहे. लॉकडाऊन लागू केल्यामुळे 14-29 लाख लोकांचा कोरोनापासून बचाव झाला आहे. लॉकडाऊन लागू केला नसता तर आणखी 37 ते 78 हजार लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget