एक्स्प्लोर

Coronavirus | सरकार म्हणतं देशात कोरोना स्थिती उत्तम; तर जगभरातील 40 टक्के नवे रुग्ण भारतातून WHO चा दावा

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचे जवळपास 92 टक्के माइल्ड केस आहेत. त्यापैकी केवळ 5.8 टक्के रुग्णांमध्ये ऑक्सिजन थेरपीचा वापर करण्यात आला. तर केवळ 1.7 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासली.

नवी दिल्ली : भारतात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, जगभरात एका दिवसांत समोर येणाऱ्या नव्या कोरोना बाधितांच्या आकड्यापैकी 40 टक्के रुग्ण भारतातील आहेत. तसेच भारतातील मृतांचा आकडाही एका दिवसांत जगभरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या एकूण आकड्यापैकी 26 टक्के आहे. परंतु, संसदेच्या अधिवेशनादरम्यान सरकारच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत कोरोनाच्या प्रादुर्भावाची आकडेवारी सादर केली. त्यावेळी ते म्हणाले की, 11 सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाचे एकूण 45 लाख 62 हजार रुग्ण होते आणि 76 हजार 271 लोकांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.67 टक्के एवढा होता. तर जगभरातील मृत्यूदर 3.2 टक्के एवढा होता. तोपर्यंत देशात 35 लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले होते.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचे जवळपास 92 टक्के माइल्ड केस आहेत. त्यापैकी केवळ 5.8 टक्के रुग्णांमध्ये ऑक्सिजन थेरपीचा वापर करण्यात आला. तर केवळ 1.7 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासली.

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती उत्तम

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारत प्रति 10 लाख लोकसंख्येपैकी सरासरी कोरोना रुग्ण आणि मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यास यशस्वी झाला आहे. देशात प्रति 10 लाख लोकसंख्येपैकी सरासरी 3328 कोरोना बाधित आणि 55 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा कोरोनाने प्रभावित झालेल्या आपल्यासारख्या दुसऱ्या देशांपैकी अत्यंत कमी आहे.'

काही अशी राज्य आहेत, जिथे कोरोचा प्रादुर्भाव वाढला आहे. सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तमिळनाडु, केरल, कर्नाटक, तेलंगाना, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांत एक लाखांहून अधिक कोरोना बाधितांची संख्या आहे.

सरकारचं म्हणणं आहे की, आधी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे देशाला मोठा फायदा झाला आहे. लॉकडाऊन लागू केल्यामुळे 14-29 लाख लोकांचा कोरोनापासून बचाव झाला आहे. लॉकडाऊन लागू केला नसता तर आणखी 37 ते 78 हजार लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget