एक्स्प्लोर

उत्तर भारतात थंडीचा कहर; अनेक ठिकाणी तापमान उणे, जम्मू काश्मीरमध्ये 23 वर्षाचा विक्रम मोडला

सध्या उत्तर भारत चांगलाच गारठला आहे. अनेक ठिकाणी तापमान हे उणे झाले आहे. अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली असून, रस्ते धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना अडचणी येत आहेत.

Temperature in India: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. अनेक ठिकाणी पर्वतांवर बर्फवृष्टी देखील सुरू आहे. राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये तापमान उणे झाले आहे. राजस्थानमधील फतेहपुर येथे प्रथमच तापमान हे उणे 5.2 वर पोहोचले आहे. तसेच अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली असून, रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना अडचणी येत आहेत. तापमान हे उणे झाल्यामुळे पाण्याचा बर्फ होत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीबरोबरच पंजाब, हरियणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये तापमान उणे झाले आहे. दिल्लीमध्ये किमान तापमान हे 3.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर कमाल तापमान हे 21 डिग्री सेल्सिअस असल्याची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे दिल्लीमध्ये प्रदुषणाची पातळी वाढत असतानाचं, नागरिकांना कडाक्याच्या थंडीला देखील सामोर जावं लागत आहे. महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. खासकरुन विदर्भात थंडीची जोरदार लाट आहे. नागपुरात किमान तापमान हे 7.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने आणखी थंडी वाढण्याचा इशारा दिला आहे.

 

उत्तर भारतात थंडीचा कहर; अनेक ठिकाणी तापमान उणे, जम्मू काश्मीरमध्ये 23 वर्षाचा विक्रम मोडला

उत्तर काशीतील उंच भागात तर थंडीने कहरच केला आहे. उंचावरील हर्षिल, सुखी टॉप, मुखवा, गंगोत्री या भागात तापमान हे उणे 0 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्याच्या पाईमध्ये बर्फ झाला होता, एवढी थंडीची लाट येथे आली आहे. उष्णतेसाठी ओळखले जाणारे राजस्थानमध्ये जोराची थंडी आहे. तेथील झाडांवर बर्फवृष्टी झाल्याचे चित्र आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पारा उणेपर्यंत पोहोचला आहे. शेतातील पिकांवर बर्फाची चादर पसरल्याचे दिसत आहे. सीकरमधील तापमान हे उणे 2.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. फतेहपूर शेखावती येथील थंडीने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्यांदाच पारा उणे 5 अंशांच्या खाली पोहोचला. याआधी सर्वात थंड दिवस हा 30 डिसेंबर 2014 रोजी उणे 4.6 इतका नोंदवला होता. मात्र, यावेळी तापमान उणे 5.2 वर पोहोचले आहे.

वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांना अडचणी
एवढ्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकर्‍यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यांना पिकांना पाणी देखील देता येत नाही. कारण पाण्याच्या पाईपलाईनमध्ये देखील बर्फ पडला आहे. पाईपच्या आतील पाणी आणि पाईपच्या वरचा बर्फ देखील गोठलेला आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये थंडीने 23 वर्षाचा विक्रम मोडला
लडाखमध्ये थंडीमध्ये नदीचे पाणी देखील गोठले आहे. नदीवर नजर जाईल तिथपर्यंत फक्त बर्फच दिसत आहे. गोठलेली नदी दिसायला खूप छान दिसते, पण इथे राहणाऱ्या लोकांसाठी ही एक मोठी समस्या आहे. सर्वात मोठी समस्या ही पिण्याच्या पाण्याची निर्माण झाली आहे. याशिवाय जेवण तयार करतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे कामांना विलंब होत आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही वाढले असून, नागरिकांना तोटा सहन करावा लागत आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 23 वर्षाचा थंडीचा विक्रम मोडला आहे. थंडीमुळे दाट धुके परसले असल्याने लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. तिथे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबादचे तापमानही 0.5 अंशावर पोहोचले आहे. मध्यप्रदेशातील रायसेनचे तापमान 2.5 अंशांवर  पोहोचले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget