एक्स्प्लोर

मोदीजी ने मेरा 'सिंदूर' मुझे लौटा दिया; BSF जवानाची पत्नी भावूक, पतीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद

माझे पती पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या वृत्तपासून आम्ही काळजीत होतो. केंद्र सरकारपासून सगळ्यांचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा राहिला, संपूर्ण देश आमच्यासोबत उभा होता

नवी दिल्ली : एकीकडे भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे भारतीय सैन्य दलाच्य बीएएसएफ (BSF) तुकडीतील जवाने सीमारेषा ओलांडत पाकिस्तानात प्रवेश केला होता. गेल्या 22 दिवसांपासून पाकिस्तानच्या तावडीत असलेल्या जवान पी.के.साहू यांना पाकिस्तानने आज भारताच्या स्वाधीन केल्यानंतर साहू यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत देशवासीयांचे आभार मानले. साहू यांच्या पत्नी रजनी यांनी माध्यमांशी बोलताना घटनाक्रम उगडला. तसेच, सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा आम्हाला सकाळी फोन आला, त्यांनीची ही गुडन्यूज दिल्याचे त्यांनी म्हटले. या कठिण परिस्थिती सैन्यातील अधिकारी, सरकार आणि देशावासीय आमच्या पाठीशी उभे होते, त्या सर्वांचे मी आभार मानते. मोदीजी (Narendra modi) ने मेरा सिंदूर मुझे लौटा दिया, अशा शब्दात हात जोडून रजनी यांनी केद्र सरकारचे आभार मानले आहेत. 

माझे पती पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या वृत्तपासून आम्ही काळजीत होतो. केंद्र सरकारपासून सगळ्यांचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा राहिला, संपूर्ण देश आमच्यासोबत उभा होता. मोदी आहेत तर सर्वकाही शक्य आहे. 22 एप्रिल रोजी आपल्या पहलगाममध्ये दहशवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर, 15 ते 20 दिवसांत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या महिला भगिनींचं कुंकू पुसलं, त्याचा बदला आपण घेतला. मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव या मिशना दिलं होतं, आता माझं कुंकू मला परत मिळवून दिलंय. मोदीजीने मेरा सिंदूर मुझे लौटा दिया.. अशा शब्दात पाकिस्तानातून भारतात परतलेल्या बीएएसएफ जवानाच्या पत्नीने भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, माझ्या पतीसोबत माझं व्हिडिओ कॉलवरुन संभाषण झालं, ते ठीक आहेत. 22 दिवस पाकिस्तानच्या तावडीत अडकल्याने काही प्रमाणात विकनेस आला असेल, पण त्यांची प्रकृती ठीक आहेत. लवकरच ते घरी येतील, असा विश्वासही रजनी शॉ यांनी व्यक्त केला. 

23 एप्रिल रोजी बॉर्डर क्रॉस

भारत-पाक सीमारेषेवर शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे दोन जवान तैनात केले होते. फिरोजपूरमध्ये 23 एप्रिलला जवान पी.के. शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती. ही गोष्ट पाकिस्तानी सैन्याच्या लक्षात आल्यानंतर पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सगळी शस्त्रात्रं जप्त करुन पाकिस्तानने गेल्या 22 दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवले होते. अखेर आज मायभूमीत त्यांचं आगमन झाल्याने देशवासीयांनी आनंद व्यक्त केला. तर, शॉ कुटुंबीयांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले होते. 

जवान पाकिस्तानात कसा पोहोचला?

नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिला जाते. पी.के. शॉ  यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी फिरोजपूर येथे तैनात करण्यात आले होते. पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. 23 एप्रिलला सकाळी सकाळी शेतकरी कंबाइन घेऊन फेंसिंगवरील गेट नंबर-208/1 च्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते. पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावलेली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन पी.के. शॉ  ऊन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले होते. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफचे जवान पी.के. शॉ  यांना ताब्यात घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर भारताने पी.के. शॉ  यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी पी.के. शॉ  यांची सुटका होऊ शकली नव्हती.

हेही वाचा

तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; पक्ष सोडणार का, नाराज दूर झाली का? स्पष्टच शब्दात सांगितलं

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
Ladki Bahin Yojana EKYC : दररोज 4  ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींनी केली ई-केवायसी, मुदतवाढ मिळणार का?
दररोज 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींनी केली ई-केवायसी, मुदतवाढ मिळणार का?
Embed widget