एक्स्प्लोर

रोहतक: शेतकऱ्यांकडून भाजप नेते ओलीस; काही तासानंतर झाली सुटका

Farmers BJP Leaders : तीन कृषी कायद्याच्या मुद्यावरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धार कमी होण्याची चिन्हं नाहीत. रोहतकमध्ये शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांना ओलीस ठेवले.

Farmers Kidnap BJP Leaders: केदारनाथ येथे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांना शेतकऱ्यांनी ओलीस ठेवले. रोहतक येथील किलोई गावातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री मनीष ग्रोवर आणि अन्य नेत्यांना शेतकऱ्यांनी ओलीस ठेवले. इतकंच नव्हे तर या शेतकऱ्यांनी मंदिराबाहेर असणाऱ्या भाजप नेत्यांच्या वाहनांच्या टायरमधील हवा काढली होती. शेतकऱ्यांचा विरोध पाहता मोठ्या प्रमाणावर पोलीस दाखल झाले होते. अखेर काही तासांनी भाजप नेत्यांची सुखरूप सुटका झाली. 

भाजप नेत्यांना पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांनी टीव्ही प्रसारणात अडथळे आणले. संयुक्त किसान मोर्चाने भाजप आणि जेपीपी नेत्यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार हा विरोध करण्यात आला असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमांना विरोध सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. रोहतक जिल्ह्यातील किलोई गावातील प्राचीन शिव मंदिरात भाजप नेत्यांना शेतकऱ्यांनी ओलीस ठेवले होते. 

शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांना ओलीस ठेवल्याची बातमी समजताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर काही तासानंतर सर्व भाजप नेत्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. शेतकऱ्यांनी यावेळी भाजप नेत्यांवरही टीका केली. देशाचे पंतप्रधान आणि भाजप नेत्यांकडून धर्माच्या नावावर लोकांमध्ये तणाव निर्माण करण्याचे काम करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना हा कुटिल डाव लक्षात आला आहे. भाजप नेते मंदिर, धर्मशाळेत भेटी देत आहेत. तर, शेतकऱ्यांना धान्य विकण्यासाठी बाजारात हेलपाटे घालावे लागत आहे. 

उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूजा-दर्शनसह जवळपास 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन, लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. हा सोहळा सुरू असताना देशभरातील शिव मंदिरात भाजपकडून थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. 

संबंधित वृत्त : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथांच्या चरणी, 400 कोटींच्या योजनांसह शंकराचार्यांच्या मूर्तीचं केलं अनावरण

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget