एक्स्प्लोर

Chhattisgarh Maoist Attack | बिजापूर चकमक हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही, नक्षलविरोधी अभियान सुरुच राहणार : मुख्यमंत्री बघेल

छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. परंतु यात गुप्तचर यंत्रणेचं अपयश नसल्याचं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितलं. तसंच नक्षलविरोधी अभियान सुरुच राहिल असंही ते म्हणाले.

रायपूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत, त्यापैकी 17 जवानांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत. यंदाच्या वर्षातील नक्षलवाद्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. या संपूर्ण घटनेवर आसामहून रायपूरला परतल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं की, "जवानांचं मनोधैर्य उंचावलेलं असून नक्षलविरोधी अभियान सुरुच राहिल. तसंच गुप्तचर यंत्रणेवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, बिजापूर-सुकमा एन्काऊंटर हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही." ते पुढे म्हणाले की, "आमचे जवान लढाईत शहीद झाले आहेत, पण त्यांनी धैर्याने लढाई लढली. मी त्यांच्या वीरमरणाला नमन करतो. नक्षलवादी आपली अखेरची लढाई लढत आहेत, लवकरच त्यांचा खात्मा केला जाईल."

"चकमक ज्या ठिकाणी झाली तो नक्षलवाद्यांचा गड समजला जोता. आम्ही तिथे सुरक्षा दलाद्वारे कॅम्प लावण्याची योजना आखली होती. जवळपास 2000 सैनिकांना त्या क्षेत्रात शिबीर लावण्यासाठी पाठवलं होतं. यामुळे नक्षलवादी चळवळीला प्रतिबंध लागणार होता, त्यामुळे ते चवताळले होते. हे कुठलंही गुप्तचर यंत्रणेचं अपयश नव्हतं. आम्ही नक्कीच तिथे पुन्हा एकदा कॅम्प लावणार आणि नक्षलविरोधी अभियान सुरु ठेवणार आहोत," असं मुख्यमंत्री भूपेश बघेल स्पष्ट केलं.

नक्षलवाद्यांचं किती नुकसान झालं?
"आम्हाला माहिती मिळाली आहे की, चार ट्रॅक्टरमधून घटनास्थळावरुन मृत आणि जखमी नक्षलवाद्यांना नेलं आहे. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की जवानांनी त्यांचं किती नुकसान केलं आहे," असं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितलं. "नक्षली हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याची शक्यता आम्ही फेटाळतो. हा पोलीस शिबिरावरील हल्ला नव्हता. आम्ही त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत होतो. आम्ही सुकमा, बिजापू आणि दंतेवाडाच्या दिशेने आमच्या अभियानाअंतर्गत कॅम्प लावत होतो. नक्षलवादी आता 40X40 चौरस किमी क्षेत्रापुरते मर्यादित राहिले आहेत आणि हेच त्यांच्या निराशेचं कारण आहे आमचं अभियान थांबणार नाही. शिबीर आणि रस्ते निर्माण होतच राहणार. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही," असं बघेल यांनी म्हटलं.

सीआरपीएफचे संचालक छत्तीसगडमध्ये 
सीआरपीएफचे संचालक कुलदीप सिंह यांनी नक्षलवादी हल्ल्यानंतर परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी छत्तीसगडमध्ये आहेत. या संपूर्ण अभियानात गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचा इन्कार त्यांनी केला. "जवळपास 25 ते 30 नक्षलवाद्यांचा आम्ही खात्मा केला आहे. पण नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही," असं कुलदीप सिंह यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget