नवी दिल्ली: भारतात सोन्याच्या दागिण्यांना प्रचंड महत्व आहे. खासकरुन लग्नासारख्या समारंभात याची मागणी जास्त असते. अशावेळी गरीब आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात सोनं देण्यासाठी प्रचंड आर्थिक ताण सहन करावा लागतो. पण आसाम राज्यात आता मुलीच्या आई-वडिलांची ही चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. 'अरुंधती गोल्ड योजने' च्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या लग्नात 10 ग्रॅमचा सोन्याचा शिक्का मोफत भेट म्हणून देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारनं घेतला आहे.


काय आहे अरुंधती गोल्ड योजना?
अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून आसाम सरकार राज्यातील ज्या परिवारांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा परिवारांना 10 ग्रॅम सोन्याचा शिक्का देणार आहे. परिवारातील पहिल्या दोन अपत्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून विवाहाच्या नोंदणीकरणानंतर प्रत्येक विवाह झालेली मुलगी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या 10 ग्रॅम सोन्यच्या शिक्क्याचा लाभ घेऊ शकते.


काय करावं लागणार?
या योजनेमुळे राज्यातील मुलींना काही प्रमाणात आर्थिक सुरक्षा मिळण्याची आशा राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्पेशल मॅरेज अॅक्ट,1954 या कायद्यानुसार नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीच्या दिवशीच संबंधित मुलगी अरुंधती गोल्ड योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करु शकते. यासाठी मुलीचं वय किमान 18 वर्षे तर मुलाचं वय किमान 21 वर्षे असायला हवं. या योजनेचा लाभ केवल अशा परिवारांना मिळणार आहे ज्यांचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे.


महत्वाच्या बातम्या: