Bihar : ना मोदी, ना नितीश, बिहारच्या विजयाचे खरे हिरो निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार; 'आप'ची पोस्ट व्हायरल
AAP Post On Election Commission : निवडणूक आयोगाने बिहारमध्ये SIR पद्धत राबवून आधीच निकाल सेट केला होता असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

Bihar Election Result 2025 : अतिशय चुरशीचा अंदाज व्यक्त केलेली बिहारची निवडणूक एकतर्फीच झाली आणि भाजपप्रणित एनडीएने (NDA) 202 जागा मिळवल्या. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन फक्त 35 जागांपर्यंत मजल मारू शकलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्व कौशल्याचं कौतुक होऊन त्यांना या विजयाचं श्रेय दिलं गेलं. असं असलं तरी आम आदमी पक्षाने मात्र या निवडणूक पद्धतीवर टीका केली आहे. आप पक्षाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून बिहारच्या विजयाचे खरे हिरो हे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असल्याचा टोला लगावला आहे.
बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR पद्धत राबवली आणि ही निवडणूक आधीच सेट केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच बिहारच्या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचं म्हणत आपने भाजपला टोला लगावला आहे.
AAP Post On Bihar Election : 'आप'ची पोस्ट नेमकी काय?
आम आदमी पक्षाने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर बिहार निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण असा प्रश्न विचारला आहे. त्याच्या खाली त्याचं उत्तर ज्ञानेश कुमार असं देण्यात आलं.
AAP Post On Election Commission : नेमकं काय म्हटलंय व्हिडीओमध्ये?
'भाजपचे मंत्री, नेते आणि आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात गेल्यानंतर त्यांना तिथल्या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. काही ठिकाणी तर त्यांच्यावर चिखल आणि शेणही फेकण्यात आलं. असं असलं तरी या बंपर विजयाचा हिरो कोण आहे? ना मोदी, ना नितीश कुमार, ना अमित शाह... बिहारच्या विजयाचे शिल्पकार हे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. तेच आहेत बिहारच्या विजयाचे खरे हिरो. ज्ञानेश कुमार यांच्या जिवावरच मोदींनी त्यांचा गमछा फिरवला. बिहारमध्ये निवडणूक आयोगाने SIR पद्धत रावबली आणि निवडणूक आधीच सेट केली.'
View this post on Instagram
आपचे खासदार संजय सिहं यांनी आधी केलेले एक वक्तव्यही त्या व्हिडीओमध्ये टाकण्यात आलं आहे. SIR पद्धतीमुळे बिहारची निवडणूक निष्पक्ष होणार नाही हे लिहून ठेवा असं संजय सिंह यांनी तीन महिन्यांपूर्वीच म्हटलं होतं.
Bihar Election Result : बिहारमध्ये कुणाला किती जागा?
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने चांगली कामगिरी करत 202 जागा जिंकल्या. भाजप 89 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला, तर जेडीयू 85 जागा जिंकून दुसरा सर्वात मोठा पक्ष बनला. चिराग पासवान यांच्या एलजेपी यांनी 19 जागा जिंकल्या, तर जीतन राम मांझी यांच्या एचएएमने पाच जागा जिंकल्या. उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमने चार जागा जिंकल्या. महाआघाडी फक्त 35 जागांपर्यंत मारू शकली.
Bihar Partywise Seats Result : बिहारमध्ये पक्षनिहाय जिंकलेल्या जागा
एनडीए - 202
भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) : 89
संयुक्त जनता दल (Janata Dal United): 85
लोक जनशक्ती पक्ष (Lok Janshakti Party): 19
हिंदुस्तानी आवाम मोर्चा (Hindustani Awam Morcha) : 5
राष्ट्रीय लोक मोर्चा (Rashtriya Lok Morcha) : 4
महागठबंधन - 35
राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) : 25
काँग्रेस (Indian National Congress ) : 6
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (Communist Party of India Marxist-Leninist) : 2
Indian Inclusive Party : 1 seat
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI M): 1
इतर - 2
एमआयएम (AIMIM) : 5
बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) : 1
ही बातमी वाचा:
























