एक्स्प्लोर
... तर राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देणार!

प्रातिनिधीक फोटो
मुंबई : ज्या बुडीत जिल्हा बँका नवीन पीककर्ज देण्यास असमर्थ ठरतील त्या जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज देण्यास परवानगी मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने 16 जिल्हे निश्चित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि बँक प्रतिनिधींच्या बैठकीत यासंबंधीत निर्णय होणार आहे. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. 'त्या' 16 बँका कोणत्या?
- नाशिक
- धुळे
- नंदूरबार
- जळगाव
- सोलापूर
- परभणी
- हिंगोली
- जालना
- बीड
- उस्मानाबाद
- नांदेड
- यवतमाळ
- अमरावती
- बुलडाणा
- नागपूर
- वर्धा
आणखी वाचा























