एक्स्प्लोर

सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय

मुंबई : एकीकडे नाफेड आणि बाजार समित्यांनी तूर विक्रीची दारं बंद केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना नवा उपाय सांगितला आहे. व्यापाऱ्यांना तूर न देता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे. नाफेडने तूर खरेदी थांबवल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्यात जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र राज्यातील बाजार समित्यांनी सरकारला पाठवले आहेत. काय आहे धान्य तारण योजना? शेतकऱ्याला आर्थिक गरजेपोटी स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतमालाच्या काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. शेतमालाचे बाजारभाव खाली येतात. शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालाला जादा बाजारभाव मिळू शकतो. म्हणून शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा यासाठी 1990-19 सालापासून शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली. या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा आणि हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येतं. कृषी तारण योजना बाजार समित्यांमार्फत राबवली जाते. सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. शेतमालनिहाय कर्जवाटप  सोयाबीन, तूर, मूग, उडीद, चणा, भात (धान), करडई, सूर्यफूल, हळद + एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ज्वारी, बाजरी, मका आणि गहू + एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम (किमान आधारभूत किंमत किंवा प्रचलित बाजारभाव प्रति क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम) काजू बी + एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम (50 रुपये प्रतिकिलो अथवा प्रत्यक्ष बाजारभावाची किंमत यापैकी कमी असेल ती रक्कम) बेदाणा + एकूण किमतीच्या कमाल 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रति मेट्रिक टन यातील कमी असणारी रक्कम तारण कर्जाच्या अटी आणि व्याजदर काय?
  • शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतमाल स्वीकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतमाल या योजनेअंतर्गत स्वीकारला जात नाही.
  • प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरवण्यात येते.
  • तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) आहे. तारण कर्जाचा व्याजाचा दर 6 टक्के आहे.
  • बाजार समितीकडून कृषी पणन मंडळास 3 टक्क्यांप्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड होते. (उर्वरित 3 टक्के व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत नाही.
  • 6 महिन्याच्या मुदतीनंतर सहा महिन्यांपर्यंत 8 टक्के व्याजदर आणि त्याच्या पुढील सहा महिन्यांकरिता 12 टक्के व्याजदराची आकारणी केली जाते.
  • तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक, देखरेख आणि सुरक्षा बाजार समिती विनामूल्य करते.
  • तारणातील शेतमालाचा विमा उतरवण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची राहते.
उदाहरणार्थ... समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 10 क्विंटल तूर आहे. सरकारी हमी दर 5 हजार 50 रुपये प्रति क्विंटल आहे, तर व्यापाऱ्यांकडे अंदाजे 4 हजार रुपये भाव आहे. यापैकी जो दर कमी, त्याच्या 75 टक्के तारण कर्ज मिळेल म्हणजेच 10 क्विंटल तुरीचे 4 हजार रुपये प्रति क्विंटल दराने 40 हजार रुपये होतात. त्याच्या 75 टक्के म्हणजे 30 हजार रुपये तारण कर्ज 3 टक्के व्याजदराने मिळणार. सहा महिन्यात 30 हजार तारण कर्ज अधिक 900 रुपये व्याज, अशी 30 हजार 900 रुपये परतफेड करावी लागेल. सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला तर पुढच्या सहा महिन्यांसाठी 2400 रुपये व्याज होईल, म्हणजे 32 हजार 400 रुपये परतफेड करावी लागेल. वर्षभरासाठी जास्त वेळ लागल्यास 3600 रुपये व्याज, म्हणजे 33 हजार 600 रुपयांची परतफेड करावी लागेल. जर सरकारने आत्ताच तूर खरेदी केली आणि पैसे दिले तर 10 क्विंटल तूर असणाऱ्या एका शेतकऱ्याला 50 हजार 500 रुपये मिळतील. संबंधित बातम्या :

काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक

तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च

तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना

नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Embed widget