एक्स्प्लोर

Radhakrishna Vikhe Patil : मराठ्यांना आरक्षण द्यायला पवारांचा विरोध, त्यांना जाब का विचारत नाही? राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगे यांना प्रश्न

Manoj Jarange Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देता येत नाही असं शरद पवार म्हणाले होते. त्यावर मनोज जरांगे काही बोलत नाहीत असा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

धाराशिव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दोन प्रश्न विचारले आहेत. देवेंद्र फडणवीसांवर टीका करून मराठा आरक्षण मिळणार आहे का? असं राधाकृष्ण विखे पाटलांनी विचारलं. तसेच मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, ही शरद पवारांनी जाहीर भूमिका मांडली. मराठ्यांना आरक्षण द्यायला पवारांचा विरोध आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील का बोलत नाहीत? असाही प्रश्न विखे पाटील यांनी केला. विखे पाटील धाराशिवमध्ये माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केला आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीसावर टीका करणे, मराठा आरक्षणाला फडणवीसांचा विरोध आहे असं सांगणे आणि त्याला जातीय रंग देणे हा प्रकार चुकीचा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. फडणीसांच्या काळातच मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनीच मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली होती. आजही महायुतीची तीच भूमिका आहे असं विखे पाटील म्हणाले.

शरद पवारांवर का बोलत नाही?

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीच आपल्याला आरक्षण दिलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्धव ठाकरे असतील, त्यांचे नेते शरद पवार असतील, त्यांनी आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण घालवलं. स्वतः शरद पवारांनी अनेक वेळा सांगितले की मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. त्याबद्दल जरांगे पाटील कधीच बोलत नाहीत. फक्त फडणवीस यांच्यावर टीका केली की आरक्षण मिळणार आहे का?"

मराठा आंदोलनासाठी धाराशिवमध्ये जोरदार तयारी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये चावडी बैठका घेत 29 ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधव जनजागृती करत आहेत.

मुंबईतील आंदोलनासाठी आतापर्यंत दहा हजार गाड्यांचं बुकिंग झालं आहे. मनोज जरांगेंचा फोटो असलेले आणि त्यावर 'चलो मुंबई' आशा आशयाचे बॅनर आणि पॅम्प्लेट छापण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : धाराशिव विधान परिषद निवडणुकीत उमेदवार ठरवताना भाजप नेत्यांची मोठी कसरत, 'ही' 4 नावे दिल्ली दरबारी; उमेदवारीसाठी मुंबईत जोरदार फिल्डिंग!
धाराशिव विधान परिषद निवडणुकीत उमेदवार ठरवताना भाजप नेत्यांची मोठी कसरत, 'ही' 4 नावे दिल्ली दरबारी; उमेदवारीसाठी मुंबईत जोरदार फिल्डिंग!
धक्कादायक! चालत्या ट्रकमधून 10 ते 15 शेळ्यांची चोरी, धाराशिवमधील सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
धक्कादायक! चालत्या ट्रकमधून 10 ते 15 शेळ्यांची चोरी, धाराशिवमधील सोलापूर-धुळे राज्य महामार्गावरील घटना
Mahavitran : वीजगळती रोखण्यात महावितरणला अपयश, तब्बल 700 ते 800 कोटींचा फटका; भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूलणार?
वीजगळती रोखण्यात महावितरणला अपयश, तब्बल 700 ते 800 कोटींचा फटका; भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूलणार?
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटीमुळे धाराशिवच्या निलेशचा 3 वर्षांचा संघर्ष मातीमोल, 'श्रीमंत पैसे देऊन काहीही करतात, आम्ही गरिबांनी काय करावं?' हताश पालकांचा व्यवस्थेचा सवाल
नीट पेपरफुटीमुळे धाराशिवच्या निलेशचा 3 वर्षांचा संघर्ष मातीमोल, 'श्रीमंत पैसे देऊन काहीही करतात, आम्ही गरिबांनी काय करावं?' हताश पालकांचा व्यवस्थेचा सवाल

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget