एक्स्प्लोर

देशातल्या पहिल्या स्मार्ट इंटेलीजन व्हीलेजच्या सुविधांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ; राज्यात साडे तीन हजार गावांचाही कायापालट होणार, मुख्यमंत्र्याची घोषणा

First Smart Intelligence Village : देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव असलेल्या सातनवरी गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ आणि काहींचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झालंय.

व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इंटरप्राईजेस या खाजगी कंपनीकडून नागपूर जिल्ह्यातील हे गाव विकसित करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाणारी व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या वतीने देशातील प्रायोगिक तत्वावरील पहिला स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनवरीचा विकास केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थित होते.

आज आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या धोरणासह प्रगती करतो- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदींनी ओळखले होते कि, गावोगावी कॉम्म्युनिकेशन सुविधा, तंत्रज्ञान पोहोचविले तरच गाव विकसित होतील. त्यासाठी 2014 ते 19 दरम्यान गावागावात फायबर ऑप्टिक पोहोचवण्यासाठी भारत नेट व महाराष्ट्र नेट ही सुविधा सुरू केली होती. नंतरच्या काळात त्यावर आधारित तंत्रज्ञान वापरण्यात आपण मागे पडलो होतो. सुदैवाने सरकार पुन्हा आलं आणि त्या दिशेनं पुन्हा काम सुरू झालंय. परिणामी, सातनवरी गावात अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ज्या कंपन्यांनी ( सुमारे 24 कंपनी) पुढाकार घेतला, प्रयत्न केले, त्या सर्व कंपन्या भारतीय आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या धोरणासह प्रगती करतो आहे. असे हि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जागतिक बाजारपेठ आज शेतमालाचे भाव ठरविते. इतर देशांचे उत्पादन खर्च कमी आहे. कारण ते तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतात. कमी खर्चात जास्त उत्पादन करतात. त्यामुळे कमी भावात ते बाजारात शेतमाल विकू शकतात. भारतात मात्र उत्पादन वाढवताना उत्पादन खर्च ही वाढत आहे. खतांवर सरकार सबसिडी देते, खतांचा वापर वाढल्याने जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यासाठी पुन्हा खते वापरले जात आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर करून खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण केले, तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक तेवढाच सिंचन दिले तर आपण उत्पादकता वाढवू शकतो. असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाण्याची बचत होईल- - देवेंद्र फडणवीस

शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाण्याची बचत होईल, खत आणि औषधांचा वापर करून शेती समृद्ध करता येईल. प्रत्येकाने माती परीक्षण केली पाहिजे. होणाऱ्या रोगांपैकी 90 टक्के रोग पाण्यामुळे होतात. थोड्या तंत्रज्ञानाच्या वापराने पाण्याची गुणवत्ता सुधारता येईल. सातनवरी गावातील नागरिकांना प्रत्येक वेळेला नागपूरच्या रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. तर डिजिटली त्यांना डॉक्टरचा सल्ला घेता येईल, तुमचे रिपोर्ट डॉक्टरला डिजिटली उपलब्ध होतील. असेही ते म्हणाले.

या गावात डिजिटल सुविधाच्या माध्यमातून ई आरोग्य सेवा, ई शिक्षण, स्मार्ट शेती, स्मार्ट सिंचन, स्मार्ट पंचायत, शेतातील फवारणी ड्रोन नियंत्रित आणि कीटकनाशक फवारणी इत्यादी कामे केली जाणार आहे. शेती क्षेत्रात पाण्याची बचत, खताची बचत, यासह डिजिटल सेवेच्या माध्यमातून गावकऱ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.

स्मार्ट आणि इंटेलिजेंट गावांमध्ये काय काय होणार?

Ai तंत्राने सिंचन दिले जाणार. सेन्सर कळवेल किती पाणी द्यायचे आहे. त्यामुळे पाण्याची 30 टक्के बचत होईल. 2 टक्के खतांची बचत होईल.

शेतकऱ्यांना दूरवर असलेल्या शेती तज्ञांचे मार्गदर्शन डिजिटल पद्धतीने मिळेल..

पशु पालकांना डॉक्टर आणि तज्ञांचे मार्गदर्शन डिजिटली मिळेल..

स्मार्ट अंगणवाडी राहील..

ड्रोन ने खत फवारणी होऊन शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही..

शेतकऱ्यांना मोबाईल ऍप द्वारे शेतावरील पंपाचे ऑपरेशन करता येईल..

विविध शासकीय योजनांचे लाभ, शासकीय दाखले हे आता गावकऱ्यांना डिजिटली संबंधित कार्यालयात न जाता मिळू शकतील.

आणखी वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Alert: दिल्ली स्फोटानंतर Nagpur हाय अलर्टवर, संघ मुख्यालयाला तिहेरी सुरक्षा
Mumbai Alert:Delhi तील स्फोटानंतर Mumbai हाय अलर्टवर,Devendra Fadnavis यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
Delhi Blast: फरीदाबादमध्ये 350 किलो स्फोटकांसह डॉक्टरांना अटक, दिल्ली स्फोटाशी कनेक्शन?
Delhi Blast: लाल किल्याजवळ स्फोट, गृहमंत्री Amit Shah आज घेणार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक.
Delhi Blast Probe : Red Fort जवळ स्फोटात 8 ठार, गाडीचे Pulwama कनेक्शन समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Embed widget