एक्स्प्लोर

देशातल्या पहिल्या स्मार्ट इंटेलीजन व्हीलेजच्या सुविधांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ; राज्यात साडे तीन हजार गावांचाही कायापालट होणार, मुख्यमंत्र्याची घोषणा

First Smart Intelligence Village : देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव असलेल्या सातनवरी गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ आणि काहींचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झालंय.

व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इंटरप्राईजेस या खाजगी कंपनीकडून नागपूर जिल्ह्यातील हे गाव विकसित करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाणारी व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या वतीने देशातील प्रायोगिक तत्वावरील पहिला स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनवरीचा विकास केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थित होते.

आज आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या धोरणासह प्रगती करतो- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदींनी ओळखले होते कि, गावोगावी कॉम्म्युनिकेशन सुविधा, तंत्रज्ञान पोहोचविले तरच गाव विकसित होतील. त्यासाठी 2014 ते 19 दरम्यान गावागावात फायबर ऑप्टिक पोहोचवण्यासाठी भारत नेट व महाराष्ट्र नेट ही सुविधा सुरू केली होती. नंतरच्या काळात त्यावर आधारित तंत्रज्ञान वापरण्यात आपण मागे पडलो होतो. सुदैवाने सरकार पुन्हा आलं आणि त्या दिशेनं पुन्हा काम सुरू झालंय. परिणामी, सातनवरी गावात अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ज्या कंपन्यांनी ( सुमारे 24 कंपनी) पुढाकार घेतला, प्रयत्न केले, त्या सर्व कंपन्या भारतीय आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या धोरणासह प्रगती करतो आहे. असे हि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जागतिक बाजारपेठ आज शेतमालाचे भाव ठरविते. इतर देशांचे उत्पादन खर्च कमी आहे. कारण ते तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतात. कमी खर्चात जास्त उत्पादन करतात. त्यामुळे कमी भावात ते बाजारात शेतमाल विकू शकतात. भारतात मात्र उत्पादन वाढवताना उत्पादन खर्च ही वाढत आहे. खतांवर सरकार सबसिडी देते, खतांचा वापर वाढल्याने जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यासाठी पुन्हा खते वापरले जात आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर करून खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण केले, तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक तेवढाच सिंचन दिले तर आपण उत्पादकता वाढवू शकतो. असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाण्याची बचत होईल- - देवेंद्र फडणवीस

शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाण्याची बचत होईल, खत आणि औषधांचा वापर करून शेती समृद्ध करता येईल. प्रत्येकाने माती परीक्षण केली पाहिजे. होणाऱ्या रोगांपैकी 90 टक्के रोग पाण्यामुळे होतात. थोड्या तंत्रज्ञानाच्या वापराने पाण्याची गुणवत्ता सुधारता येईल. सातनवरी गावातील नागरिकांना प्रत्येक वेळेला नागपूरच्या रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. तर डिजिटली त्यांना डॉक्टरचा सल्ला घेता येईल, तुमचे रिपोर्ट डॉक्टरला डिजिटली उपलब्ध होतील. असेही ते म्हणाले.

या गावात डिजिटल सुविधाच्या माध्यमातून ई आरोग्य सेवा, ई शिक्षण, स्मार्ट शेती, स्मार्ट सिंचन, स्मार्ट पंचायत, शेतातील फवारणी ड्रोन नियंत्रित आणि कीटकनाशक फवारणी इत्यादी कामे केली जाणार आहे. शेती क्षेत्रात पाण्याची बचत, खताची बचत, यासह डिजिटल सेवेच्या माध्यमातून गावकऱ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.

स्मार्ट आणि इंटेलिजेंट गावांमध्ये काय काय होणार?

Ai तंत्राने सिंचन दिले जाणार. सेन्सर कळवेल किती पाणी द्यायचे आहे. त्यामुळे पाण्याची 30 टक्के बचत होईल. 2 टक्के खतांची बचत होईल.

शेतकऱ्यांना दूरवर असलेल्या शेती तज्ञांचे मार्गदर्शन डिजिटल पद्धतीने मिळेल..

पशु पालकांना डॉक्टर आणि तज्ञांचे मार्गदर्शन डिजिटली मिळेल..

स्मार्ट अंगणवाडी राहील..

ड्रोन ने खत फवारणी होऊन शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही..

शेतकऱ्यांना मोबाईल ऍप द्वारे शेतावरील पंपाचे ऑपरेशन करता येईल..

विविध शासकीय योजनांचे लाभ, शासकीय दाखले हे आता गावकऱ्यांना डिजिटली संबंधित कार्यालयात न जाता मिळू शकतील.

आणखी वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget