एक्स्प्लोर

देशातल्या पहिल्या स्मार्ट इंटेलीजन व्हीलेजच्या सुविधांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ; राज्यात साडे तीन हजार गावांचाही कायापालट होणार, मुख्यमंत्र्याची घोषणा

First Smart Intelligence Village : देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव असलेल्या सातनवरी गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ आणि काहींचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झालंय.

व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इंटरप्राईजेस या खाजगी कंपनीकडून नागपूर जिल्ह्यातील हे गाव विकसित करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाणारी व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या वतीने देशातील प्रायोगिक तत्वावरील पहिला स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनवरीचा विकास केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थित होते.

आज आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या धोरणासह प्रगती करतो- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदींनी ओळखले होते कि, गावोगावी कॉम्म्युनिकेशन सुविधा, तंत्रज्ञान पोहोचविले तरच गाव विकसित होतील. त्यासाठी 2014 ते 19 दरम्यान गावागावात फायबर ऑप्टिक पोहोचवण्यासाठी भारत नेट व महाराष्ट्र नेट ही सुविधा सुरू केली होती. नंतरच्या काळात त्यावर आधारित तंत्रज्ञान वापरण्यात आपण मागे पडलो होतो. सुदैवाने सरकार पुन्हा आलं आणि त्या दिशेनं पुन्हा काम सुरू झालंय. परिणामी, सातनवरी गावात अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ज्या कंपन्यांनी ( सुमारे 24 कंपनी) पुढाकार घेतला, प्रयत्न केले, त्या सर्व कंपन्या भारतीय आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या धोरणासह प्रगती करतो आहे. असे हि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जागतिक बाजारपेठ आज शेतमालाचे भाव ठरविते. इतर देशांचे उत्पादन खर्च कमी आहे. कारण ते तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतात. कमी खर्चात जास्त उत्पादन करतात. त्यामुळे कमी भावात ते बाजारात शेतमाल विकू शकतात. भारतात मात्र उत्पादन वाढवताना उत्पादन खर्च ही वाढत आहे. खतांवर सरकार सबसिडी देते, खतांचा वापर वाढल्याने जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यासाठी पुन्हा खते वापरले जात आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर करून खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण केले, तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक तेवढाच सिंचन दिले तर आपण उत्पादकता वाढवू शकतो. असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाण्याची बचत होईल- - देवेंद्र फडणवीस

शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाण्याची बचत होईल, खत आणि औषधांचा वापर करून शेती समृद्ध करता येईल. प्रत्येकाने माती परीक्षण केली पाहिजे. होणाऱ्या रोगांपैकी 90 टक्के रोग पाण्यामुळे होतात. थोड्या तंत्रज्ञानाच्या वापराने पाण्याची गुणवत्ता सुधारता येईल. सातनवरी गावातील नागरिकांना प्रत्येक वेळेला नागपूरच्या रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. तर डिजिटली त्यांना डॉक्टरचा सल्ला घेता येईल, तुमचे रिपोर्ट डॉक्टरला डिजिटली उपलब्ध होतील. असेही ते म्हणाले.

या गावात डिजिटल सुविधाच्या माध्यमातून ई आरोग्य सेवा, ई शिक्षण, स्मार्ट शेती, स्मार्ट सिंचन, स्मार्ट पंचायत, शेतातील फवारणी ड्रोन नियंत्रित आणि कीटकनाशक फवारणी इत्यादी कामे केली जाणार आहे. शेती क्षेत्रात पाण्याची बचत, खताची बचत, यासह डिजिटल सेवेच्या माध्यमातून गावकऱ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.

स्मार्ट आणि इंटेलिजेंट गावांमध्ये काय काय होणार?

Ai तंत्राने सिंचन दिले जाणार. सेन्सर कळवेल किती पाणी द्यायचे आहे. त्यामुळे पाण्याची 30 टक्के बचत होईल. 2 टक्के खतांची बचत होईल.

शेतकऱ्यांना दूरवर असलेल्या शेती तज्ञांचे मार्गदर्शन डिजिटल पद्धतीने मिळेल..

पशु पालकांना डॉक्टर आणि तज्ञांचे मार्गदर्शन डिजिटली मिळेल..

स्मार्ट अंगणवाडी राहील..

ड्रोन ने खत फवारणी होऊन शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही..

शेतकऱ्यांना मोबाईल ऍप द्वारे शेतावरील पंपाचे ऑपरेशन करता येईल..

विविध शासकीय योजनांचे लाभ, शासकीय दाखले हे आता गावकऱ्यांना डिजिटली संबंधित कार्यालयात न जाता मिळू शकतील.

आणखी वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Embed widget