एक्स्प्लोर

मोठी बातमी : संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर; अंबादास दानवेंचा पत्ता कट

Shiv Sena UBT Lok Sabha Candidate List  : चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने संभाजीनगरमधून इच्छुक असलेल्या अंबादास दानवेयांचा पत्ता कट झाला आहे. 

Shiv Sena UBT Lok Sabha Candidate List  : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांच्या नावाची यादी (Uddhav Thackeray Shiv Sena Lok Sabha Candidate List) घोषित करण्यात आली आहे. मराठवाड्याची (Marathwada) राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) अपेक्षेप्रमाणे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना अधिकृत उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी पोस्त केली आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने संभाजीनगरमधून इच्छुक असलेल्या अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा पत्ता कट झाला आहे. 

मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या संभाजीनगरमधील जागेवरून वाद पाहायला मिळत होता. खैरे आणि दानवे यांच्यातील उमेदवारीसाठी सुरु असलेला वाद थेट मातोश्रीपर्यंत पोहचला होता. त्यामुळे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज एकूण 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, ज्यात संभाजीनगरमधून खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

उमेदवार जाहीर झाल्यावर सर्व काही संपते : दानवे 

मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिका असून, त्यामुळे माझाच काय प्रत्येक शिवसैनिकाला इच्छुक राहण्याचा अधिकार आहे. त्याला कुणीही थांबू शकत नाही. सामन्य शिवसैनिक देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असू शकतो. मात्र, एकदा उमेदवार जाहीर झाल्यावर सर्व काही संपते. त्यानंतर संघटना म्हणूनच सर्वांना काम करावे लागते. त्यामुळे आता पक्षाचा जो आदेश असतो त्यानुसार काम करणार आहे. इच्छुक असणे काही चुकीचे नाही. पक्षाच्या आदेशात दुःख, आनंद, समाधान असे काही नसते, जे काही दिले ते स्वीकारायचे असते, असे दानवे म्हणाले. 

अंबादास दानवे यांचा चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीला विरोध का आहे?

  • छत्रपती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी 2014 पासून अंबादास दानवे इच्छुक असून, यासाठी त्यांची तयारी सुरु आहे.
  • एकाच पक्षात असतांना चंद्रकांत खैरे यांच्याकडून आपल्याला सतत डावलण्यात येत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
  • प्रत्येक निवडणुकीत चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे असा पक्षातील वाद पाहायला मिळत असतो. शेवटी पक्षश्रेष्ठींना हस्तक्षेप करून वाद मिटवावा लागतो.
  • मागील लोकसभा निवडणुकीत अंबादास दानवे यांच्यामुळे आपला पराभव झाल्याचे देखील अनेकदा खैरेंनी बोलावून दाखवले आहे.
  • मागील आठवड्यात चंद्रकांत खैरे यांनी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला दानवे यांना बोलावले  नसल्याने हा वाद आणखीनच वाढला होता.
  • चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीला आव्हान देत अंबादास दानवे यांनी देखील थेट दंड थोपटत लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
  • खैरे आणि दानवे यांच्यातील उमेदवारीचा वाद एवढा वाढला की थेट उद्धव ठाकरेंना मध्यस्थी करावी लागली. दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर बोलावून वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला.
  • खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर देखील हा वाद मिटला नसल्याचे चित्र आहे. तर, आपण पक्षाचं काम करणार असून, खैरेंचं काम करणार नसल्याचं दानवेंनी भूमिका घेतली आहे.
  • खैरे यांना तिकीट मिळताच अंबादास दानवेंनी सूचक व्हाट्सअप स्टेटस ठेवत आपली नाराजी जाहीर केली आहे. "ये साजिशों का दौर है, और हम कोशिशों में उलझे हुए है" असं दानवे म्हणाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या :

मोठी बातमी : संभाजीनगरमधील खैरे-दानवे वाद अखेर संपला; अंबादास दानवेंनी केली मोठी घोषणा

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget