एक्स्प्लोर

आता दणका दाखवतो! रेल्वे विभागाला इशारा देताच उद्घाटनाच्या पत्रिकेत इम्तियाज इम्तियाज यांचे नाव टाकले

Vande Bharat Express : इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्यानंतर उद्घाटनाच्या पत्रिकेत रेल्वे विभागाने इम्तियाज यांचे नाव टाकले आहे. यासाठी रात्री उशिरा पुन्हा एकदा दुसरी पत्रिका तयार करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat Express) उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच संतापले होते. माझी काही अॅलर्जी त्यांना आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, उद्घाटनापूर्वी दणका दाखवतो असा इशाराही जलील यांनी दिला होता. दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्यानंतर उद्घाटनाच्या पत्रिकेत रेल्वे विभागाने इम्तियाज यांचे नाव टाकले आहे. यासाठी रात्री उशिरा पुन्हा एकदा दुसरी पत्रिका तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांचे देखील नाव नव्हते, मात्र आता त्यांचे नाव देखील पत्रिकेत टाकण्यात आले आहे. 

वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले होते. याचवेळी, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकामध्ये येऊन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात जलील यांचं नाव नसल्यानं हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आता रेल्वे विभागाने जलील यांचे नाव असलेली नवीन पत्रिका तयार केली आहे. सोबतच यापूर्वीच्या पत्रिकेत नाव नसलेल्या इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे देखील नाव टाकण्यात आले आहेत. 

मुंबई-जालना धावणार वंदे भारत एक्स्प्रेस 

महाराष्ट्रातील सातवी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस शनिवारपासून जालना-मुंबई मार्गावर धावणार आहे. या हायस्पीड ट्रेनचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं अयोध्येमधून होणार आहे. नव्या वर्षात ही गाडी एक जानेवारीपासून गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होईल. मुंबई-जालना ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवडय़ातून सहा दिवस धावणार आहे. ही ट्रेन जालना रेल्वे स्थानकातून पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी बारा वाजता पोहोचेल. ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी एक वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि जालन्यात रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे. या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे चार थांबे आहेत.

जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक (वन-वे)

30 डिसेंबर 2023 रोजी 8 डब्ब्यांची वंदे भारत विशेष ट्रेन 02705 जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (वन-वे) जालन्याहून सकाळी 11 वाजता रवाना होईल. जालन्याहून रवाना झालेली ही गाडी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी औरंगाबादला पोहोचणार असून 11 वाजून 57 मिनिटांनी प्रस्थान करेल. त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शनवर 13:42 hrs/13:44 hrs, नाशिकरोड - 14:44 hrs/14:46 hrs, कल्याण जंक्शन - 17:06 hrs/17:08 hrs, ठाणे - 17:28 hrs/17 :30 तास, दादर - 17:50 तास/17:52 तास, सीएसएमटी मुंबई - 18:45 तास पोहोचेल पोहोचेल.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jalna-Mumbai Vande Bharat Train: जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे, महाराष्ट्रातील सातवी अन् मुंबईला जोडणारी पाचवी वंदे भारत; मोदींच्या हस्ते आज उद्घाटन

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Embed widget