एक्स्प्लोर

आता दणका दाखवतो! रेल्वे विभागाला इशारा देताच उद्घाटनाच्या पत्रिकेत इम्तियाज इम्तियाज यांचे नाव टाकले

Vande Bharat Express : इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्यानंतर उद्घाटनाच्या पत्रिकेत रेल्वे विभागाने इम्तियाज यांचे नाव टाकले आहे. यासाठी रात्री उशिरा पुन्हा एकदा दुसरी पत्रिका तयार करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat Express) उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच संतापले होते. माझी काही अॅलर्जी त्यांना आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, उद्घाटनापूर्वी दणका दाखवतो असा इशाराही जलील यांनी दिला होता. दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्यानंतर उद्घाटनाच्या पत्रिकेत रेल्वे विभागाने इम्तियाज यांचे नाव टाकले आहे. यासाठी रात्री उशिरा पुन्हा एकदा दुसरी पत्रिका तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांचे देखील नाव नव्हते, मात्र आता त्यांचे नाव देखील पत्रिकेत टाकण्यात आले आहे. 

वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले होते. याचवेळी, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकामध्ये येऊन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात जलील यांचं नाव नसल्यानं हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आता रेल्वे विभागाने जलील यांचे नाव असलेली नवीन पत्रिका तयार केली आहे. सोबतच यापूर्वीच्या पत्रिकेत नाव नसलेल्या इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे देखील नाव टाकण्यात आले आहेत. 

मुंबई-जालना धावणार वंदे भारत एक्स्प्रेस 

महाराष्ट्रातील सातवी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस शनिवारपासून जालना-मुंबई मार्गावर धावणार आहे. या हायस्पीड ट्रेनचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं अयोध्येमधून होणार आहे. नव्या वर्षात ही गाडी एक जानेवारीपासून गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होईल. मुंबई-जालना ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवडय़ातून सहा दिवस धावणार आहे. ही ट्रेन जालना रेल्वे स्थानकातून पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी बारा वाजता पोहोचेल. ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी एक वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि जालन्यात रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे. या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे चार थांबे आहेत.

जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक (वन-वे)

30 डिसेंबर 2023 रोजी 8 डब्ब्यांची वंदे भारत विशेष ट्रेन 02705 जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (वन-वे) जालन्याहून सकाळी 11 वाजता रवाना होईल. जालन्याहून रवाना झालेली ही गाडी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी औरंगाबादला पोहोचणार असून 11 वाजून 57 मिनिटांनी प्रस्थान करेल. त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शनवर 13:42 hrs/13:44 hrs, नाशिकरोड - 14:44 hrs/14:46 hrs, कल्याण जंक्शन - 17:06 hrs/17:08 hrs, ठाणे - 17:28 hrs/17 :30 तास, दादर - 17:50 तास/17:52 तास, सीएसएमटी मुंबई - 18:45 तास पोहोचेल पोहोचेल.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jalna-Mumbai Vande Bharat Train: जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे, महाराष्ट्रातील सातवी अन् मुंबईला जोडणारी पाचवी वंदे भारत; मोदींच्या हस्ते आज उद्घाटन

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार

व्हिडीओ

Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण
Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Embed widget