एक्स्प्लोर

Sanjay Gaikwad on Aaditya Thackeray : बालिशपणा थांबवा अन् आत्मपरीक्षण करा; संजय गायकवाड यांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

Sanjay Gaikwad on Aaditya Thackeray: एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत ते कुणालाही घाबरत नाही, त्यामुळेच ठाकरे कुटुंबानं बालिशपणासारखी वक्तव्य करू नये, असा सल्ला गायकवाडांनी दिलाय. 

Sanjay Gaikwad on Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत (CM Eknath Shinde) केलेल्या गौप्यस्फोटाचा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जोरदार समाचार घेतलाय. बालिशपणा थांबवा आणि आत्मपरीक्षण, अशी खरमरीत टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केलीय. एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत, ते कुणालाही घाबरत नाहीत म्हणून ठाकरे कुटुंबानं बालिशपणासारखी वक्तव्य करू नये, असा सल्ला संजय गायकवाडांनी दिला आहे. 

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य टीव्हीवर पाहून मला हसू येतंय, ज्यावेळी आम्ही शिंदे साहेबांसोबत बाहेर पडलो, त्यावेळी तुम्ही भाजपच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिलाय, असा व्हिडीओ व्हायरल केला. अन् आता तुम्ही म्हणताय की, एकनाथ शिंदे घाबरून बाहेर गेलेत. एकवेळ एकनाथ शिंदेंचं सोडा, पण त्यांच्याबरोबर गेलेले चाळीस आमदारही घाबरुन गेले का? यांना पण तुम्ही जेलमध्ये घालणार होतात का? म्हणूनच हे सगळे नाटक सुरु आहे. एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत, ते कुणालाही घाबरत नाहीत, त्यामुळेच ठाकरे कुटुंबाने बालिशपणासारखी वक्तव्य करू नये, असा सल्ला गायकवाडांनी दिलाय. 

तर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही समाचार घेतला. बंडाला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेलेत. किती दिवस एकाच विषयावरून आम्हाला छळणार आहात, असा सवालही त्यांनी केलाय. 

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

आदित्य ठाकरे यांनी एक दिवसाचा हैदराबाद दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गीतम विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवसेनेतील फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, "शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले होते. ते रडायला लागले आणि म्हणाले की, भाजपसोबत हातमिळवणी करा, अन्यथा ते आम्हाला जेलमध्ये टाकतील. मी भाजपसोबत नाही गेलो तर तुरुंगात जाईन, असंही त्यावेळी ते सांगत होते."

दरम्यान, 20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली. त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणातील निकाल येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
Sanjay Gaikwad: शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget