एक्स्प्लोर

काय सांगता! बीडमध्ये ग्रामसभा ऐवजी भरली बालसभा, विद्यार्थ्यांनी मांडले प्रश्न, तर सरपंचांनी घेतले ठराव

Children Meeting in Beed : एखाद्या ग्रामसभेप्रमाणेच या बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील आणि गावातील प्रश्न ग्रामपंचायतसमोर मांडले होते.

Children Meeting in Beed : ग्रामीण भागात अनेकदा आपण ग्रामपंचायत अंर्तगत ग्रामसभा (Gram Sabha) भरल्याचे पाहिले असेल. काही ठिकाणी महिलांची ग्रामसभा देखील भरल्याचे उदाहरण आहेत. मात्र, बीडच्या (Beed) एका गावात चक्क ग्रामसभा ऐवजी बालसभा भरल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायतीच्या वतीने या विशेष बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. तसेच अनेकांनी समस्या देखील मांडल्या. विशेष म्हणजे या सभेत आलेल्या मुद्यांवर ठराव देखील घेण्यात आले. 

बीड तालुक्यातील आंबे सावळी येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या वतीने या विशेष बाल सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. आंबे सावळी ग्रामपंचायत हे बीड जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत आहे, ज्यांनी या बालसभेचे आयोजन केलं होतं. या बालसभेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील समस्या आणि गावातील इतर समस्या सरपंचासमोर मांडल्या. यावेळी सरपंचांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन यावर तात्काळ तोडगा काढायला सुरुवात केली आहे.

गावातील समस्या आणि काही ठराव करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ग्रामसभा घेतली जाते. यामध्ये गावाचा विकासाचा आराखडा मानला जातो. मात्र, आंबे सावळी ग्रामपंचायतीने एक नवा आदर्श उभा केला असून, विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाल सभा आयोजित केली होती. यामध्ये देखील अनेक ठराव घेण्यात आले. बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या बालसभेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे. 

असे ठराव घेण्यात आले...

एखाद्या ग्रामसभेप्रमाणेच या बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील आणि गावातील प्रश्न ग्रामपंचायतसमोर मांडले होते. यामध्ये शाळेमध्ये वाचनालयाची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर गावात नळ योजना आलेली असून, प्रत्येकाच्या घरी नळ असून त्या नळाला ग्रामपंचायतच्या वतीने तोटी बसून देण्यात यावी, त्याचबरोबर गावातील सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात यावे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतसमोर मांडले. विशेष म्हणजे, यावर ग्रामपंचायतीने ठराव घेतले असून, तात्काळ या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचं आदर्श घेऊन इतर गावांमध्ये देखील अशीच ग्रामसभा आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना आपल्या समस्या मांडता येईल. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

नवीन पिकांसह खते, बियाणाची माहिती देण्यासाठी आता प्रत्येक गावात ग्रामसभा भरणार; कृषिमंत्र्यांचे आदेश

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget