एक्स्प्लोर

रात्री झोपेत सर्पदंश झाला पण समजलं नाही, बीडच्या धारूर तालुक्यात बहिण भावाचा मृत्यू, गावात हळहळ

गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे जीवाला धोका निर्माण झालाय. प्रशासनानं नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं आहे.

Beed: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात कोयाळ गावात झोपेतच सख्या बहिण-भावाला सर्पदंश झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. . या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्पदंशामुळे सख्या बहिण भावाचा झोपेतच मृत्यू झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करतायत. कोमल मुंडे (वय 15) आणि शिवम मुंडे (वय 12) असे मृत बहिण भावाचे नाव आहे. (Beed News) गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे जीवाला धोका निर्माण झालाय. प्रशासनानं नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं आहे.

झोपेतच सर्पदंश, बहीण भावाचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात झोपेतच सर्पदंश झाल्याने सख्या बहिण भावाचा मृत्यू झालाय. ही घटना 24 मे रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली. सख्खे बहिण-भाऊ  घरात झोपलेले होते. रात्री उशिरा त्यांना सर्पदंश झाला. सुरुवातीला दोघांनाही काही समजले नाही, परंतु त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघडल्याने  कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचेपर्यंत दोघांचीही प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

गेल्या आठवड्यापासून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर आहे. या वातावरणामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची हालचाल वाढली असून सर्पदंशाच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागात झोपडी किंवा खुल्या जागेत झोपणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारांमुळे जिवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घराजवळील जागा स्वच्छ ठेवणे, उंदीर-सरपटणाऱ्या प्राण्यांची वावर होणार नाही याची खबरदारी घेणे, रात्री झोपताना झोपेची जागा नीट पाहणे आणि शक्य असल्यास झोपण्यासाठी उंचावलेली बेड वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा:

Washim: खेळताना वीजेची तार हातात धरली अन् खांबाला चिटकली, जोरात किंचाळल्याने अनर्थ टळला, वाशिमच्या अनसिंगमधील घटना

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Kolhapur कोल्हापूरमध्ये 5 वर्षात विकास रखडल्याने महिला संतप्त
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्याची दैना, वाहतूक कोंडी, महिला असुरक्षित, तरुणींना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Dhule 'आमची पिळवणूक थांबवा', धुळेकरांनी वाचला समस्यांचा पाढा; कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mumbai : मुंबई महापालिका पुन्हा ठाकरेंकडे जाणार?, मुंबईकरांचा कौल कुणाला?
Pandharpur Update: २४ तास दर्शनानंतर विठुरायाला मिळणार आराम, प्रक्षाळ पूजेनंतर राजोपचार पुन्हा सुरू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Gujarat ATS arrests three ISIS terrorists: गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
Andheri : मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
Bacchu Kadu : राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी ही अवलाद...
राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले...
Embed widget