एक्स्प्लोर

Aurangabad Water Issue: जलवाहिनी फुटल्याने औरंगाबादकरांना आठ ते दहा तास उशिराने पाणीपुरवठा होणार

Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरातील  पाण्याचे टप्पे आठ ते दहा तास उशिराने केले जाणार आहे.

Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात अधिकच वाढले आहे. त्यातच आता पुन्हा जुन्या शहराची तहान भागविणारी 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फारोळा येथे फुटली. त्यामुळे पुन्हा एकदा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाला तब्बल 14 ते 15 तास लागणार असल्याने शहरातील पाण्याचे टप्पे आठ ते दहा तास उशिराने केले जाणार आहे. त्यामुळे औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न (Aurangabad Water Issue) काही सुटता सुटत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

आठ दिवसांपूर्वी 1200 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली होती, त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यातच आता जुन्या शहराची तहान भागविणारी 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फारोळा येथे फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाण्याचे टप्पे आठ ते दहा तास उशिराने केले जातील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

साहित्य मिळण्यास अडचणी 

रविवारी दिवसभर पाणीपुरवठा सुरू असताना फारोळा येथे सायंकाळी जलवाहिनीला गळती लागून ती फुटली. ही बाब लक्षात येताच उपअभियंता एम. एम. बाविस्कर यांनी व त्यांचे सहकारी कनिष्ठ अभियंता आशिष अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला व दुरुस्तीला सुरुवात केली. पण, या जलवाहिनीचे साहित्य मिळण्यास अडचणी येत आहेत. तर दुरुस्तीसाठी 14 ते 15  तासांचा कालावधी लागणार असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले. यामुळे शहरातील काही भाग, जुने शहर, शहागंज, जिप्सी, विश्वभारती कॉलनी येथून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. त्यामुळे आठ ते दहा तास उशिराने पाणी मिळेल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

जलवाहिन्या जुन्या झाल्या! 

औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून 700 मिलिमीटर आणि 1200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांनी पाणीपुरवठा केला जातो. यासाठी ढोरकीन, फारोळा येथे जलशुद्धीकरण केंद्र बनवण्यात आले आहे. मात्र या दोन्ही जलवाहिन्या खूप जुन्या झाल्या असल्याने सतत फुटत असतात. तर शहरातील पाणीपुरवठा देखील नेहमीच विस्कळीत होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. नवीन पाणीपुरवठा जलवाहिनीचे काम सुरु आहे. मात्र ते कधीपर्यंत होईल याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे  औरंगाबादकरांचा पाणी प्रश्न नेमका कधी सुटणार याचं उत्तर मिळणं कठीण झाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad Garbage Depot: औरंगाबादचा कचरा पुन्हा पेटला! तब्बल 36 तासांनंतर आगीवर नियंत्रण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget