एक्स्प्लोर

Aurangabad Renaming: हर्षवर्धन जाधवांनी लावलेल्या 'त्या' बॅनरमुळे औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा तापणार

Aurangabad Renaming: हर्षवर्धन जाधव यांनी 'छत्रपती संभाजीनगरच काय झालं?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

Aurangabad Renaming: गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या नामांतराचा (Aurangabad Renaming) मुद्दा प्रलंबित असून, यावरून अनेकदा राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून शहरात लावलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा आहे. 'छत्रपती संभाजीनगरच (Chhatrapati Sambhaji Nagar) काय झालं?', असे म्हणत जाधव यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर नामांतराच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराचा मुद्दा गेली अनेक वर्षे चर्चेचा मुद्दा बनला आहे. दरम्यान यावरून अनेकदा राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. दरम्यान आता याच मुद्यावरून हर्षवर्धन जाधव यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. जाधव यांनी जालना रोडवरील औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या आपल्या कार्यालयाबाहेर एक बॅनर लावले आहेत. ज्यात त्यांनी 'छत्रपती संभाजीनगरचं काय झालं?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

बॅनर काय लिहिले आहे? 

जाधव यांनी लावलेल्या बॅनरच्या सुरवातील वरच्या बाजूला 'फसव्या हिंदुत्ववाद्यांचा जाहीर निषेध' असा उल्लेख केला आहे. त्याखाली 'छत्रपती संभाजीनगरच काय झालं?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीमधील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांचा उल्लेख करून 'आम्ही संभाजीनगर केले असा उल्लेख आहे. त्याच्याच बाजूला शिंदे गट आणि भाजप यांचा उल्लेख करत 'आम्ही छत्रपती संभाजीनगर केले' असा उल्लेख आहे. शेवटी औरंगाबाद जिल्हाधिकारी यांचा उल्लेख करत; अशा प्रकारचे कुठले ही निर्णय झाल्याची माहिती आम्हाला नाही' असा उल्लेख करण्यात आला आहे. 

जाधवांची टीका.. 

दरम्यान याचवेळी हर्षवर्धन जाधव यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षावर नामांतराच्या मुद्यावरून टीका केली आहे. फसव्या हिंदुत्ववाद्यांनी हिंदूंची मते घेऊन 30 वर्षे हिंदूनाच फसविले असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. तर खोटं बोलणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा धिक्कार असो, अशी टीकाही यावेळी जाधव यांनी केली आहे. 

राजकीय वातावरण तापणार! 

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात श्रेयवाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आता जाधव यांनी पुन्हा एकदा औरंगाबादच्या  नामांतराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांच्या याच टीकेला आता शिंदे आणि ठाकरे गटाकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे जाधव यांनी शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे बॅनर लावल्याने त्याची शहरात जोरदार चर्चा होत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar on Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईलLaxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगेManoj Jarange Sambhajinagar PC : काही जणांना थुंका चाटायची सवय असते,  लक्ष्मण हाकेंना टोलाABP Majha Headlines :  12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Embed widget