एक्स्प्लोर

Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी साजरी केली शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी

Maharashtra Aurangabad News : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधील शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.

Maharashtra Aurangabad News : औरंगाबादसह (Aurangabad) मराठवाड्यात (Marathwada) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळीसारखा (Diwali 2022) सण कसा साजरा करावा, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी अशाच एका शेतकरी कुटुंबाची दिवाळी गोड केली. सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील आत्महत्याग्रस्त उबाळे आणि अन्वी येथील गाढवे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना दिवाळीनिमित्त कपडे, फटाके, मिठाई , जीवनावश्यक वस्तू, किराणा किट भेट देत कृषिमंत्री सत्तार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. तसेच उबाळे कुटुंबासह अन्वी येथील आत्महत्याग्रस्त गाढवे यांच्या वारसाला शासनाच्या वतीनं प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश मंत्री सत्तार यांच्या हस्ते देण्यात आला.

घरातील कर्ता पुरुष गेल्याने दिवाळीच्या सणावर दुःखाचे सावट होते. त्यात शेतात झालेल्या नुकसानीने आर्थिक परिस्थितीसुद्धा दिवाळी साजरी करण्यासारखी राहिली नाही. त्यामुळे उबाळे आणि गाढवे दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याचवेळी कृषिमंत्री यांनी या दोन्ही कुटुंबाला भेट देऊन त्यांची दिवाळी गोड केली. तर कृषिमंत्री आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आल्याने पीडित कुटुंबाला धीर मिळालाच, शिवाय काही अंशी दुःखातून देखील पीडित कुटुंबाला सावरण्यासाठी मदत झाली. तर या दोन्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबाला घरकुल आणि निराधार योजनेचा लाभ मिळवून देवू, असे मंत्री अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडीओ : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी साजरी केली शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी

सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या...

सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील शेतकरी विश्वास तेजराव उबाळे ( वय 37 ) यांनी 11 सप्टेंबर रोजी आणि अन्वी येथील शेतकरी भास्कर रतन गाढवे ( वय 37 ) या शेतकऱ्याने 12 सप्टेंबर रोजी सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली होती. तर मयत विश्वास उबाळे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली , आई वडील, भाऊ असा परिवार आहे. तर अन्वी येथिल मयत भास्कर गाढवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई वडील असा परिवार आहे. 

आत्महत्या हा पर्याय नाही....

यावेळी बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले की, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही नसून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. प्रत्येक संकटावर मार्ग आहे. संकटे येतात , जातात मात्र आत्महत्या पर्याय नाही. आत्महत्या मुळे आपल्या कुटुंबाचे प्रश्न सुटत नाहीत, उलट यात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget