एक्स्प्लोर

Ahmednagar News: मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये

Maharashtra Water Shortage: उन्हाचा कडाका वाढल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका जनावरांनाही बसत आहे. पाणी नसल्याने नगर जिल्ह्यात चाऱ्याचे उत्पादन घटले आहे.

अहमदनगर: एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडतोय तर दुसरीकडे काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे. या पाणी टंचाईमुळे (Water Scarcity) अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. जिल्ह्याचा विचार केला तर सध्या जिल्ह्यात 13 लाख 16 हजार मोठी जनावरे आहेत. 2 लाख 83 हजार लहान जनावरे आहेत तर 14 लाख 79 हजार शेळी मेंढीची संख्या आहे. मागील पावसाळ्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने नगर दक्षिण च्या अनेक तालुक्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न देखील शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात 33 लाख 30 हजार मेट्रिक टन हिरवा चारा शिल्लक आहे. तर 10 लाख 32 हजार मेट्रिक टन कोरडा चारा शिल्लक आहे. हा चारा केवळ दीड महिना पुरेल एवढाच आहे. 

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाने तीन एकरवरील ऊस चाऱ्यासाठी मोफत दिला

दक्षिण नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अवर्षणप्रवण तालुके म्हणून ओळखले जातात. या भागात उन्हाळ्यात शेती सिंचनाचा प्रश्न उद्धवतो. परिणामी चारा उत्पादन घटते. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. नगर तालुक्यातही सध्या अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीये. हीच गोष्ट लक्षात घेऊन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी आपल्या शेतातील तीन एकर ऊस हा परिसरातील पशुपालकांसाठी मोफत देऊन टाकला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्न उपस्थित करत राजकारण करण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष मदत कशी मिळेल यासाठी आपण तीन एकर ऊस पशुपालकांना मोफत घेऊन जाण्यास सांगितल्याचे संदेश कार्ले सांगतात.

दरम्यान कार्ले यांनी आपल्या शेतातील ऊस मोफत दिल्याने मोठी मदत झाल्याचे महिला पशुपालक सांगतात. चारा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणी येत होत्या त्यातच दुधाला भाव नाही, त्यामुळे कसं करायचे ही चिंता लागली होती. पण कार्ले यांच्यामुळे जनावरांना चारा मिळाल्याने महिला पशुपालक द्वारका कोतकर यांनी कार्ले यांचे आभार मानलेत. सध्या नगर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चारा टंचाई निवारणासाठी त्याची मदत होऊ शकते. मात्र, दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याने मोठ्या प्रमाणावर पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची चिंता लागून राहिली आहे.

नगरमध्ये 5 दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी

नगर जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई असून नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाच-सहा दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टँकर्सवर अवलंबून राहावे लागत आहे. नगरमध्ये सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील 291 गावांत आणि 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

आणखी वाचा

पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget