एक्स्प्लोर

Ahmednagar News: मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये

Maharashtra Water Shortage: उन्हाचा कडाका वाढल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका जनावरांनाही बसत आहे. पाणी नसल्याने नगर जिल्ह्यात चाऱ्याचे उत्पादन घटले आहे.

अहमदनगर: एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडतोय तर दुसरीकडे काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे. या पाणी टंचाईमुळे (Water Scarcity) अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. जिल्ह्याचा विचार केला तर सध्या जिल्ह्यात 13 लाख 16 हजार मोठी जनावरे आहेत. 2 लाख 83 हजार लहान जनावरे आहेत तर 14 लाख 79 हजार शेळी मेंढीची संख्या आहे. मागील पावसाळ्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने नगर दक्षिण च्या अनेक तालुक्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न देखील शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात 33 लाख 30 हजार मेट्रिक टन हिरवा चारा शिल्लक आहे. तर 10 लाख 32 हजार मेट्रिक टन कोरडा चारा शिल्लक आहे. हा चारा केवळ दीड महिना पुरेल एवढाच आहे. 

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाने तीन एकरवरील ऊस चाऱ्यासाठी मोफत दिला

दक्षिण नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अवर्षणप्रवण तालुके म्हणून ओळखले जातात. या भागात उन्हाळ्यात शेती सिंचनाचा प्रश्न उद्धवतो. परिणामी चारा उत्पादन घटते. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. नगर तालुक्यातही सध्या अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीये. हीच गोष्ट लक्षात घेऊन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी आपल्या शेतातील तीन एकर ऊस हा परिसरातील पशुपालकांसाठी मोफत देऊन टाकला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्न उपस्थित करत राजकारण करण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष मदत कशी मिळेल यासाठी आपण तीन एकर ऊस पशुपालकांना मोफत घेऊन जाण्यास सांगितल्याचे संदेश कार्ले सांगतात.

दरम्यान कार्ले यांनी आपल्या शेतातील ऊस मोफत दिल्याने मोठी मदत झाल्याचे महिला पशुपालक सांगतात. चारा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणी येत होत्या त्यातच दुधाला भाव नाही, त्यामुळे कसं करायचे ही चिंता लागली होती. पण कार्ले यांच्यामुळे जनावरांना चारा मिळाल्याने महिला पशुपालक द्वारका कोतकर यांनी कार्ले यांचे आभार मानलेत. सध्या नगर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चारा टंचाई निवारणासाठी त्याची मदत होऊ शकते. मात्र, दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याने मोठ्या प्रमाणावर पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची चिंता लागून राहिली आहे.

नगरमध्ये 5 दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी

नगर जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई असून नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाच-सहा दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टँकर्सवर अवलंबून राहावे लागत आहे. नगरमध्ये सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील 291 गावांत आणि 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

आणखी वाचा

पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट

महत्त्वाच्या बातम्या

श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget