एक्स्प्लोर

अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन, मुख्यमंत्र्यांसमोर हातात हात

आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अब्दुल सत्तार मातोश्रीवर पोहचले होते. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी टीका करणारे चंद्रकांत खैरे देखील आपली बाजू मांडण्यासाठी पोहोचले होते. या संपूर्ण प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा नाट्याच्या दिवशी त्यांना समजावण्यासाठी गेलेले आंबादास दानवे देखील मातोश्रीवर पोहोचले होते.

मुंबई : मागील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राने अब्दुल सत्तार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात रंगलेला वाद पाहिला. हा वाद थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला. अखेर आज या दोघांचं मनोमिलन करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. दोघांमधील वाद मिटल्याचं मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. कालचं अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भेटीत औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत नेमकं काय घडलं तसेच त्यांच्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्याना दिली, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. त्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अब्दुल सत्तार मातोश्रीवर पोहोचले होते. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी टीका करणारे चंद्रकांत खैरे देखील आपली बाजू मांडण्यासाठी पोहोचले होते. या संपूर्ण प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा नाट्याच्या दिवशी त्यांना समजावण्यासाठी गेलेले अंबादास दानवे देखील मातोश्रीवर पोहोचले होते. अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरेंमधील समज-गैरसमज दूर झाले आहेत, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.  अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश मान्य केला आहे. तुम्हाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य होणार नाही असा शब्द दोघांनीही मुख्यमंत्र्यांना दिला आहे, असेही शिंदे यांनी सांगितलं. दोघांनीही एकत्र पक्षासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे. हे दोघेही पक्षवाढीसाठी काम करतील, आपली ताकद मोठी आहे आणि आता ही ताकत अजून वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितलं. हेही वाचा - अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरी चढू देऊ नका : चंद्रकांत खैरे आमच्यातील वाद मिटलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर चर्चा झाली. आता आम्ही पक्षशिस्तीनुसार काम करु. आगामी निवडणुकांसाठी हातात हात घेऊन काम करु, असे  चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि माझ्या गैरसमजातून काही गोष्टी झाल्या. मात्र आता पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आणि पक्षप्रमुखांच्या आदेशानुसारच काम होईल. पक्षाच्या आदेशाचं पालन होईल. आता पुढे कधीही असा वाद होणार नाही, असे मंत्री सत्तार म्हणाले. काय होता नेमका वाद? औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. कारण, अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या मीना शेळके (काँग्रेस) विजयी झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदाची माळ भाजपच्या एल. जी. गायकवाड यांच्या गळ्यात पडली आहे. उपाध्यक्षपद निवडणुकीत भाजपच्या गायकवाड यांना 32 तर महाविकास आघाडीच्या शुभांकी काजे (शिवसेना) यांना 28 मतं मिळाली. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या हातून गेलं, असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. अब्दुल सत्तार हे गद्दार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची जहरी टीका | Aurangabad | ABP Majha  चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली होती. खैरे म्हणाले की, आजच्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला अब्दुल सत्तारांचं मतदान मिळालं नाही. त्यामुळे सत्तारांना आता मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. खैरे म्हणाले होते की, अशा गद्दारांना (सत्तार) पक्षात राहण्याचा अधिकार नाही. अब्दुल सत्तार गद्दार आहेत असा एकेरी उल्लेख करत खैरे यांनी सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केला. खैरे म्हणाले की, सत्तार महायुतीचे मंत्री आहेत, तरीदेखील ते सहा सदस्यांना घेऊन भाजपकडे गेले. त्यांनी भाजपकडे जावं. मंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांची ताकद असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढावी आणि निवडून यावं. खैरे म्हणाले की, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण आजच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाला सत्तारच जबाबदार आहेत. या गद्दाराला पवित्र 'मातोश्री'च्या (शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) आत प्रवेश देऊ नका, अशी विनंती मी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व वादळाचा तीव्र तडाखा; लाखो रुपयांचे सोलर पंप उद्ध्वस्त, शेतकरी संकटात
अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व वादळाचा तीव्र तडाखा; लाखो रुपयांचे सोलर पंप उद्ध्वस्त, शेतकरी संकटात
Shreyas Iyer News : श्रेयस अय्यरकडे पहिली मोठी जबाबदारी, निवड समितीच्या बैठकीत होणार सहभागी अन्...; काय असणार पहिलं टार्गेट?
श्रेयस अय्यरकडे पहिली मोठी जबाबदारी, निवड समितीच्या बैठकीत होणार सहभागी अन्...; काय असणार पहिलं टार्गेट?
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Beed Crime News: लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
Maharashtra Rain Updates: मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Uday Samant: 'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
Uttamrao Jankar : मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला उत्तमराव जानकरांचा आरोप, धैर्यशील मोहिते पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर 
मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला उत्तमराव जानकरांचा आरोप, धैर्यशील मोहिते पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर 
Embed widget