एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Shravani Somwar : त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी फेरीला जायचंय, ही बातमी तुमच्यासाठी! ब्रह्मगिरी प्रदक्षिणा कशी करावी, जाणून घ्या एका क्लिकवर

Shravani Somwar : दर्शनासाठी हजारो भावी त्र्यंबक नगरीत दाखल होत असतात. दर्शनाबरोबरच येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा महत्त्वाची मानली जाते. पण नेमकी ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण कशी करावी कोणत्या मार्गाने करावी हे देखील महत्त्वाचं आहे.

नाशिक : श्रावण महिन्यात नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिराला (Trimbakeshwar Jyotirling Mandir) मोठा महत्त्व प्राप्त होतं. दर्शनासाठी हजारो भावी त्र्यंबक नगरीत दाखल होत असतात. दर्शनाबरोबरच येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा (Brahmagiri) महत्त्वाची मानली जाते आणि याच पार्श्वभूमीवर भाविक दर्शनासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा देखील पूर्ण करत असतात, पण नेमकी ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण कशी करावी कोणत्या मार्गाने करावी हे देखील महत्त्वाचं आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक भक्त येत असतात श्रावण महिन्यातील चारही सोमवारी अनेक भावी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला जात असतात. पहाटेपासूनच या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली जाते. सुरुवातीला महत्त्वपूर्ण असलेल्या कुशावर्त तीर्थात स्नान केलं जातं आणि यानंतर खऱ्या अर्थाने ब्रह्मगिरी प्रदक्षिणाला सुरुवात होते. अनेक भाविक रविवारी रात्री कुशावर्तापासून फेरीची सुरुवात करतात. ही फेरी साधारण 20 किलोमीटर, 40 किलोमीटरची अशा दोन मार्गाने असल्याचे भाविक सांगतात. ही सगळी प्रदक्षिणा अनवाणी होते. 

पहाटेपासून प्रदक्षिणेला सुरुवात

श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजे रविवारी किंवा सोमवारी पहाटे या प्रदक्षिणेला सुरुवात केली जाते. ब्रह्मगिरी फेरीची सुरुवात त्र्यंबकेश्वर शहरातील प्रसिद्ध असलेल्या कुशावर्त तीर्थापासून होते. या ठिकाणी स्नान करुन प्रदक्षिणेला सुरुवात करतात. तिथून सरळ बाहेर पडल्यानंतर नाशिकच्या दिशेने भाविक चालू लागतात. त्र्यंबकेश्वर शहरापासून दोन किलोमीटरचे अंतर पार केल्यावर पेगलवाडी फाट्याजवळ उजव्या हाताला प्रयागतीर्थ नामक कुंड लागते. या प्रयागतीर्थ कुंडाला फेरी मारुन भाविक घोटी मार्गाने पहिनेच्या दिशेने चालू लागतात. पावसाळ्यात ही फेरी होत असल्याने आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत भाविक अनवाणी पायाने अंतर कापत असतात. 

अन् पहिला टप्पा पार होतो...

प्रसिद्ध असलेल्या पहिने या निसर्गरम्य परिसरातून जात असताना साधारण तासाभराच्या अवधीनंतर उजवीकडे जाणारा रस्ता लागतो. एक रस्ता घोटीकडे तर दुसरा रस्ता खोडाळाकडे जात असतो. बाजूलाच भिलमाळ नावाचा छोटासा पाडाही लागतो. या परिसरात अनेक भाविक भक्त काही काळ विश्रांती देखील घेत असतात. भिलमाळ हे गाव सोडल्यानंतर काही अंतरावर धाडोशी हे गाव लागते. येथून काही अंतर पुढे गेल्यानंतर मुख्य रास्ता सोडून उजव्या बाजूला सिमेंटच्या रस्त्याने पुढे जावे लागते. पूर्वी हा रास्ता शेतातून जात होता. त्यावेळी भाविकांना चालणेही मुश्कील व्हायचे. स्थानिक शेतकऱ्यांची भीती असल्याने भाविकांकडून ती तुडवली जात असत. म्हणूनच आता स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटचा रस्ता म्हणजेच फेरी मार्ग बनवण्यात आला आहे. हाच सिमेंटचा रस्ता पार करत असताना घाट सदृश्य चढण दिसते. हा घाट उतरत असताना या ठिकाणी गौतम ऋषी यांचे मंदिर असून भाविक येथील दर्शन घेतल्यानंतर पुढे मार्गक्रमण करत असतात. इथे आल्यानंतर एक पहिला टप्पा पार झाल्याचे समाधान भाविकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते.

पुढचा मार्ग खडतर होतो...

दरम्यान गौतम ऋषींचे दर्शन घेतल्यानंतर यानंतरचा मार्ग अगदी खडतर होत जातो. निसरडे रस्ते, चिखल माती, त्यामुळे डोंगर उतरताना सांभाळून उतरावे लागते. तासाभराचे अंतर पार केले की, पुढचा आपला रस्ता हा आदिवासी पाड्यांमधून जातो. शेतीची कामे सुरु असल्याचे दिसते. परतीच्या रस्त्यावर डांबरी सडक लागल्यानंतर छोटी छोटी मंदिरेही रस्त्यात लागतात. याचबरोबर निसर्गाचा आनंद घेत, फोटो घेत, कुणी सेल्फी घेत पुढे मार्गक्रमण करत असतात.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा...एक आनंददायी प्रवास

दरम्यान शेवटच्या टप्प्यात भाविक तळेगाव-सापगाव गावाजवळ येत असतात. हाच त्र्यंबकेश्वर जव्हार मार्ग म्हणूनही ओळखला जातो. इथे आल्यानंतर आता काहीच अंतर शिल्लक राहिलेले असते. यावेळी भाविक मुख्य रस्त्याला लागून गौतमबारी, मग हळूहळू त्र्यंबकेश्वर शहर दिसू लागते. तसेतसे चालण्याची उर्मी वाढत जाते. गौतमबारीपासून अर्धा तासाचे अंतर पार करुन गेले की आपण पुन्हा त्र्यंबकेश्वर दाखल होतो आणि प्रदक्षिणा पूर्ण होते. एकूणच श्रावणात मोठ्या प्रमाणावर भाविक या ब्रह्मागिरी फेरीसाठी येत असतात. रोजच्या धावपळीतून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात जाता येते. त्यामुळे असं म्हटलं जात की, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा एक आनंददायी प्रवास आहे. विशेष म्हणजे श्रावणात पाऊस असताना प्रदक्षिणा करणे हा अनुभव खरोखरच अगदी वेगळा आहे.

हेही वाचा

आज नागपंचमी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि या दिनाचं महत्त्व

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget