Varun Dhawan Doughter Health Struggle: वरुण धवनच्या दीड वर्षांच्या लेकीला दुर्मिळ आजार; अडीच महिने तिचे संपूर्ण शरीर प्लास्टरमध्ये, वरुणने सांगितली वेदना
तो सहसा आपल्या मुलगी लाराबद्दल जास्त बोलत नाही, मात्र अलीकडेच त्याने तिच्या आरोग्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Varun Dhawan Doughter Illness: बॉलीवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhavan) गेल्या काही दिवसांपासून बॉर्डर 2 सिनेमावरून चर्चेत असला तरी तो सध्या फारसा चित्रपटांमध्ये दिसत नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो सध्या एका कठीण प्रसंगाला समोर जातोय. वरुण धवन याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक भावनिक आणि धक्कादायक गोष्ट नुकतीच उघड केली आहे. तो सहसा आपल्या मुलगी लाराबद्दल जास्त बोलत नाही, मात्र अलीकडेच त्याने तिच्या आरोग्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.
वरूण धवनच्या लेकीला 'हा' गंभीर आजार
वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल हे 3 जून 2024 रोजी मुलगी लाराचे आई-वडील झाले. मुलीच्या जन्मानंतर त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. पण आता वरुणने सांगितले की, त्याची दीड वर्षांची मुलगी ‘डेव्हलपमेंटल डिस्प्लेसिया ऑफ द हिप (DDH)’ या आजाराने त्रस्त होती. या आजारात मुलाच्या कंबरेचा सांधा योग्य ठिकाणी बसत नाही किंवा सॉकेटमधून बाहेर येतो. त्यामुळे चालण्यात अडचणी निर्माण होतात. काही वेळा एक पाय दुसऱ्यापेक्षा लहान किंवा मोठा दिसू शकतो, ज्यामुळे चालण्याची पद्धतही बिघडते.
View this post on Instagram
'तिचं संपूर्ण शरीर प्लास्टरमध्ये होतं..'
एका मुलाखतीत बोलताना वरुण म्हणाला, “माझ्या मुलीला DDH झाला होता. त्यामुळे तिला नीट चालता किंवा धावता येत नव्हतं. हा आमच्यासाठी खूप कठीण काळ होता.” त्याने पुढे सांगितले की, लारावर योग्य वेळी उपचार करण्यात आले. सुदैवाने तिला शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली नाही. एका विशेष प्रक्रियेद्वारे तिचा हिप योग्य ठिकाणी बसवण्यात आला. उपचारादरम्यान लाराला ‘स्पिका कास्ट’ म्हणजेच विशेष प्लास्टर लावण्यात आले होते. जवळपास अडीच महिने तिचे संपूर्ण शरीर प्लास्टरमध्ये होते. “तिला भूल देण्यात आली होती आणि ती उठली तेव्हा तिचं पूर्ण शरीर प्लास्टरमध्ये होतं, हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता,” असे वरुणने सांगितले. सध्या तिचे प्लास्टर काढण्यात आले असून ती हळूहळू बरी होत आहे. वरुणने सर्व पालकांना आवाहन केले की, मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. हा अनुभव शेअर करण्यामागे सहानुभूती नव्हे, तर जागरूकता वाढवणे हा उद्देश असल्याचे त्याने सांगितलं.






















