एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Popatlal Wedding : 'तारक मेहता...'मध्ये पोपटलालचं लग्न मोडलं, चाहते नाराज; निर्मात्यांनी सांगितलं कारण...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : बरीच वर्षे प्रेक्षक पोपटलालच्या लग्नाची वाट पाहत होते. मात्र, पोपटलालचे हे लग्न का मोडलं, या मागील कारण निर्मात्यांनी सांगितले आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांना चाहते मालिकेतील व्यक्तीरेखेवरून ओळखतात. या मालिकेतील पोपटलालचे लग्न अनेक वर्षांपासून जुळत नसतं. मात्र, सगळ्या अडचणींवर मात केल्यानंतर त्याचा साखरपुडा होतो, पण तोही मोडला जातो. यावरून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. पोपटलालचे हे लग्न का मोडलं, या मागील कारण निर्माते असित कुमार मोदी यांनी (Asit Kumar Modi) सांगितले  आहे.

डॉ. हाथीमुळे मोडलं पोपटलालचे लग्न

बरीच वर्षे प्रेक्षक पोपटलालच्या लग्नाची वाट पाहत होते. पोपटलाल स्वतः खूप दिवसांपासून वधू शोधत होता. पोपटलालला मधुबालाच्या रूपाने जोडीदार मिळाली पण त्यांचा साखरपुडाच मोडतो. डॉ. हाथीमुळे हे लग्न मोडते. डॉ हाथी सांगतात की,  पोपटलाल आणि मधुबाला यांच्यात थॅलेसेमियाची लक्षणे आहेत. हा एक अनुवांशिक आजार आहे, ज्यामध्ये हिमोग्लोबिनची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. जी भविष्यात घातक ठरू शकते. या कारणाने पोपटलालचे लग्न होत नसल्याने चाहत्यांना धक्काच बसला. 

असित कुमार मोदी यांनी सांगितले कारण...

'तारक मेहता का...'चे निर्माते असितकुमार मोदी यांनी 'ई टाइम्स'शी बोलताना सांगितले की, पोपटलालचे लग्न न झाल्याने प्रेक्षक किती निराश झाले आहेत याची मला कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.   पण प्रेक्षकांनी शोच्या कथेवर लक्ष केंद्रित करावे आणि थॅलेसेमियासारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती कशी केली जात आहे हे पाहावे असे आवाहनही त्यांनी केले. 

मालिकेत, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मधुबालाला सांगतात की त्यांच्या भावी मुलांना थॅलेसेमिया होण्याची 25 टक्के शक्यता आहे. हा एक गंभीर आजार आहे. हे ऐकून पोपटलाल आणि मधुबाला जड अंतःकरणाने लग्न मोडतात. या शोमध्ये पोपटलालची भूमिका अभिनेता श्याम पाठकने साकारली आहे.

''पोपटलालच्या लग्नापेक्षा जनजागृतीचा संदेश महत्त्वाचा...''

असित कुमार मोदी यांनी सांगितले की, ''पोपटलालचे लग्न होत नसल्याने प्रेक्षक निराश झाले आहेत, परंतु त्यांनी दुसऱ्या बाजूला लक्ष केंद्रित करावे अशी माझी इच्छा आहे. या एपिसोडच्या माध्यमातून समाजाला एक मजबूत संदेश देण्याचा आमचा उद्देश होता. पोपटलालच्या लग्नापेक्षा थॅलेसेमियाबद्दलचा संदेश देणे महत्त्वाचे होते, असे माझे मत आहे. त्यांचे लग्न अन्य कोणत्या तरी एपिसोडमध्ये होऊ शकते. पण थॅलेसेमियाबद्दल हा महत्त्वाचा संदेश देणे आणि जनजागृती करणे आवश्यक होते, असेही मोदी यांनी सांगितले. 

''थॅलेसेमियाबद्दल लोकांमध्ये फारशी जागृती नाही''

असितकुमार मोदी याने सांगितले की, आपल्या देशातील बरेच लोक अनेक आजारांबाबत फारसे जागरूक नाहीत, म्हणून आम्हाला जागरूकता निर्माण करण्यासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ची लोकप्रियता वापरायची होती. अशाप्रकारे जनजागृती करणे मला खूप उदात्त वाटले. शोचा निर्माता म्हणून मला प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नाही तर एक सामाजिक संदेशही द्यायचा होता. म्हणूनच आम्ही ते केले असल्याचे असित कुमार मोदी यांनी सांगितले. मला विश्वास आहे की लोक आमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील.

मनोरंजन आणि विनोदाच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाचा संदेश देत आहोत. मला माहीत आहे की प्रेक्षक थोडे निराश झाले असतील, पण पोपटलाल जसे कधीच आशा गमावत नाहीत, त्यांनीही निराश होऊ नये. अखेर पोपटलाल लग्न करणार असल्याचे ही असितकुमार मोदी यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

Samarth Marathi Movie: ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?
ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?
Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget