एक्स्प्लोर

मुंबईवरून आलात? थिएटरवरच अंघोळी आटोपा ! 'पुन्हा सही..'च्या टीमला गैरसोयीचा फटका

विशेष बाब अशी की भरत जाधव हे नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळात आहेत. त्यांच्याच नाटकाला असा अवमानकारक अनुभव येणं हे अत्यंत दुर्दैवी आहे असं नाट्यसंमेलनात बोललं जातं आहे.

नागपुरात नाट्यसंमेलन रंगतं आहे. महेश एलकुंचवार, प्रेमानंद गज्वी आदी मंडळी संमेलनाच्या केंद्रस्थानी आहेतच. पण हे संमेलन नागपुरात असल्यामुळे नितीन गडकरी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणं स्वाभाविक होतं. नाटयसंमेलन कुठेही झालं तरी त्याला राजाश्रय असतो. तो तो स्थानिक नेता या संमेलनाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदारी घेत असतो. पण नागपूर मात्र त्याला अपवाद ठरतंय की काय असं वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कारण या संमेलनात कला सादर करण्यासाठी मुंबईहून गेलेल्या नाटकाच्या टीमला मात्र अवमानकारक वागणूक मिळाल्याची घटना घडली आहे. या नाटकाचं नाव आहे पुन्हा सही रे सही. भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेल्या पुन्हा सही रे सही नाटकाचा प्रयोग संमेलनात ठेवण्यात आला होता. शुक्रवारी रात्री या नाटकाचा प्रयोग नागपुरात होता. त्यासाठी भरत जाधव विमानाने नागपुरात दाखल झाले. तर त्यांची इतर टीम आणि नेपथ्य बसने नागपुरात आलं. मुंबई ते नागपूर हा तब्बल २२ तासांचा प्रवास करून टीम प्रयोगाआधी काही तास नागपुरात पोचली. सलग २२ तास प्रवास करून थकलेल्या सहकलाकार, रंगमंच कामगार आदी मंडळींना विश्रांती अत्यावश्यक होतीच. शिवाय, रात्रीच्या प्रयोगासाठी तयार राहण्यासाठी अंघोळ-आवराआवर आवश्यक होती. ही टीम नागपुरात आल्यानंतर आयोजकांना साहजिकच फोन गेले. या फोनाफोनीत वेळ गेल्यानंतर संबंधित जागा शोधण्यासाठी तब्बल तीन तास ही बस नागपुरात फिरत राहीली. त्यानंतर आयोजकांशी संपर्क झाल्यानंतर कलाकारांना थेट थिएटरवर जाण्याचा सल्ला दिला गेला. कलाकारांनी थिएटरवरच फ्रेश व्हावं असाही सल्ला त्यांना दिला गेला. याबद्दल नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना, या नाटकातला एक कलाकार म्हणाला, 'तब्बल २२ तास प्रवास केल्यानंतर आम्ही कमालीचे थकलो होतो. साहजिकच थो़डा आराम, चहा आणि फ्रेश होणं अत्यावश्यक होतं. कारण सही हे नाटक कमालीचं जलद आहे. या नाटकासाठी खूप पळापळ असते. त्यामुळे आराम हवाच होता. एकतर काहीतरी संवादात गफलत झाली आणि आम्ही नागपुरातच फिरत राहीलो. त्यानंतर थिएटरवरच या असं आम्हाला सांगण्यात आलं. हे कमालीचं चीड आणणारं होतं. आमचे मुख्य कलाकार भरत जाधव याना आम्ही ही बाब सांगणार नव्हतोच. पण शेवटी त्यांच्या कानावर ही बाब गेलीच. त्यांनी आवर्जून आमची बाजू मांडली आणि मग आमची व्यवस्था झाली. पण त्यासाठी भरत जाधव यांना मध्ये पडावं लागलं. ' विशेष बाब अशी की भरत जाधव हे नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळात आहेत. त्यांच्याच नाटकाला असा अवमानकारक अनुभव येणं हे अत्यंत दुर्दैवी आहे असं नाट्यसंमेलनात बोललं जातं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भरत यांनी जातीने आपल्या टीमला मिळणाऱ्या वागणुकीकडे लक्ष दिलं. नाटक झाल्यानंतर ही टीम लगेच मुंबईच्या दिशेनं निघणार होती. त्यामुळे प्रयोगानंतर किमान सहकलाकारांना योग्य जेवण मिळेल की नाही याचीही खातरजमा भरत यांनी केली. त्यानंतर प्रयोग झाला. ..अन्यथा मीही येतो बसने भरत जाधव नेहमीच आपल्या सहकलाकारांची काळजी घेतात. आपल्या सहकलाकारांना मिळालेल्या वागणुकीने भरत कमालीचे नाराज झाले. त्यांनी सर्व कलाकारांची सोय केलीच. पण नागपुरातल्या गैरसोयीमुळे संतापलेल्या भरत यांनी आपल्या दुसऱ्या दिवशीचं विमान तिकीट रद्द करून पुन्हा आपल्या टीमसोबतच बसने मुंबई गाठण्याची तयारी दर्शवली होती असंही कळतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Star Pravah Marathi Serial Anandi: स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्रीची दमदार एन्ट्री; कथानक काय वळण घेणार?
स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्रीची दमदार एन्ट्री; कथानक काय वळण घेणार?
Raqesh Bapat: 'वैयक्तिक गोष्टींवर बोलून मर्यादा ओलांडल्या...'; विशालकडून राकेशच्या घटस्फोटाचा उल्लेख, बापट कुटुंबियांचा संताप, रितेश देशमुखकडे मोठी मागणी
'वैयक्तिक गोष्टींवर बोलून मर्यादा ओलांडल्या...'; विशालकडून राकेशच्या घटस्फोटाचा उल्लेख, बापट कुटुंबियांचा संताप, रितेश देशमुखकडे मोठी मागणी
Suraj Chavan Wife Sanjana Share Good News: 'लव्ह यू अहो...', सूरज चव्हाणच्या आयुष्यात आनंदाचा बहर; दहा दिवसांत बायकोकडून आणखी एक Good News
'लव्ह यू अहो...', सूरज चव्हाणच्या आयुष्यात आनंदाचा बहर; दहा दिवसांत बायकोकडून आणखी एक Good News
Anandi: आबांची नोकरी परत मिळवू शकेल का 'आनंदी'? रामनवमी विशेष एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? PROMO
आबांची नोकरी परत मिळवू शकेल का 'आनंदी'? रामनवमी विशेष एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? PROMO

व्हिडीओ

Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Mumbai News: एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
Embed widget