एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन
पुणे: ख्यातनाम अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन झालं. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असतानाच, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 44 वर्षांच्या होत्या.
'नाट्यत्रिविधा' या नाटकाचा प्रयोग सुरु होता. त्याचवेळी त्यांना रंगमंचावरच मृत्यूने गाठलं. धक्कादायक म्हणजे या नाटकाचा प्रयोग सुरु होता, त्यावेळी शेवटच्या प्रसंगाला डान्स करत असताना, अश्विनी यांनी गिरकी घेतली आणि त्याचवेळी त्या रंगमंचावर कोसळल्या. मात्र हा नाटकातीलच भाग आहे, अशीच धारणा उपस्थितांची झाली. त्यादरम्यानच पडदाही पडला, मात्र अश्विनी जमिनीवर कोसळल्या, त्या कायमच्याच.
रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाचं शेवटचं नृत्य सादर करण्यासाठी अश्विनी रंगमंचावर आल्या. भैरवी रागावर आधारित बंदिशीवर त्यांनी नृत्य करण्यास सुरूवात केली. नृत्य झालं आणि कार्यक्रमाच्या शेवटी तोल जाऊन त्या रंगमंचावरच कोसळल्या.
अश्विनी एकबोटे यांच्या अकस्मात निधनाने सिने-नाट्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे.
सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या 'गणपती बाप्पा माोरया' या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या.
अश्विनी यांनी अनेक मराठी चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी सिनेमात त्यांची भूमिका होती.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement