एक्स्प्लोर

Marathi Actor Suyash Tilak Stucks At Shrilanka Airport: श्रीलंकेत महाप्रलय, विमानतळावरच 24 तास अडकलेला मराठमोळा अभिनेता; अंगावर काटा आणणारा 'तो' प्रसंग

Marathi Actor Suyash Tilak Stucks At Shrilanka Airport: पूरपरिस्थितीमुळे अभिनेत्याला तब्बल 24 तासांहून अधिक काळ विमानतळावरच अडकून राहावं लागलं. या परिस्थितीचा अंगावर शहारे आणणारा अनुभव अभिनेत्यानं शेअर केलाय.

Marathi Actor Suyash Tilak Stucks At Shrilanka Airport: श्रीलंकेत महाप्रलय (Sri Lanka Flood) आलाय, पूरपरिस्थिती फारच गंभीर झाली आहे. मुसळधार पावसामुळे (Rain Updates) देशाचा मोठा भाग पाण्याखाली गेलाय. तर, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. पूर आणि भूस्खलनामुळे अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर बनलीय. आतापर्यंत या महाप्रलयात 56 जणांचा मृत्यू झालाय आणि 600 हून अधिक घरांचं मोठं नुकसान झालंय. अनेक घरं चिखलाखाली गाडली गेली आहेत आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे या दोन्ही जिल्ह्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. श्रीलंकेतील पूरपरिस्थितीचा फटका एका मराठी अभिनेत्याला (Marathi Actor) बसला आहे. पूरपरिस्थितीमुळे अभिनेत्याला तब्बल 24 तासांहून अधिक काळ विमानतळावरच अडकून राहावं लागलं. या परिस्थितीचा अंगावर शहारे आणणारा अनुभव अभिनेत्यानं शेअर केलाय.

मराठी अभिनेता सुयश टिळक (Marathi Actor Suyash Tilak) श्रीलंकेत उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे तिथल्या विमानतळावरच अडकून पडलेला. त्यानं यासंदर्भात एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. तसेच, त्यानं या परिस्थितीचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.  

सुयश टिळकनं शेअर केला अंगावर काटा आणणारा 'तो' अनुभव

मराठमोळा अभिनेता सुयश टिळकनं (Suyash Tilak) कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "तो सामान्य दिवस नव्हता आणि हे फोटो/व्हिडीओ सामान्य नाहीत... श्रीलंकेला मुसळधार पाऊस, चक्रीवादळ आणि पूर आला होता आणि आम्हाला इमिग्रेशन पूर्ण झाल्यानंतरच आम्हाला टेकऑफला विलंब झाल्याची आणि शेवटी रद्द झाल्याची बातमी मिळाली. माझ्यासोबत 21 जणांचा ग्रुप होता. ज्यांची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या मित्रांवर होती. एअरलाइनमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता होती, कारण त्यांच्याच देशात हाहाकार माजला होता. स्थानिक लोक कामावर येऊ शकले नाहीत. आपत्तीची परिस्थिती खरी होती. हवामान कोणत्याही विमानाच्या उड्डाणासाठी अजिबात अनुकूल नव्हतं."

"लवकरच लोकांचा ओरडाआरडा ऐकू येऊ लागला, ज्यांनी उड्डाणं रद्द केली होती आणि बाहेर पडू शकले नव्हते, ते 24 तास विमानतळावर अडकले होते आणि आम्हालाही असंच काहीसं अनुभवावं लागेल याची कल्पना नव्हती... सामान्य परिस्थितीत एअरलाइन्सनं भरपाई दिली असती. पण हा काही सामान्य दिवस नव्हता. त्यांच्यासाठी हा राष्ट्रीय आपत्ती होती. चक्रीवादळ आणि पावसानं देशाच्या 85 टक्के भागात पूर आला होता. प्रत्येक व्यक्तीचं मोठं नुकसान झालं होतं. विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनाही कामावर येणं कठीण झालं होतं. 40 पेक्षा जास्त मृत्यू, 80 पेक्षा जास्त बेपत्ता आणि 18 हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले होते आणि तरीही एअरलाइन्स आणि विमानतळ सुरू ठेवणं त्यांना भाग होतं. त्यामुळे ही एअरलाइन्सची चूक नव्हती की, ते कमी स्टाफमध्ये काम करत होते किंवा प्रत्येक विनंतीला 'नाही' म्हणत होते. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता...", असं सुयश टिळक म्हणाला. 

"मी अनेक अनोळखी लोकांना भेटलो, अनोळखी कथा ऐकल्या. काही निष्काळजी लोक एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांवर ओरडत होते, शिवीगाळ करत होते, आणि तिथे फक्त तीन स्त्रिया हजारो रागावलेल्या प्रवाशांना सांभाळत होत्या. अनेक फ्लाइट रद्द वा बदलल्या जात होत्या. श्रीलंकन लोक ज्यांची स्वतःची घरं गेली होती, कुटुंबे संकटात होती, भूस्खलन, पूरग्रस्त रस्ते, वाहनं, घरं, अडकलेले पर्यटक, अडकलेले स्थानिक, बाहेर प्रचंड गोंधळ चालू असताना विमानतळाच्या आत आणखी एक गोंधळ तयार होत होता.", असं सुयश म्हणाला. 

पुढे बोलताना सुयश टिळकनं सांगितलं की, "पर्यटक संयम गमावत होते, एअरलाइन्स कर्मचार्‍यांवर आणि मग एकमेकांवर राग काढत होते. प्रत्येकाला स्वतःला प्राधान्य हवं होतं, प्रत्येकाला घरी लवकर पोहोचायचं होतं. बर्‍याचजणांना ह्याची जाणीव नव्हती की त्यांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या स्थानिकांनी त्यांच्या स्वतःच्या घरी यापेक्षा खूप मोठं नुकसान सहन केलं आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

सुयश टिळकनं लिहिलंय की, "गेल्या 38 तासांत मी काही अद्भुत लोकांना भेटलो. पायलट्स, फ्लाइट अटेंडंट्स, ग्राउंड स्टाफ, क्लिनिंग क्र्यू, शेफ, वेटर्स, भारतीय, श्रीलंकन, दक्षिण आफ्रिकन, इंडोनेशियन, युरोपियन, एशियन, NRI, इंग्लिश—म्हणजे अक्षरशः संपूर्ण जग एकाच छताखाली होतं. आणि त्याचबरोबर काही अतिशय स्वार्थी लोकांनाही पाहिलं."

सुयश टिळक म्हणाला की, "प्रत्येक आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहिले. तिच्या छोट्याशा मुलाचं काय होणार याची तिला कल्पना नव्हती. काहींना फक्त स्वतःची काळजी होती. काहीजण स्वतःचं सर्व विसरून निस्वार्थपणे काम करत होते. काहीजण अत्यंत संयमी व्यावसायिक होते. हा एक असा वेडापिसा अनुभव होता जो पुन्हा कधी मिळेल असं नाही... even if I pay for it. एका बाजूला जबरदस्त विनोदबुद्धी आणि आशावाद पाहिला, तर दुसऱ्या बाजूला तीव्र नकारात्मकता… काहीजण अत्यंत मदतशील आणि सकारात्मक होते, तर काही सतत रडारड, तक्रारी आणि रागाच्या चेहऱ्यानं फिरत होते."

"मी स्वतः काही अतिशय अभिमानाचे क्षण अनुभवले. जेव्हा पर्यटकांनी मला 'हिरो' म्हटलं कारण मी माझ्या परीने जे शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न केला. आणि काही अतिशय खालचे क्षणही अनुभवले. जेव्हा मला जाणवलं की लोकांचा आत्मविश्वास उंच ठेवणं किती अवघड होत चाललं आहे… आणि मीच खचलो तर त्यांचं मनोबल कोसळेल. मी अतिशय विविध भावना आणि असंख्य कहाण्या अनुभवल्या... UL 141—तू कायम लक्षात राहशील, कायम जपला जाशील...", असं सुयश टिळकनं म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget