'राकेश एक नंबर डबल ढोलकी, तन्वी फेक माझ्यावर जळते...'; घरातून बाहेर येताच प्राजक्ताकडून स्पर्धकांचे खरे चेहरे उघड
प्राजक्ता शुक्रेने इव्हिक्शननंतर घरातल्या सदस्यांवर राग काढल्याचं दिसलं. सध्या ती वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतेय. तन्वीला माझ्याविषयी जेलसी वाटते असंही ती म्हणाली.

Prajakta shukre: बिग बॉसच्या घरातून प्राजक्ता शुक्रे बाहेर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून बाहेर आलेल्या सदस्यांनी आधीच घरातील लोकांचे खरे चेहरे उघड करून दाखवले आहेत. प्रत्येकाचं एकमेकांबद्दलचे मत वेगळं आहे. प्राजक्ता शुक्रेने इव्हिक्शननंतर घरातल्या सदस्यांवर राग काढल्याचं दिसलं. राकेश एक नंबर डबल ढोलकी आहे असं ती म्हणाली. तन्वीबद्दल बोलतानाही तिचा राग अनावर झाला होता. सध्या ती वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतेय. तन्वीला माझ्याविषयी जेलसी वाटते असंही ती म्हणाली. (Bigg Boss Marathi 6)
राकेश एक नंबर डबल ढोलकी ..
राजश्री मराठीला बोलताना प्राजक्ता राकेशविषयी म्हणाली 'काटा गॅंगमध्ये त्या ग्रुपमध्ये तन्वी कायम माझ्या विरोधातच राहिली आहे. ती कायम साखर गोळी म्हणताना दिसली. ती कायमसमोर वेगळं आणि मागे वेगळं बोलायची. बिग बॉसमध्ये काहीच बरोबर किंवा चूक असं नसतं, तो सगळा गेम असतो.
राकेश बापट हे माझ्यासाठी खूपच कॉन्ट्रॅक्टरी राहिला आहे. तो आधी खूप छान बोलायचा, बोलताना त्याचे शब्द फारच सौम्य असायचे पण नंतर तो नॉमिनेट मला करताना दिसायचा. तो मला 'खूप स्ट्रॉंग स्पर्धक' असल्याचं म्हणायचं आणि नॉमिनेट करताना 'तुला गेम कळत नाही' असं म्हणायचा. त्यामुळे मला आधी कळायचं नाही की हा नेमका कुठल्या दिशेने जातोय.
"आधीच्या दिवसांमध्ये राकेश खूप व्यवस्थित बोलायचं. नॉमिनेट केलं तरी माझ्यासमोर तो खूप नीट राहिलाय. नंतर इमोशनल होऊन म्हणायचा, 'हे सगळं गेम साठी आहे. मी असा नाही. पण मला नव्हतं करायचं.' पण तो नंतर पुन्हा ग्रुप डायनामिक साठी मला नॉमिनेट करायचा. त्याच्या या दोन बाजू मला कधीच कळलं नाही. राकेशशी कनेक्शन आहे असं मी म्हणणार नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आवडते तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट कसं बोलता. मला त्या गोष्टीचा खूप राग आला."
तन्वीला जेलसी वाटत असेल ..
तन्वीला ती फेक म्हणाली. "तन्वीला दुश्मन वगैरे म्हणून मी तिला महत्त्व देणार नाही.ती बिग बॉसच्या घरात जे काही करत होती ते गेमसाठी करत होती. प्राजक्ता घराबाहेर पडली तेव्हा दरवाजा बंद होताच तन्वीने प्राजक्ता घराबाहेर जावी हेच मला हवं होतं असं म्हटलेलं.त्यावर प्राजक्ता म्हणाली की या एका वाक्यातच तिने तिची जेलसीबाहेर काढली. ती असंही एकदा म्हणाली होती की हिच्यात असं काय आहे की सगळे हिच्याशी येऊन बोलतात .पण लोकांना ज्याच्या जन्यून vibe मिळते . त्याच्याशी ते बोलतात. तिचा ग्रुप मधले लोक सुद्धा माझ्याशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चढ उतारांवर व्यक्त झाले होते. मी उगाच तोंडावर आणि पाठीमागे बोलत नाही. तन्वीला माझ्या या गोष्टींशी जेलसी वाटत असेल की माझ्याशी कोणी का येऊन बोलत नाही. "
विशाल आणि अनुश्रीवर काय म्हणाली प्राजक्ता?
"दुसरीकडे, विशाल तो माझ्याविषयी काही चूक बोलला तरी माझ्यासमोर येऊन नंतर कबुली जायचं की असं असं झालं होतं मी असं बोललोय. त्यामुळे मला असं विश्वास येत गेला की याचं जे काही आहे ते तोंडावर आहे. दुसरीकडे विशालने मला एकदाही नॉमिनेट केलं नाही. त्यामुळे माझी निवड ही फारच क्लिअर होती. विशाल आणि अनुश्रीबद्दल प्राजक्ता म्हणाली, ' विशाल कायमच वेलकमिंग होता. 'माझ्या बहिणीसारखी आहेस वगैरे तू म्हणाला होता.' पाठीमागे तो काही बोलला नाही. आणि जे बोलला तो त्याने नंतर मला येऊन सांगितलं होतं की 'मी असं बोललोय' म्हणून. शेवटचे दोन एपिसोड माझ्यासाठी थोडे आश्चर्याचे होते. अनुश्रीबद्दल बोलायचं झालं तर ती कधीही पलटते. अनुश्रीचा पहिला पासून तोच गेम राहिला आहे. तिच्याकडून याची अपेक्षा आहे, विशालकडून नाही. प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल अशा हिशोबाने ते बोलतात. माझं तसं नव्हतं. माझ्या मनात जे असायचं तेच मी बोलायचंय." असं ती म्हणाली.
























