एक्स्प्लोर

Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: 'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया

Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर मराठी अभिनेत्यानं मोदींच्या आवाहनावर उपहासात्मक पोस्ट शेअर करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: देशासमोरील जागतिक आर्थिक आव्हानांच्या (Global Economic Challenge Facing The Nation) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना महत्त्वाचं आवाहन केलंय. पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा (Petrol and Diesel Prices) वापर कमी करा, खाद्यतेलाची बचत करा आणि अनावश्यक परदेश दौरे पुढे ढकला, असं आवाहन त्यांनी केलंय. त्यामागे केवळ बचतीचा संदेश नसून भारताच्या अर्थव्यवस्थेला (India's Economy) स्थैर्य देण्याचं मोठं आर्थिक गणित दडलेलं आहे. भारत दरवर्षी परदेशातून प्रचंड प्रमाणात कच्चे तेल (Crude Oil) आणि सोनं (Gold Rate) आयात करतो. या आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतात. त्यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो, रुपयावर दबाव वाढतो आणि आयात अधिक महाग होते. अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वेच्छेनं वापर कमी केल्यास देशाला अब्जावधी डॉलरची बचत होऊ शकते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आवाहन केल्यानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता एका मराठी अभिनेत्यानं (Marathi Actor) मोदींच्या आवाहनावर उपहासात्मक पोस्ट शेअर करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. 

मराठी अभिनेते विद्याधर जोशी (Marathi Actor Vidyadhar Joshi) यांनी फेसबुकवर एक उपहासात्मक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदींनी केलेल्या प्रत्येक आवाहनाचा दाखला देत, त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केलेत. तर, काही मुद्दे पूर्णपणे खोडून टाकले आहेत. मोदींनी पुढे वर्षभर सोनं विकत न घेण्याबाबत आवाहन केलेलं. त्यांच्या या आवाहनाबाबत बोलताना सोनं विकत घ्यावं हा विचार मनात येणं म्हणजे, मोठ्ठा विनोद, असं म्हटलं आहे. तर, इंधन बचत करण्यासाठी मोदींनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याचा सल्ला दिलेला. त्याबाबत बोलताना विद्याधर जोशी म्हणाले की,  पब्लिक ट्रान्सपोर्ट एकदा मोदी सर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर त्यांना गंमत कळेल...

अभिनेते विद्याधर जोशींनी पोस्टमध्ये काय म्हटलंय? (Vidyadhar Joshi On PM Modi Appeal)

काल फार disturbed होतो.. काय करावं सुचत नाही...
गेल्या 7 एक वर्षांत मी परदेश प्रवास केला नाही... आताचे तिकिटांचे दर आणि एकूण पाहता पुढे 2-4 वर्ष जाता येणार नाही... हो नाही म्हणायला दोन एक वर्षांत एखादी देशी ट्रिप होते... पण विमानाचं तिकीट लौकर आणि स्वस्त पडेल तेंव्हा काढतो... आत्ता महिन्यापूर्वी हिमालयात गेलो होतो, पण तेव्हा मोदी Sir काटकसरीच बोलले नव्हते... Work From Home माझ्या बाबतीत शक्य नाही (आरशात बघून Acting करायला लागेल)... पब्लिक Transport एकदा मोदी Sir मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर त्यांना गंमत कळेल... (बरं आमचं work place असत म्हड, घोडबंदर रोड, mira रोड ... पोचेपर्यंत माझं वय वाढेल...)
तेलाचं म्हणाल तर आमच्या घरी 'तळण' कमीच असतं... माझी शेती नाही... ऑरगॅनिक पटकन मिळतं असं नाही, मिळालं तरी परवडेल असे भाव नसतात... सोनं विकत घ्यावं हा विचार मनात येणं म्हणजे, मोठ्ठा विनोद... स्वदेशी बद्दल बोलून उपयोग नाही... साध चिनी वापरायचं नाही ठरवलं तरी शक्य नाही हे मोदी sir ही मान्य करतील!!!... घरात वीजही जपून वापरतो.
करू काय आता????

(त्यातल्या त्यात मुंबई इमारती म्हणा किंवा एकूणच जो विकास झालाय त्यानं उष्णता इतकी वाढली आहे की, गच्चीवर तवा ठेवून पोळ्या भाजता येतात का बघावं म्हणतो!!!)

नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? (Narendra Modi On Gold Petrol Diesel)

  • सोन्याची खरेदी टाळा
  • पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा 
  • वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
  • परदेश प्रवास टाळा
  • खाद्यतेलाचा वापर कमी करा
  • नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
  • स्वदेशी उत्पादनं वापरा  

नरेंद्र मोदींच्या आवाहनामागील कारणं काय?

जागतिक बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे भारत सरकारवर देशाचा डॉलर साठा सुरक्षित ठेवण्याचा दबाव वाढताना दिसत आहे. भारताला तेल, गॅस, सोनं, खत यांसारख्या वस्तू मोठ्या प्रमाणावर आयात कराव्या लागतात आणि या व्यवहारांचे पेमेंट डॉलरमध्येच करावं लागतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या वस्तूंच्या किमती वाढल्या की, अधिक डॉलर खर्च करावे लागतात. परिणामी परकीय चलन साठ्यावर ताण निर्माण होतो आणि रुपयाची किंमतही दबावाखाली येते. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांना अनावश्यक खर्च टाळण्याचं आवाहन केलं जातंय. विशेषतः सोन्याची अतिरिक्त खरेदी, इंधनाचा जास्त वापर किंवा परदेश दौरे यांसारख्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा उपायांमुळे डॉलरची बचत होण्यास मदत होईल आणि देशाची आर्थिक स्थिरता कायम राखता येईल. पंतप्रधानांचे हे आवाहन केवळ आर्थिक शिस्तीचा संदेश नसून, जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी केलेला एक सावध आणि दूरदृष्टीचा निर्णय मानला जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Atul Kulkarni Sarcastic Post On NEET Paper Leak: 'NEET' पेपरफुटीवरुन अभिनेता अतुल कुलकर्णींचे सरकारला चिमटे; उपहासात्मक पोस्ट चर्चेत, म्हणाले..

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
Amitabh Bachchan On French Football Team: 'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
Zubair khan on Bigg boss 11: 'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Embed widget