एक्स्प्लोर

बॉक्स ऑफिसवर जेमतेम, ऑस्करच्या शर्यतीत अपयशी.. लेखकानं खर्चाचा विषय काढत करण जोहरला म्हटलं ..

हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या विभागात नामांकनासाठी पाठवण्यात आला होता, मात्र टॉप-5 मध्ये प्रवेश करू शकला नाही.

Homebound Oscar Exit: नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ या चित्रपटाला ऑस्कर 2026च्या नामांकनात अंतिम यादीत स्थान मिळवता आलं नाही. हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या विभागात नामांकनासाठी पाठवण्यात आला होता, मात्र टॉप-5 मध्ये प्रवेश करू शकला नाही. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे लेखक सुमित रॉय यांनी ऑस्कर मोहिमेतील अडचणी आणि खर्चांबाबत भाष्य करत करण जोहर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

कधी-कधी या मोहिमेचा खर्च चित्रपटाच्या बजेटपेक्षाही जास्त

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सुमित रॉय म्हणाले की, ऑस्करसाठी प्रमोशन करणं अत्यंत कठीण, गुंतागुंतीचं आणि खर्चिक असतं. “कधी-कधी या मोहिमेचा खर्च चित्रपटाच्या बजेटपेक्षाही जास्त होतो. बहुतांश भारतीय चित्रपटांसाठी हा प्रवास नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. मात्र, करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शन्स यांनी खूपच उत्तम काम केलं. आम्हाला सर्वोत्तम संधी मिळावी यासाठी त्यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. यापेक्षा अधिक आम्ही काही करू शकलो नसतो,” असं सुमित रॉय यांनी सांगितलं.

अकॅडमीच्या वॉटर्सचं लक्ष वेधणं हे मोठं आव्हान

लेखक सुमित रॉय पुढे म्हणाले की, इंटरनॅशनल कॅटेगरीमध्ये जगभरातील जवळपास 90 सर्वोत्तम चित्रपटांशी स्पर्धा असते.“सर्वात मोठं आव्हान म्हणजे अकॅडमीच्या मतदारांचं लक्ष वेधून त्यांना मतदानापूर्वी आपला चित्रपट पाहण्यासाठी प्रवृत्त करणं. यासाठी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर करणं महत्त्वाचं ठरतं. यामुळे चित्रपटाबाबत चर्चा आणि उत्सुकता निर्माण होते आणि वोटर आपला वेळ देऊन चित्रपट पाहतात,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चांगल्या कथांना पाठिंबा देणाऱ्या निर्मात्यांची गरज

भारतीय चित्रपटसृष्टीबाबत बोलताना सुमित रॉय म्हणाले,“आपल्याकडे जगातील सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रींपैकी एक आहे. भारत हा कथांचा महासागर आहे आणि आपल्या देशात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञ आणि फिल्ममेकर आहेत. ऑस्कर आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील नामांकनामुळे आपल्या सिनेमाला जागतिक स्तरावर ओळख मिळते. आपल्याला अशा निर्मात्यांची आणि कलाकारांची गरज आहे, जे चांगल्या कथा आणि चांगल्या दिग्दर्शकांना पाठिंबा देतील. धाडसी आणि स्वतंत्र चित्रपटांना साथ देणारे अधिक निर्माते पुढे आले, तर आंतरराष्ट्रीय ओळख आपोआप मिळेल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

‘होमबाउंड’ला समीक्षकांची प्रशंसा

नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत दिसले होते. चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपट विशेष यश मिळवू शकला नाही. दरम्यान, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर ‘होमबाउंड’चं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं आणि सर्व स्तरातील प्रेक्षकांनी चित्रपटाला पसंती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget