एक्स्प्लोर

आमच्यात 4 महिने बोलणं बंद, अचानक मेसेज आला अन्... रांगड्या 'राणा दा'ची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी कशी? म्हणाला , अक्षया..

पण अक्षया आपल्या आयुष्यात यायला पाहिजे हे कधी वाटलं? कशी होती राणादा आणि अंजलीची खरा आयुष्यातील लव स्टोरी? हे अभिनेता हार्दिक जोशीने एका मुलाखतीत सांगितला आहे. 

Hardik Joshi: मराठी मालिका विश्वात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. पण काही भूमिका या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणाऱ्या असतात. याच भूमिकांमधील आजही लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी याची. त्याच्या करिअर मधला हा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता. या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आजही तो राणादा म्हणूनच ओळखला जातो. विशेष म्हणजे या मालिकेतील अंजली बाई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षय देवधर हिच्याशी खऱ्या आयुष्यातही हार्दिकने लग्न केल्याने या दोघांच्या वैयक्तिक आयुष्य विषयीही प्रेक्षकांना कायम कुतूहल असते. दोघांच्याही वेगवेगळ्या जीवनशैली, जडणघडण होती.. पण अक्षया आपल्या आयुष्यात यायला पाहिजे हे कधी वाटलं? कशी होती राणादा आणि अंजलीची खरा आयुष्यातील लव स्टोरी? हे अभिनेता हार्दिक जोशीने एका मुलाखतीत सांगितला आहे. 

हार्दिकच्या आधी त्याच्या आईनेच घातली अक्षयला मागणी

मित्र म्हणे या podcast मध्ये हार्दिक म्हणाला' मी कधीच असा विशिष्ट विचार केला नव्हता. कारण माझ्याबद्दल तिला सगळंच माहिती होतं. माझ्या आयुष्यातलं बरंच तिला माहीत होतं. हे माहीत असण्याचं कारणही तुझ्यात जीव रंगला ही मालिकाच होती. जेव्हा आपण एकत्र मालिका करतो तेव्हा प्रत्येकाच्या फॅमिलीबद्दल, आयुष्याबद्दल गोष्टी माहित होतात. मालिकेपूर्वी आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो. मालिका सुरू झाली तेव्हा हे दुसऱ्या शेड्युलला अक्षया यायची.  नंतर आमची ओळख झाली. मालिकेच्या शूटिंगसाठी आम्ही तिकडेच असायचं. त्यामुळे आई वडील यायचे, भेटायचे.. नंतर 2018 मध्ये माझ्या आईने अक्षयला विचारलं की माझ्या मुलाशी लग्न करशील का? आणि तिने हे अक्षयला विचारलं हे मला कळलं सहा सात महिन्यांनी. आणि आईची इच्छा होती की जर तुला सून म्हणून आणायचे असेल तर अक्षयाशी तुला बोललं पाहिजे. नंतर आई माझी मागेच लागायला लागली. यावर अक्षयाच म्हणणं होतं की आधी तुमच्या मुलाशी बोलून बघा."

कुणालाही वाटेल बायको हवी तर अक्षयासारखी...

"मालिकेत असताना मैत्री पलीकडे आमच्यात काहीही नातं नव्हतं. एक चांगली मैत्रीण अशीच माझ्या मनात तिची प्रतिमा होती. अक्षय अशी मुलगी आहे की तिला बघून कोणालाही वाटेल की बायको असावी तर अक्षयासारखी. कारण ती घराला प्राधान्य देते. समोरच्याला आदर देते. समोरच्याच्या प्रोफेशनचा रिस्पेक्ट करते. आणि आम्ही एकाच क्षेत्रात आहोत त्यामुळे तिला माझं काम माहिती मला तिचं माहिती. आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो याबाबतीत. नंतर मग मी एक दिवस ठरवलं की आई एवढं बोलते तर आता जातोच. " असं हार्दिक म्हणाला 

आमच्यात चार महिने बोलणं बंद होतं 

आईने तिला लग्नाबद्दल विचारल्यानंतर आमच्यात बोलणं बंद झालं होतं.  मालिका झाल्यानंतर 2022 मध्ये मी तिला लग्नासाठी विचारलं. मी आधी लग्नाचा विषयच सोडला होता. मी  व्हिसाच्या कामासाठी घरी गेलो होतो. आज जर बोलला नाहीस तर बघ असं मला बजावण्यात आलं. भाऊ खाली उभारला होता. मग मी अक्षयाच्या घरी गेलो. तिच्या वडिलांना म्हणालो की मी किती फटका आहे हे तुमच्या मुलीला माहित आहे. मी माणूस म्हणून कसा आहे हेही तिला माहित आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता हे माहिती होतं. चार महिन्यानंतर मला रिप्लाय आला. मला अक्षयाच्या आईचा फोन आला. ती म्हणाली मेसेज वाचलास का? मला वाटलं गुड मॉर्निंगचे फोटो असतील. थांबा बघतो म्हणून मी पाहिलं .  असही तो म्हणाला.

थेट लग्नाच्या तारखा समोर....

मी शूटसाठी रस्त्यावरून चालत जात होतो. मेसेज बघून  जिथल्या तिथे थांबलो. माझ्यासमोर लग्नाच्या तारखा होत्या. 22 एप्रिलला मला फोन आला. लवकरात लवकर भेटायचं आहे या तारखेला. 27 एप्रिलला मी भेटलो. आणि अक्षय म्हणाली की मला तीन महिलाच साखरपुडा करायचा आहे. तुला काय करायचं आहे ते तू कर. माझा शूटिंगचा पहिला दिवस होता. त्यामुळे मी म्हणालो की पहिलाच दिवशी असं कसं सांगणार की माझं साखरपुडा आहे आणि मला सुट्टी हवी आहे. अक्षयाच ठरलं होतं की अक्षय तृतीया आहे माझा वाढदिवस असतो त्याच दिवशी मला साखरपुडा करायचा आहे. मी तयार झालो. दादा आणि वहिनीने सगळं मॅनेज केलं होतं. ठाण्यात आमच्या साखरपुडा झाला. असं हार्दिकने सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रिलीजला अजून 9 दिवस बाकी… पण ‘धुरंधर 2’ने आधीच बॉक्स ऑफिस हलवलं; अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा तुफान रेकॉर्ड!
रिलीजला अजून 9 दिवस बाकी… पण ‘धुरंधर 2’ने आधीच बॉक्स ऑफिस हलवलं; अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा तुफान रेकॉर्ड!
"सरकारविरोधी बोललात तर मृत्यूची भीती" ; ‘मस्ती 4’ अभिनेत्री इराणबाबत थेटच बोलली, म्हणाली, 'भारतात किमान..'
पाकिस्तानी निर्मात्याचा मोठा निर्णय! रवींद्रनाथ टागोरांची 130 वर्ष जुनी कथा पडद्यावर आणणार, दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळणार?
पाकिस्तानी निर्मात्याचा मोठा निर्णय! रवींद्रनाथ टागोरांची 130 वर्ष जुनी कथा पडद्यावर आणणार, दिग्दर्शनाची धुरा कोण सांभाळणार?
Amitabh Bachchan: टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...'
टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
Embed widget