एक्स्प्लोर

David Dhawan On Rakesh Bedi: 'अरे तुझी तर चालच बदलली..'धुरंधर 2’ हिट होताच राकेश बेदींच्या डोक्यात हवा गेली? डेविड धवन यांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले..

Devid Dhawan Comment On Rakesh Bedi: ‘धुरंधर’मधील राकेश बेदी यांची भूमिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंग आणि संवादांची प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळत आहे.

Dhurandhar Rakesh Bedi:केवळ देशभरातीलच नाही तर जगभरात दणक्यात कमाई करणाऱ्या धुरंधर2 (Dhurandhar 2) चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. या चित्रपटाच्या यशामुळे अनेक कलाकारांना नवी ओळख मिळाली आहे. रणवीर सिंगचा अभिनय, त्याचा लूक आणि त्याचे केस या सर्वांनी प्रेक्षकांना वेड लावलं, पण आणखी एक अभिनेता आहे ज्याने सर्वांची मने जिंकली आहेत. हा अभिनेता नवोदित नसला तरी, या चित्रपटातील त्याच्या अप्रतिम अभिनयाचे कौतुक केल्याशिवाय लोक राहू शकत नाहीत. चित्रपटात ‘जमील जमाली’ या भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यांच्या लोकप्रियतेत अचानक प्रचंड  वाढ झाली. सध्या सर्वत्र त्यांच्या अभिनयाचं कौतुक होत असून, या यशाबाबत दिग्दर्शक डेविड धवन यांनी दिलेल्या  प्रतिक्रियेची एकच चर्चा आहे. (Devid Dhawan Comment On Rakesh Bedi)

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कमाई करत अनेक रेकॉर्ड्स केले. या चित्रपटामुळे अनेक जुन्या कलाकारांना नव्याने ओळख मिळाली, त्यात राकेश बेदी यांचं नाव आघाडीवर आहे. याआधी त्यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं असलं, तरी ‘धुरंधर’सारखी लोकप्रियता त्यांना याआधी कधी मिळाली नव्हती.

उत्कृष्ट अभिनेता, पण उशिरा मिळालं यश

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत डेविड धवन यांनी सांगितलं की त्यांची आणि राकेश बेदी यांची मैत्री जवळपास 50  वर्षांपासून आहे. दोघांनीही Film and Television Institute of India (एफटीआयआय), पुणे येथे एकत्र शिक्षण घेतलं होतं. त्या दिवसांच्या आठवणी आजही ताज्या असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे म्हटलं की, राकेश बेदी हे नेहमीच उत्कृष्ट अभिनेता होते, पण त्यांना हक्काची ओळख आता मिळत आहे.

‘तुझी तर चालच बदलली रे!’

राकेश बेदी यांच्या यशाबाबत बोलताना डेविड धवन यांनी नेहमीच्या विनोदी शैलीत म्हटलं, “आता त्याच्या चालण्यातच एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो. मी त्याला मजेत म्हटलं, ‘यार, तुझी तर चालच बदलली!’” अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेल्या या यशामुळे त्यांच्यात आलेला बदल स्पष्ट दिसतोय, असंही डेवीड धवन यांनी  सांगितलं.

दरम्यान, ‘धुरंधर’मधील राकेश बेदी यांची भूमिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंग आणि संवादांची प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळत आहे. याचमुळे त्यांना नव्याने लोकप्रियता मिळाली असून इंडस्ट्रीतील दिग्गजही त्यांच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tv Actress: लग्नाआधीच बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक झाली TV अभिनेत्री; पूलमध्ये केलं किस अन्..मोनोकनीमधील बोल्ड लूक
लग्नाआधीच बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक झाली TV अभिनेत्री; पूलमध्ये केलं किस अन्..मोनोकनीमधील बोल्ड लूक
'आशा आईंची 'ती' इच्छा, त्यांना राजा शिवाजी सिनेमा...'; रितेश देशमुख भावूक, आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा
'आशा आईंची 'ती' इच्छा, त्यांना राजा शिवाजी सिनेमा...'; रितेश देशमुख भावूक, आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा
Sharad Ponkshe: 'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी
'नराधमाला भरचौकात.... पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी
Raja Shivaji: मालिकेतून थेट मोठ्या पडद्यावर! 'मुरांबा' फेम अभिनेत्री 'राजा शिवाजी' सिनेमात झळकली, 'हिला' ओळखलंत का?
मालिकेतून थेट मोठ्या पडद्यावर! 'मुरांबा' फेम अभिनेत्री 'राजा शिवाजी' सिनेमात झळकली, 'हिला' ओळखलंत का?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Amit Thackeray on Nasrapur Rape case: नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
Embed widget