Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. इंद्राच्या कामाचे सत्य अखेर देशपांडे सर आणि इंद्राच्या आईसमोर आले आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. देशपांडे सरांनी इंद्रा-दीपूचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. 


देशपांडे सर मोडणार इंद्रा-दीपूचे लग्न


'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात देशपांडे सर इंद्रा-दीपूचे लग्न मोडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये देशपांडे सर आणि दीपू साळगावकरांच्या घरी गेलेले दिसत आहेत. दरम्यान देशपांडे सर इंद्राच्या आईला म्हणत आहेत, मी माझ्या मुलीचा हात गुंडाच्या हातात देणार नाही...हे लग्न इथेच मोडलं असं समजा... त्यानंतर देशपांडे सर आणि दीपू रिक्षा पकडून घरी जायला निघतात. दरम्यान इंद्रा एका कोपऱ्यात रडत बसलेला दीपू पाहते. देशपांडे सरांना विरोध करत इंद्राकडे जाते. त्याला म्हणते, इंद्राजी मी काहीही झालं तरी तुमची साथ सोडणार नाही."






कितीही संकट आलं तरी दीपिका इंद्राची साथ सोडणार नाही


दीपू आणि इंद्राचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाचा स्वीकार दीपिकाच्या आईने केला आहे. तसेच इंद्रा-दीपूच्या प्रेमाचा जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा तेव्हा मी दीपिकाच्या बाजूने उभी राहिल असे दीपिकाची आई इंद्राला म्हणते. त्यामुळेच दीपिका म्हणते, कितीही संकट आलं तरी दीपिका इंद्राची साथ सोडणार नाही. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : देशपांडे सरांसमोर येणार इंद्राची खरी ओळख; आज रंगणार एक तासाचा विशेष भाग


Man Udu Udu Zhala : इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य देशपांडे सरांसमोर उघडकीस; सानिका टाकणार मिठाचा खडा