एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगनाची पोस्ट इन्स्टाग्रामकडून डिलिट; कारवाईवर कंगना म्हणते...

मी इन्स्टावर येऊन दोन दिवस झाले नाहीत तर त्यांनी माझी पोस्ट डिलिट केली. मी बहुधा फारतर आठवडाभर या इन्स्टावर टिकेन, असं कंगनाने म्हटलं. 

मुंबई : कंगना रनौतला आता ट्विटरपाठोपाठ इन्स्टाग्रामचाही फटका बसला आहे. कंगनाच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर ट्विटरने तिचं अकाऊंट सस्पेंड केलं होतं. त्यानंतर त्यावर संताप व्यक्त करताना, व्यक्त व्हायला आणि आपल्या सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी इतर व्यासपीठंही आहेत. आपण तिथे आपल्याला वाटतं ते बोलत राहू असं म्हटलं होतं. त्यानुसार कंगना तातडीने इन्स्टाग्रामवर आली. 

इन्स्टावर येऊन काही दिवस लोटतात न लोटतात तोच आता इन्स्टाग्रामने थेट तिची एक पोस्ट डिलीट करून टाकली आहे. त्याचं झालं असं की, कंगनाने इन्स्टाग्रामचा वापर जोरदार चालवला होता. यातच आपण कोविड पॉझिटिव्ह आल्याची माहितीही तिने इन्स्टावरून शेअर केली. स्थितप्रज्ञ मुद्रेतला एक फोटो तिने शेअर केला होता. कोविडची माहिती देतानाच हा व्हायरस आता माझ्या आत पार्टी करतोय आणि मला त्याची कल्पना नव्हती. पण आता मी याला पळवून लावेन, अशा आशयाची पोस्ट लिहिली होती. वाद त्यावरून नव्हता. कोविडबद्दल बोलताना कोरोना हा एक छोटा फ्लू असल्याचं विधान तिने केलं होतं. त्यावरून कंगनावर बरीच टीका झाली. 

कंगनाने ही पोस्ट केल्यानंतर अनेक लोक तिच्यावर भडकले. ते साहजिकच होतं. कारण, कोरोनाने प्रत्येकाने आपला कोणीतरी मित्र, स्वकीय, नातेवाईक गमावला आहे. त्यामुळे कंगनाचं हे विधान हे एका अर्थाने त्यांच्या दु:खावर मीठ चोळण्यातला प्रकार होता. त्याची दखल इन्स्टाग्रामने घेतली आणि तिची ती स्टोरी इन्स्टाने तातडीने खाली ओढत डीलीट केली. ही बाब कंगनाला कळल्यावर पुन्हा तिचा तीळपापड होणं साहजिक होतं. या गोष्टीची दखल घेत कंगनाने इन्स्टाग्रामवरही आपण फार काळ टिकणार नाही, बहुधा असं स्पष्ट केलं आहे. मी इन्स्टावर येऊन दोन दिवस झाले नाहीत तर त्यांनी माझी पोस्ट डीलीट केली. मी बहुधा फारतर आठवडाभर या इन्स्टावर टिकेन असं ती म्हणते. 

ट्विटरवर कंगना सातत्याने बोलत होती. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिने ट्विटरचा यथेच्छ वापर केला. यात तिने बॉलिवूडच्या बड्या निर्मात्यांना बोल लावलेच पण त्या पलिकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा उल्लेखही अवमानकारक केला. त्यानंतर वेळोवेळी कंगना बोलत राहिली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यानंतर त्याबद्दलची अनेक वक्तव्ये तिने ट्विटरवर केली. तिथे हिंसा होत असल्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले. लोकशाही मानणाऱ्या भारतासारख्या देशात लोकशाहीचा प्रचंड आदर होतो. त्या पश्चिम बंगालच्या जनतेने केलेल्या मतदानाचा अवमान कंगनाने केल्यानंतर मात्र ट्विटरने तिचं अकाऊंट सस्पेंड केलं होतं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Embed widget