एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रितेश देशमुखचं स्तुत्य पाऊल, जलयुक्त लातूरसाठी निधी
![रितेश देशमुखचं स्तुत्य पाऊल, जलयुक्त लातूरसाठी निधी Actor Rietesh Deshmukh Donates 25 Lacs For Jalyukta Latur रितेश देशमुखचं स्तुत्य पाऊल, जलयुक्त लातूरसाठी निधी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/23132530/Riteish-Deshmukh-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्याची भर पडली. कौतुकास्पद बाब म्हणजे बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने हे पाऊल उचललं आहे.
रितेश देशमुखने जलयुक्त लातूरसाठी 25 लाखांचा निधी दिला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या या लेकाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूरकरांसाठी मदतीचा हात दिला आहे.
राज्यातील दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी अभिनेता आमीर खान आणि लेखक- दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने ‘पाणी फाऊंडेशन’मार्फत राज्यभरात गावागावात जाऊन जलसंधारणाची कामं करण्यात येत आहेत. आमीर – सत्यजीतची या कामांसाठी भन्नाट कल्पना आहे.
‘पाणी फाऊंडेशन’ने ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘पाणी फाऊंडेशन’च्या या उपक्रमाशी सचिन तेंडुलकर, रतन टाटा यासारख्यांचाही सहभाग आहे.
आमीरची 'वॉटर कप स्पर्धा' जोमात, दुष्काळ कायमचा हटवण्याचा निर्धार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी अक्षयने 50 लाखांची मदत केली आहे. अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करत असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं होतं.अक्षयकुमारची महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना 50 लाखांची मदत
अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्यास सुरुवात केल्यानंतर बळीराजाला मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता आमीर खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत केली होती.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
कोल्हापूर
सोलापूर
रत्नागिरी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion