Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Deepali Sayed Post After Elimination: शेवटी पाचव्या क्रमांकावर दिपाली सय्यदने फिनालेमधून निरोप घेतला. घरातून बाहेर आल्यानंतर दिपाली सय्यदने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची एकच चर्चा आहे. राकेश, विशाल,अनुश्री, आणि दिपाली या Top 4 सदस्यांना मागे टाकत तन्वी कोलतेनं बिग बॉसची ट्रॉफी उचलली. यात सर्वात कमी मतं मिळालेल्या दिपालीची विजेती होण्याची संधी हुकली . 5 लाख रुपयांचं बक्षीसही गेलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतात दिपाली सय्यदने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे . (Deepali Sayed Post After Elimination)
बिग बॉसच्या घराबाहेर पडताच दिपाली सय्यदची पोस्ट
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा काल महाअंतिम सोहळा पार पडला. शंभर दिवसांच्या प्रवासानंतर दिपाली सय्यद पाचव्या क्रमांकावर एलिमिनेट झाली. त्यानंतर अनुश्री माने घराबाहेर पडली. पण महाअंतिम सोहळ्यातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे रितेश देशमुख ने पैसे घेऊन स्वतःला एलिमिनेट करण्याची ऑफर दिलेली. आधी ही ऑफर तीन लाख रुपयांची होती. नंतर ती वाढवून चार लाख रुपये आणि शेवटी पाच लाख रुपये झाली. पण Top 5 मधील सर्व स्पर्धकांनी ही ऑफर नाकारली. शेवटी पाचव्या क्रमांकावर दिपाली सय्यदने फिनालेमधून निरोप घेतला. घरातून बाहेर आल्यानंतर दिपाली सय्यदने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
ती म्हणाली," टॉप फाइव्ह पर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी केवळ एक खेळ नव्हता, तर ते माझ्या आयुष्यातील एक मोठा स्वप्न होतं. थँक्यू बिग बॉस मला ही संधी दिल्याबद्दल आणि स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दिल्याबद्दल.! माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, तुमच्या अफाट प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच मी इथंवर पोहोचू शकले. तुम्ही दिलेला प्रत्येक वोट आणि दाखवलेला विश्वास हीच माझी खरी ट्रॉफी आहे. माझ्या पाठीशी खंबीरपणे सर्व उभे राहिले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. प्रवास संपला असला तरी या आठवणी कायम काळजात राहतील. हे प्रेम असंच कायम राहू द्या. " असं दिपाली सय्यद म्हणाली.
View this post on Instagram
चाहत्यांच्या कमेंट्स
दिपालीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत तिचा बिग बॉसमधील प्रवास चांगला झाल्याचं तिला कळवलंय. अनेकांनी 'पाच लाख मिळाले असते पण मोठी चूक केलीस. ' आपलेच गद्दार निघाले आता तरी समज, बाहेर आल्यावर त्यांची बाजू घेऊ नकोस ' अशा कमेंट्स केल्याचं पाहायला मिळत आहे.






















