एक्स्प्लोर

आमिरचं तिसरं लग्न कायदेशीर की बेकायदेशीर? काय सांगतो भारतीय कायदा? 

बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) आमिर खान (Aamir Khan) यानं त्याची जोडीदार गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्याशी लग्न केलंय.

दुसरी संधी फक्त कथांमध्ये मिळते, खऱ्या आयुष्यात नाही' असं म्हणतात...पण बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने ही म्हण खोटी ठरवली.... वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खानने आपल्या आयुष्याला एक नवी संधी दिलीये आणि त्याने प्रेयसी गौरीसोबत लग्न केलंय.. रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आमिरच्या वांद्रे येथील घरी अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार  पडला. या कोर्ट मॅरेजला गौरीचा पहिल्या लग्नाचा मुलगा आणि आमिरचा मुलगा आझाद दोघेही हजर होते. इतकंच नाही तर मुकेश अंबानी, आशुतोष गोवारीकर, आमिरचा मोठा मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा खान यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती.

पण आमिर खानच्या आयुष्याची ही कहाणी आजची नाही. आमिर जेव्हा फक्त २० वर्षांचा होता, तेव्हा त्याचं शेजारी राहणाऱ्या रीना दत्तावर प्रेम जडलं. खिडकीतून सुरू झालेलं हे प्रेम इतकं वाढलं की, १८ एप्रिल १९८६ ला दोघांनी घरच्यांपासून लपून कोर्टात अवघ्या १० रुपयांत लग्न केलं! लग्न झाल्यावर दोघेही ८ महिने आपापल्या घरी राहत होते.

जेव्हा रीनाच्या घरच्यांना हे समजलं, तेव्हा मोठा गदारोळ झाला. पण नंतर रीनाच्या वडिलांनी आमिरला स्वीकारलं. लग्न झाल्यावर आमिरचा 'कयामत से कयामत तक' रिलीज झाला आणि तो स्टार बनला. पण स्टारडम वाढलं तसं कुटुंबाला वेळ देणं कठीण झालं. अखेर १५ वर्षांनंतर, म्हणजेच २००१ मध्ये रीनाने आमिरचं घर सोडलं.

या घटस्फोटाने आमिर इतका तुटला की, तो प्रचंड दारू पिऊ लागला. जवळपास दीड वर्ष तो नैराश्यात होता. जुही चावला आणि अनिल कपूरसारख्या मित्रांनी त्याला सावरलं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला...

यानंतर आमिरच्या आयुष्यात आली किरण राव. 'लगान'च्या सेटवर किरण असिस्टंट डायरेक्टर होती. सुरुवातीला त्यांच्यात काही नव्हतं. पण २००४ मध्ये 'मंगल पांडे'च्या शूटिंगदरम्यान त्यांची जवळीक वाढली. एकदा किरणने आमिरला फोन केला, ती अर्ध्या तासाची चर्चा आमिरला एक नवा आनंद देऊन गेली. दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

किरणचे घरचे या लग्नाच्या विरोधात होते, कारण आमिर तिच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठा होता आणि घटस्फोटित होता. पण २८ डिसेंबर २००५ ला त्यांनी  लग्न केलं. त्यानंतर त्यांना 'आझाद' हा मुलगा झाला. पण २०२१ मध्ये, १६ वर्षांनंतर या दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. मात्र, आजही आमिर आपल्या दोन्ही माजी पत्नींना तितकाच मान देतो... त्यानंतर आज 5 जुलै रोजी अमिर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे..

तिसरं लग्न करणं कायदेशीर आहे का? 

भारतीय कायद्यानुसार, जर आधीच्या पत्नींसोबत कायदेशीररित्या घटस्फोट झाला असेल किंवा पती/पत्नीचे निधन झाले असेल, तर तिसरे लग्न पूर्णपणे वैध मानले जाते. जर घटस्फोट न घेता कोणी दुसरं किंवा तिसरं लग्न केलं, तर भारतीय न्याय संहितेच्या कलम ८२ नुसार तो गुन्हा ठरतो आणि ७ वर्षांची जेल होऊ शकते.

तर मित्रांनो, आमिर खानच्या या तिसऱ्या लग्नाबद्दल आणि त्याच्या या रंजक आयुष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget