एक्स्प्लोर

Yogendra Yadav Exclusive : एनडीएला बहुमत मिळून भाजपचं सरकार येईल, मात्र नंतर देशात लोकशाही नसेल : योगेंद्र यादव

मात्र या निवडणुकीनंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई : भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा अंदाज निवडणूक विश्लेषक आणि स्वराज्य इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. देशात भाजप सरकार येणार असून एनडीएला बहुमत मिळणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र या निवडणुकीच्या निकालानंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेसवर देखील टीका केली. काँग्रेस हा भाजपला सक्षम पर्याय नाही. भविष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही. काँग्रेस सर्वच आघाड्यावर अपयशी ठरली आहे. शेतकरी, बेरोजगारांसाठी काँग्रेस उभी राहिली नाही, असा आरोप यादव यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात भाजप शिवसेना वरचढ ठरणार असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कमी जागा मिळणार असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 'एक्झिट' पोल 'एक्झॅक्ट' पोल नसतो. मात्र सर्वच पोल एकाच दिशेने जात आहेत. सर्व पोल भाजपचे सरकार येणार असं म्हणत आहेत.  'एक्झिट' पोल करताना त्यांनी अभ्यास केलेला असतो. त्यामुळे त्यात तथ्य असते, असे ते म्हणाले. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, देशात आधी बूथ कॅप्चरिंग व्हायची, यावेळी पोल कॅप्चरिंग केलं आहे. पूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॅप्चर केली गेली आहे. यासाठी काठ्या, बंदुकी नव्हे तर कॅमेरा आणि टीव्हीच्या माध्यमांचा वापर केला गेला. पूर्ण देशाचे लक्ष्य मुख्य मुद्द्यांवरून भरकटवले गेले, असा आरोपही त्यांनी केला आहे. मतदार समजदार आहे मात्र भाजपने लोकांचा मेंदू कॅप्चर केला. मीडियाच्या माध्यमातून मेंदू कॅप्चर केला गेला. निवडणुकीत भाजपने खूप जास्त पैसे खर्च केले. आपण विचार देखील करू शकणार नाही, इतका पैसा भाजपने खर्च केला आहे. दुर्दैवाने निवडणूक आयोगाने संतुलित निष्पक्ष भूमिका बजावली नाही. निवडणूक आयोगाने एकतर्फी भूमिका अवलंबली, असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशात भाजपचे सरकार येईल, मात्र यानंतर देशात गंभीर असेल. दोन मोठ्या समस्या या देशासमोर उभ्या असणार आहेत. पहिली इलेक्टॉरेल ऍथॉरिटीरेनेस म्हणजे निवडणूक जिंकल्यानंतर कुणाचीही ऍथॉरिटी राहणार नाही, अशी भीती आहे. निवडणुकीनंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. दुसरं म्हणजे देशात बहुमतवाद देखील उफाळून येणार आहे. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. निकालानंतर जनादेशाचा सन्मान करायला हवा. ईव्हीएममधील घोटाळा वगैरे गोष्टी थोतांड आहे. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे. देशासमोर मोठे संकट येणार आहे. या संकटाचा सामना कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. देशाला या व्यवस्थेच्या विरोधात मोठी शक्ती निर्माण करावी लागणार आहे, असे यादव म्हणाले. पाच वर्षांपूर्वी काही राज्यांमध्ये भाजप नव्हती. आज त्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. दक्षिणेत देखील आज तशी स्थिती आहे, मात्र भविष्यात दक्षिणेतील राज्यातही भाजप असेल. प्रादेशिक पक्षांना भाजप आपल्या ताब्यात घेईल, अशी स्थिती असेल, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Neelam Shirke: उदय सामंतांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला, मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीबाबत सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
उदय सामंतांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला, मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीबाबत सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
Vidhan Parishad Election 2026: 12-4-1...विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?
12-4-1...विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
Jalgaon News: शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Petrol and Diesel Price Hike: थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
Amitabh Bachchan Fan Faints Outside Jalsa: अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, सुरक्षेवर प्रश्न उपस्थित
अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, VIDEO
Embed widget