एक्स्प्लोर

Yogendra Yadav Exclusive : एनडीएला बहुमत मिळून भाजपचं सरकार येईल, मात्र नंतर देशात लोकशाही नसेल : योगेंद्र यादव

मात्र या निवडणुकीनंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई : भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा अंदाज निवडणूक विश्लेषक आणि स्वराज्य इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. देशात भाजप सरकार येणार असून एनडीएला बहुमत मिळणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र या निवडणुकीच्या निकालानंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेसवर देखील टीका केली. काँग्रेस हा भाजपला सक्षम पर्याय नाही. भविष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही. काँग्रेस सर्वच आघाड्यावर अपयशी ठरली आहे. शेतकरी, बेरोजगारांसाठी काँग्रेस उभी राहिली नाही, असा आरोप यादव यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात भाजप शिवसेना वरचढ ठरणार असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कमी जागा मिळणार असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 'एक्झिट' पोल 'एक्झॅक्ट' पोल नसतो. मात्र सर्वच पोल एकाच दिशेने जात आहेत. सर्व पोल भाजपचे सरकार येणार असं म्हणत आहेत.  'एक्झिट' पोल करताना त्यांनी अभ्यास केलेला असतो. त्यामुळे त्यात तथ्य असते, असे ते म्हणाले. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, देशात आधी बूथ कॅप्चरिंग व्हायची, यावेळी पोल कॅप्चरिंग केलं आहे. पूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॅप्चर केली गेली आहे. यासाठी काठ्या, बंदुकी नव्हे तर कॅमेरा आणि टीव्हीच्या माध्यमांचा वापर केला गेला. पूर्ण देशाचे लक्ष्य मुख्य मुद्द्यांवरून भरकटवले गेले, असा आरोपही त्यांनी केला आहे. मतदार समजदार आहे मात्र भाजपने लोकांचा मेंदू कॅप्चर केला. मीडियाच्या माध्यमातून मेंदू कॅप्चर केला गेला. निवडणुकीत भाजपने खूप जास्त पैसे खर्च केले. आपण विचार देखील करू शकणार नाही, इतका पैसा भाजपने खर्च केला आहे. दुर्दैवाने निवडणूक आयोगाने संतुलित निष्पक्ष भूमिका बजावली नाही. निवडणूक आयोगाने एकतर्फी भूमिका अवलंबली, असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशात भाजपचे सरकार येईल, मात्र यानंतर देशात गंभीर असेल. दोन मोठ्या समस्या या देशासमोर उभ्या असणार आहेत. पहिली इलेक्टॉरेल ऍथॉरिटीरेनेस म्हणजे निवडणूक जिंकल्यानंतर कुणाचीही ऍथॉरिटी राहणार नाही, अशी भीती आहे. निवडणुकीनंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. दुसरं म्हणजे देशात बहुमतवाद देखील उफाळून येणार आहे. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. निकालानंतर जनादेशाचा सन्मान करायला हवा. ईव्हीएममधील घोटाळा वगैरे गोष्टी थोतांड आहे. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे. देशासमोर मोठे संकट येणार आहे. या संकटाचा सामना कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. देशाला या व्यवस्थेच्या विरोधात मोठी शक्ती निर्माण करावी लागणार आहे, असे यादव म्हणाले. पाच वर्षांपूर्वी काही राज्यांमध्ये भाजप नव्हती. आज त्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. दक्षिणेत देखील आज तशी स्थिती आहे, मात्र भविष्यात दक्षिणेतील राज्यातही भाजप असेल. प्रादेशिक पक्षांना भाजप आपल्या ताब्यात घेईल, अशी स्थिती असेल, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Deputy Speaker Election: विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पुढील आठवड्यात, निलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की नवा चेहरा?
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पुढील आठवड्यात, निलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की नवा चेहरा?
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांच्या घराबाहेर मध्यरात्री फटाके फोडले, झाडांना आग; सुधीर सोपलांची पोलिसांत तक्रार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांच्या घराबाहेर मध्यरात्री फटाके फोडले, झाडांना आग; सुधीर सोपलांची पोलिसांत तक्रार
Krishna Sugar Factory : 50 हजार सभासद असणाऱ्या साखर कारखान्याचा निकाल लागला, जयवंतराव भोसले पॅनलचा ऐतिहासीक विजय
Krishna Sugar Factory : 50 हजार सभासद असणाऱ्या साखर कारखान्याचा निकाल लागला, जयवंतराव भोसले पॅनलचा ऐतिहासीक विजय
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम

व्हिडीओ

Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
Nasrapur Case Verdict: भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, 'तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?', नराधम म्हणाला मी....
भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, 'तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?', नराधम म्हणाला मी....
Narendra Mehta Mira bhayandar Land Scam : मिरा-भाईंदर जमीन खरेदी प्रकरणात भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर ठपका; जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर, बावनकुळे काय कारवाई करणार?
मिरा-भाईंदर जमीन खरेदी प्रकरणात भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर ठपका; जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर, बावनकुळे काय कारवाई करणार?
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दूरदर्शी, राष्ट्रभक्त डाॅ. केशव हेडगेवारांनी पाया रचला..' IPS विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुकाचा वर्षाव, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, काँग्रेसचा हल्लाबोल
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दूरदर्शी, राष्ट्रभक्त डाॅ. केशव हेडगेवारांनी पाया रचला..' IPS विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुकाचा वर्षाव, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, काँग्रेसचा हल्लाबोल
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
Kalpana Kharat: अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
Embed widget