एक्स्प्लोर
उर्मिला मातोंडकरने काँग्रेसचा 'हात' सोडला!
उर्मिलाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याशी लढत दिली होती.

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत गट-तट आणि राजकारण यांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे. यामुळे मोठा गाजावाजा करत मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात आलेली उर्मिला सहा महिनेही काँग्रेसमध्ये रमू शकली नाही हे स्पष्ट झालं आहे.
मुंबई काँग्रेससाठी मोठ्या उद्दिष्टांकरता काम करण्याऐवजी पक्षातल्या अंतर्गत स्वार्थी प्रवृत्ती आणि त्यांच्यातल्या लढायांसाठी माझा वापर करु देणं माझ्या राजकीय आणि सामाजिक जाणीवांना मान्य नाही," असंही उर्मिलाने निवेदनात म्हटलं आहे.
उर्मिला मातोंडकर राजीनामा #काँग्रेस pic.twitter.com/4y8rOBeQvz
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) September 10, 2019
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबई शहर काँग्रेसच्या नेत्या-कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप तिने यापूर्वीच केला होता. 16 मे रोजी याबाबत पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची तक्रारही तिने केली आहे. काँग्रेसचे तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यातली अंतर्गत धुसफूस, राज्य पातळीवरील नेत्यांची उदासिनता याचाही या वादाला संदर्भ आहे.
उर्मिलाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याशी लढत दिली होती. बॉलिवूड सेलेब्रिटी, उत्तम वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व असूनही उर्मिलाला गोपाळ शेट्टींना मात्र मात देता आली नाही. शेट्टींना 7 लाख 6 हजार तर उर्मिलाला 2 लाख 41 हजार मतं मिळाली.
संबंधित बातम्या
आणखी वाचा




















