एक्स्प्लोर

Election : निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवणार का? राज्य सरकारला भूमिका मांडण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील या महापालिकांना 15 मेपर्यंत प्रभागांची परिसीमा निश्चित करण्याचे आदेश देणारं परिपत्रकही जारी केलं आहे.

मुंबई: राज्यातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेली नवी प्रभाग रचना अंतिम करणार का? अथवा नव्यानं हरकती आणि सूचना मागविणार? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील 12 महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगांना दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील या महापालिकांना 15 मेपर्यंत प्रभागांची परिसीमा निश्चित करण्याचे आदेश देणारं परिपत्रकही जारी केलंय. त्यानुसार, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, बृहन्मुंबई आणि ठाणे महापालिका आयुक्तांना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करता अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रमही निश्चित केला. या परिपत्रकाला पुण्यातील उज्ज्वल केसकर आणि प्रवीण शिंदे यांच्यासह अन्य याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकांसदर्भात सविस्तर माहिती सर्वाच्च न्यायालयात सादर केली असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्यावतीने अ‍ॅड. सचिंद्र शेट्ये यांनी खंडपीठाला दिली. त्यावर आक्षेप नोंदवत सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणूका घेण्यास आमचा विरोध नाही. मात्र, नव्या प्रभाग रचना अंतिम करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आमचा आक्षेप आहे. तसेच आयोगाने सुचविलेल्या हरकती आणि सुचनांवर आलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी स्थापन केलेल्या 'चोकलिंगम समिती'नं आक्षेपांसंदर्भात तयार केलेला अहवाल निवडणूक आयोगाला सुपूर्द केला आहे. तो अहवाल सार्वजनिक करण्याचे आयोगाला आदेश द्या, अशी विनंती याचिकाकर्त्यांकडून कऱण्यात आली. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाच्या नव्या प्रभार रचना अंतम करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?, असा सवाल उपस्थित करत खंडपीठानं राज्य सरकारला त्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आणि सुनावणी पुढील आठवड्यात निश्चित केली.
 


आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोशाख ते पेहराव, फुटबॉलपासून ते झालमुरी खाण्यापर्यंत, पश्चिम बंगालच्या अभूतपूर्व विजयामागील पंतप्रधान मोदींचं 'स्टाईल मेसेजिंग' वाचा संपूर्ण विश्लेषण
पोशाख ते पेहराव, फुटबॉलपासून ते झालमुरी खाण्यापर्यंत, पश्चिम बंगालच्या अभूतपूर्व विजयामागील पंतप्रधान मोदींचं 'स्टाईल मेसेजिंग' वाचा संपूर्ण विश्लेषण
Neet Exam Pune: नीट पेपरफुटीप्रकरणी पुणे केंद्रबिदू; पेपर फोडणारे तिघंही पुण्याचेच, तीन विषय अन् तीन शिक्षक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधले, एनटीएही संशयाच्या भोवऱ्यात
नीट पेपरफुटीप्रकरणी पुणे केंद्रबिदू; पेपर फोडणारे तिघंही पुण्याचेच, तीन विषय अन् तीन शिक्षक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधले, एनटीएही संशयाच्या भोवऱ्यात
Vidhan Parishad Election 2026: भंडारा - गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम; भाजपसह, राष्ट्रवादीनंही शड्डू ठोकला; जिंकेल मात्र काँग्रेसचं, नाना पटोलेंचा दावा
भंडारा - गोंदिया विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम; भाजपसह, राष्ट्रवादीनंही शड्डू ठोकला; जिंकेल मात्र काँग्रेसचं, नाना पटोलेंचा दावा
निवडणूक ही केवळ औपचारिकता, विरोधकांनी कितीही मोट बांधली तरी 100 पेक्षा अधिक मतं मिळणार नाहीत : जयकुमार गोरे
निवडणूक ही केवळ औपचारिकता, विरोधकांनी कितीही मोट बांधली तरी 100 पेक्षा अधिक मतं मिळणार नाहीत : जयकुमार गोरे

व्हिडीओ

Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
Alandi Temple : आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली, विशाल वारुळे कसा अडकला?
आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
Embed widget