एक्स्प्लोर

Loksabha Election 2024: झोळी घेऊन निघून जा, हेच जनमत; श्रीराम-बजरंगबली दोघांनीही मोदींना नाकारलं; संजय राऊतांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात होता. पण भाजपप्रणित एनडीए आघाडीला 300 जागांचा आकडाही ओलांडता आलेला नाही.

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करावा. जनतेने मोदींना नाकारलं आहे. 'झोला लेकर जाईए', हाच जनादेश आहे. श्रीराम आणि बजरंगबली या दोघांनीही नरेंद्र मोदी (PM Modi) यांना नाकारले आहे, अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. 

प्रभू श्रीराम आणि बजरंगबली कोणीही मोदींसोबत नाही. श्रीराम आणि बजरंगबली आमच्यासोबत आहेत. ज्या अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं तेथील फैजापूर लोकसभा मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. याचठिकाणी मोदींनी इव्हेंट केला होता, अनेक दिवस व्रत केले होते. पण देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना नाकारले आहे. जनतेने मोदींना फेअरवेल दिलंय, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली. 

इंडिया आघाडीन मोदी-शाहांच्या अहंकाराचा पराभव केला: संजय राऊत

2014 ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत मिळवले होते. पण 2024 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही. या निवडणुकीत मोदी आणि अमित शाहांचा पराभव झाला. राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, स्टॅलिन या सगळ्यांनी जीवतोड मेहनत केली. या लढाईत मोदी-शाहांचा अहंकार इंडिया आघाडीने संपवला. आता त्यांची धावपळ सुरु झाली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्यासोबत या, यासाठी ते हातापाय जोडत आहेत. यानंतरही मोदी-शाहांनी तोडफोड करुन सरकार स्थापन केले तर लोक संतापून रस्त्यावर उतरतील. मोदींचं नाक कापलं गेलंय, त्यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला पाहिजे. आधी भाजप 400 पारची भाषा करत होते, मग हा आकडा 350 पर्यंत खाली आला, पण भाजपला 250 जागाही मिळाल्या नाहीत. मुंबईत आणि महाराष्ट्रात मोदींना आम्ही रोखलंय, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुंबईत भाजपचे ढोलताशे न वाजताच माघारी

उत्तर मध्य मुंबईत भाजपने जल्लोषासाठी आणलेले बँजो, ताशे न वाजवताच माघारी नेण्यात आले. मुंबईतील पराभवामुळे कार्यकर्ते देखील शांत आणि दुःखी दिसत होते. उत्तर मध्य मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी एकीकडे मतमोजणी आणि दुसरीकडे जल्लोषाची तयारी केली होती. मात्र, चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली. त्यामुळे जल्लोषासाठी आणलेले ढोल-ताशे वाजलेच नाहीत. या निकालानंतर कार्यकर्ते देखील नाराज झाले.

आणखी वाचा

ना लेकाला निवडून आणता आलं ना पत्नीला; अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका

महत्त्वाच्या बातम्या

E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget