एक्स्प्लोर

Loksabha Election 2024: झोळी घेऊन निघून जा, हेच जनमत; श्रीराम-बजरंगबली दोघांनीही मोदींना नाकारलं; संजय राऊतांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात होता. पण भाजपप्रणित एनडीए आघाडीला 300 जागांचा आकडाही ओलांडता आलेला नाही.

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करावा. जनतेने मोदींना नाकारलं आहे. 'झोला लेकर जाईए', हाच जनादेश आहे. श्रीराम आणि बजरंगबली या दोघांनीही नरेंद्र मोदी (PM Modi) यांना नाकारले आहे, अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. 

प्रभू श्रीराम आणि बजरंगबली कोणीही मोदींसोबत नाही. श्रीराम आणि बजरंगबली आमच्यासोबत आहेत. ज्या अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं तेथील फैजापूर लोकसभा मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. याचठिकाणी मोदींनी इव्हेंट केला होता, अनेक दिवस व्रत केले होते. पण देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना नाकारले आहे. जनतेने मोदींना फेअरवेल दिलंय, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली. 

इंडिया आघाडीन मोदी-शाहांच्या अहंकाराचा पराभव केला: संजय राऊत

2014 ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत मिळवले होते. पण 2024 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही. या निवडणुकीत मोदी आणि अमित शाहांचा पराभव झाला. राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, स्टॅलिन या सगळ्यांनी जीवतोड मेहनत केली. या लढाईत मोदी-शाहांचा अहंकार इंडिया आघाडीने संपवला. आता त्यांची धावपळ सुरु झाली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्यासोबत या, यासाठी ते हातापाय जोडत आहेत. यानंतरही मोदी-शाहांनी तोडफोड करुन सरकार स्थापन केले तर लोक संतापून रस्त्यावर उतरतील. मोदींचं नाक कापलं गेलंय, त्यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला पाहिजे. आधी भाजप 400 पारची भाषा करत होते, मग हा आकडा 350 पर्यंत खाली आला, पण भाजपला 250 जागाही मिळाल्या नाहीत. मुंबईत आणि महाराष्ट्रात मोदींना आम्ही रोखलंय, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुंबईत भाजपचे ढोलताशे न वाजताच माघारी

उत्तर मध्य मुंबईत भाजपने जल्लोषासाठी आणलेले बँजो, ताशे न वाजवताच माघारी नेण्यात आले. मुंबईतील पराभवामुळे कार्यकर्ते देखील शांत आणि दुःखी दिसत होते. उत्तर मध्य मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी एकीकडे मतमोजणी आणि दुसरीकडे जल्लोषाची तयारी केली होती. मात्र, चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली. त्यामुळे जल्लोषासाठी आणलेले ढोल-ताशे वाजलेच नाहीत. या निकालानंतर कार्यकर्ते देखील नाराज झाले.

आणखी वाचा

ना लेकाला निवडून आणता आलं ना पत्नीला; अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget