एक्स्प्लोर

Loksabha Election 2024: झोळी घेऊन निघून जा, हेच जनमत; श्रीराम-बजरंगबली दोघांनीही मोदींना नाकारलं; संजय राऊतांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला जात होता. पण भाजपप्रणित एनडीए आघाडीला 300 जागांचा आकडाही ओलांडता आलेला नाही.

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करावा. जनतेने मोदींना नाकारलं आहे. 'झोला लेकर जाईए', हाच जनादेश आहे. श्रीराम आणि बजरंगबली या दोघांनीही नरेंद्र मोदी (PM Modi) यांना नाकारले आहे, अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. 

प्रभू श्रीराम आणि बजरंगबली कोणीही मोदींसोबत नाही. श्रीराम आणि बजरंगबली आमच्यासोबत आहेत. ज्या अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं तेथील फैजापूर लोकसभा मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. याचठिकाणी मोदींनी इव्हेंट केला होता, अनेक दिवस व्रत केले होते. पण देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना नाकारले आहे. जनतेने मोदींना फेअरवेल दिलंय, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली. 

इंडिया आघाडीन मोदी-शाहांच्या अहंकाराचा पराभव केला: संजय राऊत

2014 ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत मिळवले होते. पण 2024 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही. या निवडणुकीत मोदी आणि अमित शाहांचा पराभव झाला. राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, स्टॅलिन या सगळ्यांनी जीवतोड मेहनत केली. या लढाईत मोदी-शाहांचा अहंकार इंडिया आघाडीने संपवला. आता त्यांची धावपळ सुरु झाली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्यासोबत या, यासाठी ते हातापाय जोडत आहेत. यानंतरही मोदी-शाहांनी तोडफोड करुन सरकार स्थापन केले तर लोक संतापून रस्त्यावर उतरतील. मोदींचं नाक कापलं गेलंय, त्यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला पाहिजे. आधी भाजप 400 पारची भाषा करत होते, मग हा आकडा 350 पर्यंत खाली आला, पण भाजपला 250 जागाही मिळाल्या नाहीत. मुंबईत आणि महाराष्ट्रात मोदींना आम्ही रोखलंय, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुंबईत भाजपचे ढोलताशे न वाजताच माघारी

उत्तर मध्य मुंबईत भाजपने जल्लोषासाठी आणलेले बँजो, ताशे न वाजवताच माघारी नेण्यात आले. मुंबईतील पराभवामुळे कार्यकर्ते देखील शांत आणि दुःखी दिसत होते. उत्तर मध्य मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी एकीकडे मतमोजणी आणि दुसरीकडे जल्लोषाची तयारी केली होती. मात्र, चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली. त्यामुळे जल्लोषासाठी आणलेले ढोल-ताशे वाजलेच नाहीत. या निकालानंतर कार्यकर्ते देखील नाराज झाले.

आणखी वाचा

ना लेकाला निवडून आणता आलं ना पत्नीला; अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget