एक्स्प्लोर

राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार

पनवेलमध्ये मोठी वाहतूक कोंडी असून दिल्ली-वडोदरा हायवेमुळे नवी मुंबई अन् पनवेलमधील वाहतूक कोंडी सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे बंधू आणि महायुती असा थेट सामना मुंबई महापालिकेत रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरुन ठाकरे बंधूंनी जाहीर सभेत केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या भाषणात मुंबईतील विमानतळाची (Airport) जागा हडपण्याचा डाव असल्याचे सांगितले. एकीकडे राज ठाकरेंनी मुंबई विमानतळाची जागा ताब्यात घेण्यासाठी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला असता, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत तिसरं विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे. वाढवण बंदराजवळ हे तिसरे विमानतळ उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील (navi mumbai) महापालिका निवडणुकांच्या प्रचारात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

पनवेलमध्ये मोठी वाहतूक कोंडी असून दिल्ली-वडोदरा हायवेमुळे नवी मुंबई अन् पनवेलमधील वाहतूक कोंडी सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येथील कळंबोली जंक्शन सुधारणार आहे, आपण तुर्भे टनल करतोय, विमानतळ कनेक्टिविटीसाठी दोन वेगळे मार्ग उभारणार आहोत. सिडको ने 59 किलो मीटर मेट्रोचे जाळे हाती घेतले आहे. त्यातून, नवी मुंबई विमानतळ ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मेट्रोने जोडणार असल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. तसेच, कल्याण-डोंबिवली शहरही भविष्यात मेट्रोने जोडणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

मुंबईतील पहिलं विमानतळ राहणार आहे, नवी मुंबईचं राहणार आहे आणि मुंबईला तिसरे विमानतळ उभारणार असून मुंबई, नवी मुंबईनंतर आता वाढवण बंदराजवळ तिसरे विमानतळ उभारणार असल्याची घोषणाच मुख्यमंत्र्‍यांनी केली. तसेच, राज्य सरकार विरार आणि पालघर या दोन्ही ठिकाणांचा सखोल अभ्यास करणार आहे. कोणती जागा अधिक सोयीची, वाहतुकीसाठी उपयुक्त आणि दीर्घकालीन विकासासाठी फायदेशीर ठरेल यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जात आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.

अटल सेतूचं काम गतीने मार्गी लावलं

सन 1990 साली नवी मुंबई विमानतळ होणार असल्याची घोषणा झाली होती. पण, प्रत्यक्षात अत्यंत संथ गतीने काम चालू होते. भाजप सरकार केंद्रात, राज्यात आल्यावर लगेच सर्व परवानग्या घेऊन विमानतळाच्या कामाला सुरवात झाली. तर, अटल सेतूचा प्लान जे. आर. टाटा यांनी 1962 मध्ये तयार केला होता. पण, त्यांच्या प्लॅनला सरकारने प्रतिसाद दिला नव्हता. अनेक अडचणी होत्या, परवानग्या असंख्य होत्या. वॅार रुममध्ये हे काम हाती घेतले. प्रचंड पाठपुरावा केल्याने लवकर प्रोजेक्ट मार्गी लागले, असेही फडणवीसांनी सांगितले.

2050 पर्यंत दोन धरणे होतील

मुंबईतील अटल सेतू टोल फ्री होणार नाही, त्याचा परतावा टोलवर आधारित आहे. कारण, कर्जाचा परतावा आहे. येथील टोलसाठी 25 टक्के दर आम्ही टोलचे कमी ठेवले आहेत. स्वयं पुनर्विकास करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. यामध्ये लोकांना घरांचा ऐरिया मोठा मिळतो आहे. पनवेलमध्ये पाणी समस्या सोडविण्यासाठी भविष्यात पोशीर आणि शिरा ही दोन धरणे बांधली जाणार आहेत. तर, 2050 पर्यंत ही दोन धरणे तयार होतील. पनवेल आणि एमएमआरए मधील सर्वांना पाणी मिळणार आहे. एमएमआरडीएने हे दोन धरणे उभारावीत, याचे टेंडर निघाले असून काम सुरू झाले आहे, अशी माहितीही फडणवीसांनी दिली. दरम्यान, माझ्यावर जीवनपट निघालाच तर त्याचे नाव “आपले देवा भाऊ “ असेल. माझी भूमिका कोण करेल, त्यासाठी वजन वाढवावे लागेल. प्रसादला वजन वाढवावे लागेल.

हेही वाचा

ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP VS Congress: पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
Nana Patole On Parth Pawar: पार्थ पवारांच्या वक्तव्याबाबत विचारताच नाना पटोलेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले, 'कोणाचा डाऊनफॉल होईल ते...'
पार्थ पवारांच्या वक्तव्याबाबत विचारताच नाना पटोलेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले, 'कोणाचा डाऊनफॉल होईल ते...'
Beed Gram Panchayat Election 2026: बीडमध्ये 88 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार? धनंजय देशमुख म्हणाले, संतोष अण्णांचे स्वप्न...
बीडमध्ये 88 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार? धनंजय देशमुख म्हणाले, संतोष अण्णांचे स्वप्न...
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
Beed : नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
Embed widget