एक्स्प्लोर

Rahul Gandhi : महाराष्ट्रातील पराभव अन् झारखंडमधील विजयावर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी झारखंडमधील विजयावर आणि महाराष्ट्रातील पराभवावर भाष्य केलं आहे.

नवी दिल्ली : देशातील दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीनं पुन्हा सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातील पराभवावर आणि झारखंडमधील विजयावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. 

राहुल गांधी काय म्हणाले? 

झारखंडच्या लोकांनी इंडिया आघाडीला मोठं बहुमत दिलं त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा असं राहुल गांधी म्हणाले. झारखंडमधील इंडिया आघाडीचा विजय संविधानासह जल, जंगल आणि जमिनीचं संरक्षण करेल, असं राहुल गांधी म्हणाले.  

महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असून आम्ही याचं विश्लेषण करणार आहोत, असं राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातील भावा बहि‍णींचं आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी धन्यवाद देतो, असं राहुल गांधी म्हणाले. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काय घडलं? 

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या. महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या.मात्र , विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपनं 133 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यापैकी 98 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला 57 जागांवर आघाडी असून 46 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर आघाडी असून 36 जागा मिळाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10, समाजवादी पार्टीला 2 जागांवर यश मिळताना दिसून येतंय. माकपचे विनोद निकोले देखील विजय झाले आहेत.

राहुल गांधी यांचं ट्विट 

काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत :

महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं पाहायला मिळालं. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, के.सी. पाडवी, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सत्ता 

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस, राजद यांच्या आघाडीनं सत्ता मिळवली आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. झारखंडमधील 81 विधानसभा मतदारसंघांपैकी इंडिया आघाडीला 56 जागांवर विजय मिळेल अशी स्थिती आहे. त्यापैकी 50 जागा इंडिया आघाडीनं जिंकल्या आहेत. भाजपला झारखंडमध्ये 21 जागांवर विजय मिळाला आहे. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
Embed widget