एक्स्प्लोर

Rahul Gandhi : महाराष्ट्रातील पराभव अन् झारखंडमधील विजयावर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी झारखंडमधील विजयावर आणि महाराष्ट्रातील पराभवावर भाष्य केलं आहे.

नवी दिल्ली : देशातील दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीनं पुन्हा सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातील पराभवावर आणि झारखंडमधील विजयावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. 

राहुल गांधी काय म्हणाले? 

झारखंडच्या लोकांनी इंडिया आघाडीला मोठं बहुमत दिलं त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा असं राहुल गांधी म्हणाले. झारखंडमधील इंडिया आघाडीचा विजय संविधानासह जल, जंगल आणि जमिनीचं संरक्षण करेल, असं राहुल गांधी म्हणाले.  

महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असून आम्ही याचं विश्लेषण करणार आहोत, असं राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातील भावा बहि‍णींचं आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी धन्यवाद देतो, असं राहुल गांधी म्हणाले. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काय घडलं? 

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या. महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या.मात्र , विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपनं 133 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यापैकी 98 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला 57 जागांवर आघाडी असून 46 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर आघाडी असून 36 जागा मिळाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10, समाजवादी पार्टीला 2 जागांवर यश मिळताना दिसून येतंय. माकपचे विनोद निकोले देखील विजय झाले आहेत.

राहुल गांधी यांचं ट्विट 

काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत :

महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं पाहायला मिळालं. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, के.सी. पाडवी, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सत्ता 

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस, राजद यांच्या आघाडीनं सत्ता मिळवली आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. झारखंडमधील 81 विधानसभा मतदारसंघांपैकी इंडिया आघाडीला 56 जागांवर विजय मिळेल अशी स्थिती आहे. त्यापैकी 50 जागा इंडिया आघाडीनं जिंकल्या आहेत. भाजपला झारखंडमध्ये 21 जागांवर विजय मिळाला आहे. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
Pune : भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता
Pune : भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता
Gokul Election : कोल्हापुरात 'गोकुळ'वरून बंटी विरुद्ध मुन्ना आमनेसामने; सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार, महाडिकांचा निर्धार
कोल्हापुरात 'गोकुळ'वरून बंटी विरुद्ध मुन्ना आमनेसामने; सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार, महाडिकांचा निर्धार

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Embed widget