एक्स्प्लोर

Rahul Gandhi : महाराष्ट्रातील पराभव अन् झारखंडमधील विजयावर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी झारखंडमधील विजयावर आणि महाराष्ट्रातील पराभवावर भाष्य केलं आहे.

नवी दिल्ली : देशातील दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीनं पुन्हा सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातील पराभवावर आणि झारखंडमधील विजयावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. 

राहुल गांधी काय म्हणाले? 

झारखंडच्या लोकांनी इंडिया आघाडीला मोठं बहुमत दिलं त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा असं राहुल गांधी म्हणाले. झारखंडमधील इंडिया आघाडीचा विजय संविधानासह जल, जंगल आणि जमिनीचं संरक्षण करेल, असं राहुल गांधी म्हणाले.  

महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असून आम्ही याचं विश्लेषण करणार आहोत, असं राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातील भावा बहि‍णींचं आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी धन्यवाद देतो, असं राहुल गांधी म्हणाले. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काय घडलं? 

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या. महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या.मात्र , विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपनं 133 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यापैकी 98 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला 57 जागांवर आघाडी असून 46 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर आघाडी असून 36 जागा मिळाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10, समाजवादी पार्टीला 2 जागांवर यश मिळताना दिसून येतंय. माकपचे विनोद निकोले देखील विजय झाले आहेत.

राहुल गांधी यांचं ट्विट 

काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत :

महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं पाहायला मिळालं. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, के.सी. पाडवी, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सत्ता 

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस, राजद यांच्या आघाडीनं सत्ता मिळवली आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. झारखंडमधील 81 विधानसभा मतदारसंघांपैकी इंडिया आघाडीला 56 जागांवर विजय मिळेल अशी स्थिती आहे. त्यापैकी 50 जागा इंडिया आघाडीनं जिंकल्या आहेत. भाजपला झारखंडमध्ये 21 जागांवर विजय मिळाला आहे. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
Sushma Andhare On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Nitin Gadkari ethanol: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
Embed widget