एक्स्प्लोर

Rahul Gandhi : महाराष्ट्रातील पराभव अन् झारखंडमधील विजयावर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी झारखंडमधील विजयावर आणि महाराष्ट्रातील पराभवावर भाष्य केलं आहे.

नवी दिल्ली : देशातील दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीनं पुन्हा सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातील पराभवावर आणि झारखंडमधील विजयावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. 

राहुल गांधी काय म्हणाले? 

झारखंडच्या लोकांनी इंडिया आघाडीला मोठं बहुमत दिलं त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा असं राहुल गांधी म्हणाले. झारखंडमधील इंडिया आघाडीचा विजय संविधानासह जल, जंगल आणि जमिनीचं संरक्षण करेल, असं राहुल गांधी म्हणाले.  

महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असून आम्ही याचं विश्लेषण करणार आहोत, असं राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातील भावा बहि‍णींचं आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी धन्यवाद देतो, असं राहुल गांधी म्हणाले. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काय घडलं? 

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या. महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या.मात्र , विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपनं 133 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यापैकी 98 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला 57 जागांवर आघाडी असून 46 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर आघाडी असून 36 जागा मिळाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10, समाजवादी पार्टीला 2 जागांवर यश मिळताना दिसून येतंय. माकपचे विनोद निकोले देखील विजय झाले आहेत.

राहुल गांधी यांचं ट्विट 

काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत :

महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं पाहायला मिळालं. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, के.सी. पाडवी, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सत्ता 

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस, राजद यांच्या आघाडीनं सत्ता मिळवली आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. झारखंडमधील 81 विधानसभा मतदारसंघांपैकी इंडिया आघाडीला 56 जागांवर विजय मिळेल अशी स्थिती आहे. त्यापैकी 50 जागा इंडिया आघाडीनं जिंकल्या आहेत. भाजपला झारखंडमध्ये 21 जागांवर विजय मिळाला आहे. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget