एक्स्प्लोर

राष्ट्रवादीमुळे लोकसभेत महायुतीला फटका बसला का? उत्तर प्रदेशचा दाखला देत छगन भुजबळांनी गणित मांडलं!

Chhagan Bhujbal : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षावर जोरदार टीका झाली.

Chhagan Bhujbal On Lok Sabha Election Result 2024 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षावर जोरदार टीका झाली. आरएसएसनेही यावर नाराजी व्यक्त केली होती. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी गणितच मांडले. त्याशिवाय उत्तरप्रदेशचा दाखलाही दिला. पुण्यात भिडे वाड्याची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेसमुळे फटका बसला का ? 

आमच्यामुळे कसा फटका बसलेला असू शकतो? राज्यातील 48 जागामधील आम्हाला 4 जागा दिल्या. चारमधील दोन जागा शिरुरमध्ये शिंदेंचे आढळराव पाटील होते, तर परभणीमध्ये महादेव जानकर यांना उमेदवारी दिली.  खऱ्या अर्थाने आम्हाला फक्त रायगड आणि बारमती  या जागाच मिळाल्या. एका जागी आमचा विजय झाला, दुसऱ्या जागी पराभव झाला. आमच्यामुळे 48 जागांवर परिणाम झाला, असं कसं म्हणू शकता. आम्हाला फक्त दोनच जागा मिळाल्या. त्यातही एक जिंकली.

थोडीफार पिछेहाट झाली आहे, पण फक्त महाराष्ट्रातच झाली का? दुसऱ्या राज्यातही फटका बसलाच आहे ना? उत्तर प्रदेशमध्ये इतका मोठा फटका बसेल, असं कुणीच म्हणत नव्हते. त्यामुळे राज्यात भाजपला फटका बसण्याचं कारण अजित पवार गट असल्याचं म्हणून शकत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले, असे छगन भुजबळ म्हणाले.  

लोकसभेला नाशिकमधून उमेदवारी न मिळण्यावर स्पष्टच बोलले -

खासदार होण्याची इच्छा असल्यामुळेच नाशिक लोकसभा लढवण्यासाठी तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकिट फायनल केल्याचं सांगितलं गेले, त्यामुळे कामलाा लागलो होतो.  त्यानंतर एक महिना झालं तरी तिकिट जाहीर होईना, म्हणून मी थांबलो. समोरच्या उमेदवारानेही तयारी केली होती. माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली. फॉर्म भरण्याच्या एक दिवस आधी उमेदवारी जाहीर झाली. याचा परिणाम जय पराजयावर होत असतो, असे छगन भुजबळ म्हणाले.  

राज्यसभा उमेदवारी मिळाली नाही, काय म्हणाले...

हो, मी लढण्यासाठी इच्छूक होतो. पण पक्ष म्हटलं की सगळ्याच गोष्टी तुमच्या म्हणाप्रमाणे होत नाही. थांबावं लागतं. आपल्याला वाटतं असं व्हायला हवं, पण होत नाही. त्यासाठी वेगवेगळी कारण असतील. पक्ष म्हणातल्यावर अनेक गोष्टी घडतात पक्षात सगळं काही मनासारखं होत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

महायुती मागे का पडली ?

महायुती का मागे पडली, याचं विश्लेषण अभ्यास झाला पाहिजे. 400 पार म्हटल्यामुळे संविधानमध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार करण्यात आला. त्यामुळेच पराभव झाला, असे भुजबळांनी सांगितले. 

80 जागांवर आजही कायम - 

विधानसभेच्या 80 जागांच्या दाव्यावर आजही कायम असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. अपक्ष आमदार आणि आमचे आमदार, असे जवळपास 60 जागा आहेत. लढण्यासाठी आम्हाला 15-20 जागा तर मिळतील ना? असे छगन भुजबळ म्हणाले. 

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : इस्त्रायल-हमास संघर्ष संपणार? पश्चिम आशियात काहीतरी मोठं होणार, ट्रम्प यांच्या पोस्टनंतर चर्चा
इस्त्रायल-हमास संघर्ष संपणार? पश्चिम आशियात काहीतरी मोठं होणार, ट्रम्प यांच्या पोस्टनंतर चर्चा
Sanjay Raut : सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, पण आम्ही क्रिकेट खेळणार आणि पैसा कमावणार, हाच का तुमचा राष्ट्रवाद? संजय राऊतांचा भाजपला सवाल
सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, पण आम्ही क्रिकेट खेळणार आणि पैसा कमावणार, हाच का तुमचा राष्ट्रवाद? संजय राऊतांचा भाजपला सवाल
Ind vs Pak Final Asia Cup 2025 : आशिया कप फायनलच्या टॉस वेळीही ड्रामा! पाकिस्ताननं बोलावला स्वतःचा ब्रॉडकास्टर, नेमकं काय घडलं? पाहा Video
आशिया कप फायनलच्या टॉस वेळीही ड्रामा! पाकिस्ताननं बोलावला स्वतःचा ब्रॉडकास्टर, नेमकं काय घडलं? पाहा Video
Thane : पुढील दोन दिवस ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार, प्रशासन अलर्ट, नागरिकांना सूचना
पुढील दोन दिवस ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार, प्रशासन अलर्ट, नागरिकांना सूचना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : इस्त्रायल-हमास संघर्ष संपणार? पश्चिम आशियात काहीतरी मोठं होणार, ट्रम्प यांच्या पोस्टनंतर चर्चा
इस्त्रायल-हमास संघर्ष संपणार? पश्चिम आशियात काहीतरी मोठं होणार, ट्रम्प यांच्या पोस्टनंतर चर्चा
Sanjay Raut : सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, पण आम्ही क्रिकेट खेळणार आणि पैसा कमावणार, हाच का तुमचा राष्ट्रवाद? संजय राऊतांचा भाजपला सवाल
सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, पण आम्ही क्रिकेट खेळणार आणि पैसा कमावणार, हाच का तुमचा राष्ट्रवाद? संजय राऊतांचा भाजपला सवाल
Ind vs Pak Final Asia Cup 2025 : आशिया कप फायनलच्या टॉस वेळीही ड्रामा! पाकिस्ताननं बोलावला स्वतःचा ब्रॉडकास्टर, नेमकं काय घडलं? पाहा Video
आशिया कप फायनलच्या टॉस वेळीही ड्रामा! पाकिस्ताननं बोलावला स्वतःचा ब्रॉडकास्टर, नेमकं काय घडलं? पाहा Video
Thane : पुढील दोन दिवस ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार, प्रशासन अलर्ट, नागरिकांना सूचना
पुढील दोन दिवस ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार, प्रशासन अलर्ट, नागरिकांना सूचना
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचं निधन; ग्रामीण जीवनाच्या वेदना 'लाल चिखल'मधून दाखवणारा अवलिया काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचं निधन; ग्रामीण जीवनाच्या वेदना 'लाल चिखल'मधून दाखवणारा अवलिया काळाच्या पडद्याआड
India Vs Pakistan Asia Cup Final: आशिया कपमध्ये कोण होणार प्लेअर ऑफ द टूर्नामेंट? टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माला चौघांकडून तगडी फाईट!
आशिया कपमध्ये कोण होणार प्लेअर ऑफ द टूर्नामेंट? टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माला चौघांकडून तगडी फाईट!
Sangli News: मिरजेत वर्चस्ववादातून अट्टल गुंडांनी तरुणाचा मुडदा पाडला; सांगलीत नवऱ्यानं बायकोला झोपेतच वार करून संपवलं
मिरजेत वर्चस्ववादातून अट्टल गुंडांनी तरुणाचा मुडदा पाडला; सांगलीत नवऱ्यानं बायकोला झोपेतच वार करून संपवलं
ती एक अफवा पसरली अन्...10 हजार लोकांची परवानगी असताना 50 हजार जमले, 16 महिला, 10 मुलांसह 40 जणांचा चिरडून जीव गेला, 51आयसीयूत; थलपती विजयच्या रॅलीत आतापर्यंत काय काय घडलं?
ती एक अफवा पसरली अन्...10 हजार लोकांची परवानगी असताना 50 हजार जमले, 16 महिला, 10 मुलांसह 40 जणांचा चिरडून जीव गेला, 51आयसीयूत; थलपती विजयच्या रॅलीत आतापर्यंत काय काय घडलं?
Embed widget