एक्स्प्लोर

कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्क्यांची मालिका सुरुच

कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर रिंगणात आहेत. जयश्री जाधव यांच्या बंडखोरीने त्यांना ताकद मिळाली असून सतेज पाटील यांना कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात तगडा झटका बसला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात धमाक्यांची मालिका सुरुच असून आता काँग्रेसला पुन्हा एकदा झटका बसला आहे. कोल्हापूर उत्तरमधून तिकिट नाकारण्यात आल्यानंतर विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी थेट शिवधनुष्य हाती घेतलं आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये राजकीय धमाका सुरुच आहे. जयश्री जाधव यांना काँग्रेसकडून तिकिट नाकारण्यात आलं आहे. त्यांना नाकारून राजेश लाटकर यांना तिकिट देण्यात आले, पण त्यांच्याही उमेदवारीला विरोध झाल्याने अखेर माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

जयश्री जाधव यांना उमेदवारी नाकारली 

कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर रिंगणात आहेत. जयश्री जाधव यांच्या बंडखोरीने त्यांना ताकद मिळाली असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात तगडा झटका बसला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य रंगलं आहे. मतदारसंघ कोणाला मिळणार ते उमेदवारी कोणाला मिळणार? असा खेळ रंगला होता. भाजपकडून महाडिक यांनीही डाव टाकल्याने राजेश क्षीरसागर अडचणीत आले होते. मात्र, शिंदे यांनी क्षीरसागर यांनाच उमेदवारी देत विरोध झुगारला. दुसरीकडे, काँग्रेसमध्येही राजेश लाटकर यांच्या उमेदवारीवरून रणकंदन सुरु झाले. त्यामुळे उमेदवार बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. 

कोल्हापूरमध्ये काँग्रेसची ताकद  

दरम्यान, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि विधानपरिषदेतील दोन आमदार असे पाच आमदार काँग्रेसचे आहेत. स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांनी करवीरमध्ये दिलेल्या मताधिक्याने शाहू महाराजांचा विजय निश्चित झाला. मात्र, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये शाहू महाराजांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नव्हतं. कोल्हापूर दक्षिणमधून अवघ्या 6 हजार 702 मतांची आघाडी शाहू महाराजांना मिळाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 14 हजार 528 मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार आहेत. दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील, तर उत्तरमध्ये जयश्री जाधव आमदार होत्या. 

गेल्या तीन निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये काय घडलं?

  • 2009 मध्ये छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन राजेश क्षीरसागर पहिल्यांदा आमदार. क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला
  • 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22 हजार 421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले. त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या सत्यजित कदम यांचा पराभव केला. 
  • 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15 हजार 199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी विजय खेचून आणला होता. 
  • 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूर उत्तरमध्ये पोटनिवडणूक झाली. यामध्ये जयश्री जाधव विजयी 18 हजार 901 मतांनी झाल्या होत्या. त्यांनी सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget