एक्स्प्लोर

वरळी विधानसभा मतदारसंघ | आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे; उमेदवारी कोणाला?

मराठी मतदारांनी आणि वर्षानुवर्षे मुंबईचे रहिवासी असलेल्या मतदारांनी इथे कायमच शिवसेनेला साथ दिल्याचं पाहायला मिळतं. 2009 ची निवडणूक वगळता 1990 पासूनच्या सहा निवडणुकीत इथे शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे.

रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींचं जाळं,लाभलेला अथांग समुद्रकिनारा आणि मराठी भाषिकांचं प्राबल्य असलेला परिसर म्हणजे वरळी. वरळी (विधानसभा क्र. 182) हा मुंबई शहरातला विधानसभा मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे विद्यमान आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत साऱ्यांच्याच नजरा वरळी विधानसभा मतदारसंघाकडे वळल्या नाहीत तरच नवल. मराठी मतदारांनी आणि वर्षानुवर्षे मुंबईचे रहिवासी असलेल्या मतदारांनी इथे कायमच शिवसेनेला साथ दिल्याचं पाहायला मिळतं. 2009 ची निवडणूक वगळता 1990 पासूनच्या सहा निवडणुकीत इथे शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे. या मतदारसंघात एकूण 247 मतदान केंद्र आहेत. विद्यमान आमदार - सुनील शिंदे, शिवसेना 1985 साली शिवसेनेचे शाखा उपप्रमुख म्हणून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या सुनील शिंदे यांनी2007 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिर यांना पराभूत करुन ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. काही दिवसांपूर्वीच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिंदे यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे. विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल 1) सुनील शिंदे, शिवसेना : 60,625 2) सचिन अहिर, राष्ट्रवादी : 37,613 3) सुनील राणे, भाजप - 30,849 4) विजय कुडतरकर, मनसे - 8423 5) दत्तात्रय नवघणे, काँग्रेस - 5941 नोटा -1559 मतदानाची टक्केवारी - 55.93 टक्के आदित्य ठाकरे वरळीतून लढणार? ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 ते2014 या काळात सचिन अहिर यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत अहिर यांचा शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी पराभव केला. आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर आदित्य ठाकरेंना शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रमोट केलं जात आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढता यावं यासाठी शिवसेना वरळी विधानसभेतील विरोधक संपवत असल्याची चर्चा आहे. सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश करुन वरळी विधानसभा एक हाती कशी जिंकता येईल यावर शिवसेनेचा भर आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याबदल्यात सचिन अहिर यांना विधानपरिषद दिली जाऊ शकते अशीही शक्यता आहे. मात्र असं असलं तरी विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचं पुनर्वसन कसं आणि कुठे करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघांची चाचपणी गेल्या वर्षभरापासून आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. जोगेश्वरी,ते स्वतः राहात असलेला वांद्रे पूर्व इथला खेरवाडी,माहीम, वरळी आणि शिवडी या मतदारसंघाचा प्रामुख्याने विचार झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीनंतर वरळी आणि माहीम या दोन मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. वरळीत सुनील शिंदे आणि माहिममध्ये सदा सरवणकर हे पक्षाचे आमदार आहेत. विद्यमान आमदार सुनील शिंदे नाराज सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशामुळे वरळीचे आमदार सुनील शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जातं. कोणाचा प्रवेश होतोय हे मला माहित नाही पण पुढचा वरळीचा आमदार मीच असेन, असं सूचक विधान त्यांनी अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी केलं होतं. त्यामुळे सचिन अहिर यांचा शिवसेनेतील प्रवास तितका सोपा असणार नाही. सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश का? 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुनील शिंदे यांनीच सचिन अहिर यांचा वरळी विधानसभा मतदारसंघातील विजयरथ रोखला होता. 2009साली मतदारसंघ फेररचनेनंतर वरळीमध्ये विधानसभा मतदारसंघात काही बदल झाले. त्यानंतर तिथे शिवसेनेची ताकद वाढली. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीतही मनसेचे उमेदवार संजय जामदार यांच्यामुळे सचिन अहिर निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर यांनी मंत्रिपदापासून पक्षात विविध पदं भूषवली असली तरी, ते ज्या मतदारसंघात राहतात तिथे शिवसेनेची ताकद आहे. हेच शिवसेनाप्रवेशामागे कारण असू शकते. यंदा विधानसभेला संधी मिळाली नाही तरी भविष्यात त्यांना वरळीतून तिकीट मिळू शकते. विधानसभा निवडणूक 2009 चा निकाल सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस : 52,398 आशिष चेंबुरकर, शिवसेना : 47,104 संजय जामदार, मनसे : 32,542 बीबीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प आणि कोस्टल रोडला विरोध बीबीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प आणि कोस्टल रोडला  मच्छिमारांचा विरोध हे इथले महत्त्वाचे प्रश्न आहेत. शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या प्रकल्पाला वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांचा विरोध कायम आहे. कोस्टल रोड झाल्यास मच्छिमारांसाठी समस्या निर्माण होतील, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मागच्या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचाही निर्णय घेतला होता. त्यामुळे तीच टांगती तलवार विधानसभा निवडणुकीवरही आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा नारळ फोडला खरा, पण पुढे काहीच झालेलं नाही. शिवाय आदित्य ठाकरेंनी वरळी, शिवडीतील बीडीडी चाळीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारसंघ शिवसेनेचाच, पण उमेदवार कोण? गड शिवसेनेचा असला तरी उमेदवार कोण हा पेच पक्षासमोर कायम आहे. विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचा पत्ता कट करुन नव्याने दाखल झालेले सचिन अहिर यांना तिकीट देणार की युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे इथून लढवणार याची उत्सुकता इथल्या मतदारांनाही लागली आहे. मात्र स्थानिक असलेल्या सचिन अहिर यांच्या नावावर मतदान करणारे वरळीकर आदित्य ठाकरेंना उमेदवार म्हणून कितपत स्वीकारतील हा देखील प्रश्न आहेच.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget