एक्स्प्लोर

औरंगाबाद मध्य मतदारसंघ | शिवसेना-भाजप विरुद्ध एमआयएम, वंचित बहुजन आघाडी अशी थेट लढाई

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघ हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित मतदारसंघापैकी हा एक मतदार संघ असेल हे नक्की. जो कोणी विरोधकांच्या मतांचे विभाजन करण्यात यशस्वी होईल तोच या मतदार संघातुन मतदारसंघातून बाजी मारेल असे सध्याचे चित्र आहे.

औरंगाबाद शहरातील आणखी एक विधानसभा मतदार संघ म्हणजे औरंगाबाद मध्य मतदारसंघ. 2014 च्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ सगळ्या राज्यात चर्चिला गेला त्याचं कारण या मतदारसंघातून मराठवाड्यातला एमआयएमला पहिला आमदार मिळाला. इम्तियाज जलील यांनी या मतदारसंघात शिवसेना-भाजपचा पराभव केला. या मतदारसंघाची रचना पाहता मुस्लिम दलित आणि हिंदू मतदारांची संख्या पाहता हिंदू मतदारांची संख्या अधिक आहे. मात्र गत निवडणुकीमध्ये हे शिवसेना भाजपा वेगळी लढली आणि सहाजिकच मतांच्या विभाजनाचा फायदा इम्तियाज यांना झाल्याचं पाहायला मिळालं .याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले इम्तियाज जलील हे सध्या औरंगाबादचे खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून एमआयएमच्या इच्छुकांची यादी मोठी आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघ | शिवसेना-भाजप विरुद्ध एमआयएम, वंचित बहुजन आघाडी अशी थेट लढाई एमआयएमकडून अतिक मोतीवाला, जावेद कुरेशी, फिरोज खान पटेल, मैफूजुर रहमान, डॉक्टर शमीन रिझवी, समीर साजिद आणि नाशेर कुरेशी यांच्यासह डझनभर नेत्यांची नावं आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढल्याने वंचित बहुजन आघाडी कडून या मतदारसंघांमध्ये अमित भुईगळ ही लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये रस्सीखेच झालेली पाहायला मिळू शकते. औरंगाबाद मध्य मतदारसंघ | शिवसेना-भाजप विरुद्ध एमआयएम, वंचित बहुजन आघाडी अशी थेट लढाई 2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपच्या दोनही उमेदवाराला मिळालेली मते जर एकत्रित केली तर इम्तियाज जलील यांना मिळालेल्या मतांपेक्षा ती वीस हजारांहून अधिक आहेत.  या निवडणुकीमध्ये हे शिवसेना-भाजपा जरी एकत्र लढली तरीदेखील वंचित बहुजन आघाडी चा फटका मध्येच या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल यांनी निवडणूक लढवली होती तर भाजपाकडून किशनचंद तनवाणी यांनी नशीब आजमावलं होतं .शिवसेना भाजपाच्या युतीच्या जुन्या फॉर्म्युल्यात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येतो. गत निवडणुकीमध्ये शिवसेनेला भाजपापेक्षा 2000 मतं अधिक आहेत त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील असा दावा केला जातोय. शिवसेनेकडून देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात अनेकांना निवडणूक लढवायची आहे . ज्यामध्ये हे माजी आमदार प्रदीप जैस्वाल, बंडू ओक , राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात ,महापौर नंदकुमार घोडेले ,विकास जैन यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपा देखील हा मतदार संघ स्वतःकडे मिळवण्यासाठीचे प्रयत्न निश्चित करेल. गत निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढली होती .काँग्रेस कडून एम .एम .शेख तर राष्ट्रवादीकडून विनोद पाटील यांनी नी की निवडणूक लढवली होती मात्र दोघांनाही पंधरा हजारापेक्षा कमी मतं मिळाली आणि त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं . या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता अधिक आहे. असलं तरी या मतदारसंघातूनही काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवार शोधावाच लागेल.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कसे होते चित्र

इम्तियाज जलील (एमआयएम) : 61 हजार 843 मते प्रदीप जयस्वाल (शिवसेना) : 41 हजार 861  किशनचंद तनवाणी (भाजप)  : 40 हजार 770 मत विनोद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)  : 11 हजार 842 मत

लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती मते ?

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना या मतदारसंघातून 99 हजार 450 मते मिळाली होती. तर शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना 50 हजार 327 मतं मिळाली होती. तसेच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 30 हजार 210 मतं मिळाली होती.

लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तरी इम्तियाज जलील यांना मिळालेली मते एकोणवीस हजाराने अधिक आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तनवाणी आणि जैस्वाल यांना मिळालेली मतंही लोकसभेमध्ये हर्षवर्धन आणि चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मतांएवढीच आहेत. त्यामुळेच या मतदारसंघातून लढण्यासाठी एमआयएमचे अनेक नेते इच्छुक आहेत. तर दुसरीकडे याच मतांमुळे वंचित बहुजन आघाडीला देखील हा मतदारसंघ एमआयएमने वंचित साठी सोडावा असे वाटते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून शिवसेना-भाजप विरुद्ध एम आय एम, वंचित बहुजन आघाडी अशी थेट लढाई झालेली पाहायला मिळेल. जो कोणी विरोधकांच्या मतांचे विभाजन करण्यात यशस्वी होईल तोच या मतदार संघातुन मतदारसंघातून बाजी मारेल असे सध्याचे चित्र आहे.  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित मतदारसंघापैकी हा एक मतदार संघ असेल हे मात्र नक्की.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकवेळ भाजपचा विचार करु मात्र राष्ट्रवादीला जागा नाही, शिवसेना आमदार आक्रमक, तटकरेंवर हल्लाबोल 
एकवेळ भाजपचा विचार करु मात्र राष्ट्रवादीला जागा नाही, शिवसेना आमदार आक्रमक, तटकरेंवर हल्लाबोल 
Vidhanparishad Election : सोलापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल, भाजपची ताकद असतानाही शिंदे सेनेचा नेता निवडणूक लढवणार?
Vidhanparishad Election : सोलापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल, भाजपची ताकद असतानाही शिंदे सेनेचा नेता निवडणूक लढवणार?
कोकणातील जागा राष्ट्रवादीला देण्यास शिवसेनेचा नकार, आमदार महेंद्र दळवींची कन्या निवडणुकीच्या रिंगणात
कोकणातील जागा राष्ट्रवादीला देण्यास शिवसेनेचा नकार, आमदार महेंद्र दळवींची कन्या निवडणुकीच्या रिंगणात
Sunil Tatkare : सुनील तटकरेंची पुत्रासाठी मोर्चेबांधणी, विधान परिषदेच्या जागावाटपाआधीच सुतारवाडीत महत्त्वाची बैठक
सुनील तटकरेंची पुत्रासाठी मोर्चेबांधणी, विधान परिषदेच्या जागावाटपाआधीच सुतारवाडीत महत्त्वाची बैठक

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget