एक्स्प्लोर

महाआघाडीचा तिढा सुटला, पाहा कुणाला किती जागा मिळाल्या?

महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चार पैकी दोन जागा दिल्या आहेत. तरीही त्या दोन जागांचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तरी सांगली, अकोल्यापैकी एक जागा स्वाभिमानीला मिळणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई : अखेर राज्यातल्या महाआघाडीचं चित्र अखेर स्पष्ट झाल आहे. 48 पैकी 24 जागांवर काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर दोन्ही पक्षांनी 4 जागा आपल्या सहयोगी पक्षांना देण्यात आली आहेत. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमानी या पक्षांचा समावेश आहे. महाआघाडीत पक्ष आणि संघटना मिळून एकूण 56 जण आहेत. मुंबईत आयोजीत महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. मात्र या पत्रकार परिषदेला राधाकृष्ण विखे-पाटलांनी गैरहजेरी लावली आहे महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चार पैकी दोन जागा दिल्या आहेत. तरीही त्या दोन जागांचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तरी सांगली, अकोल्यापैकी एक जागा स्वाभिमानीला मिळणार असल्याची चर्चा आहे. तर बहुजन विकास आघाडीला पालघरची एक जागा सोडण्यात आली आहे. तर युवा स्वाभिमानीला अमरावतीची एक जागा महाआघाडीतून देण्यात आली आहे. भाजपकडून साम दाम दंड भेदाचं राजकारण : अशोक चव्हाण सार्वत्रीक निवडणुकांसांठी या महाआघाडीत आणखीण काही पक्षांनी सामील व्हाव पण भाजपकडून साम दाम दंड भेदाचं राजकारण करण्यात येतं आहे. त्याला काही पक्ष बळी पडत असल्याची टिका अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच भाजप भेदाचं राजकारण करतं मतांमध्ये फूट पाडायचा प्रयत्नसुद्दा केला जात आहे. भाजप-शिवसेना यांसारख्या धर्मांद पक्षांना जनता या वेळी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. भाजप-शिवसेनेने गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. खोटी आश्वासनं, खोट्या घोषणा देऊन जनतेचा विश्वास घात केला आहे. तर देशातील राजकीय व्यवस्थेला उद्धवस्त करण्याचं काम यांनी केलं असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. VIDEO | अखेर राज्यातल्या महाआघाडीचं चित्र अखेर स्पष्ट | मुंबई | एबीपी माझा  देशाचे पंतप्रधान गुपचूप पाकिस्तनाचा पंतप्रधान शुभेच्छा : जयंत पाटील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुपचूप पाकिस्तनाच्यी पंतप्रधानांना शुभेच्छा देतात अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. नरेंद्र मोदींची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. तसेच महाआघाडीत स्वाभिमानी संघटना आमच्याबरोबर आली आहे. आता आम्ही आणखीन ताकदीने निवडणूक लढवू असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. जे महाघाडीत आले नाही ते भाजपचे बी टीम : अजित पवार महाआघाडीच्या चर्चा करताना अनेकदा काहींनी टोकची भूमिका घेतली. काही न काही कारण सांगून महाआघाडी होऊ नये म्हणून भूमिका घेतली. त्यांना भाजप आणि शिवसेनेला फायदा करून घ्यायचा होता. पण सगळ्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन आम्ही एकत्र आलो आहेत. पण जे महाघाडीत आले नाही ते भाजपचे बी टीम असल्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. भाजपत  सगळं चांगलं होत तर बाहेरून लोक का घेतली? तोडफोडाचं राजकारण का केलं? असा सवाल अजित पवार केला आहे. मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीसोबत असलेल्या पक्षांची माहिती दिली. त्यानंतर, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील युती सरकारवर टीका केली. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह महाआघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थित होते. राज्यातील महाआघाडी चित्र कसं असेल? काँग्रेस 24 राष्ट्रवादी 20 स्वाभिमानी शेतकरी 2 बहुजन विकास आघाडी 1 युवा स्वाभिमानी 1 VIDEO | माझं पक्षात कुणीही ऐकत नाही, अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत? | एबीपी माझा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
West Bengal Elections : बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरच वाढ होणार का? सरकारनं दिली महत्वाची माहिती 
निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरच वाढ होणार का? सरकारनं दिली महत्वाची माहिती 

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
Sambhajiraje On Bageshwar Baba Special Report : छत्रपती संभाजीराजे छत्रपतींची बागेश्वर बाबांवर टीका
Manohar Mama Special Report : करमाळ्याचा खरात, भोंदूबाबांकडून फसवणूक आणि अत्याचार
Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
Heat Wave Special Report : रेकॉर्डब्रेक रखरखाट, रस्त्यावर शुकशुकाट, विदर्भ उन्हाने भाजून निघाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तरी सुद्धा गद्दारी केलात, लग्न सुद्धा आपने खासदार केल्यानं झालं नाही, तर कोण विचारलं तरी असतं का तुम्हाला?' राघव चड्ढांवर इतकं कोण भडकलं??
'तरी सुद्धा गद्दारी केलात, लग्न सुद्धा आपने खासदार केल्यानं झालं नाही, तर कोण विचारलं तरी असतं का तुम्हाला?' राघव चड्ढांवर इतकं कोण भडकलं??
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi मोठी बातमी: मराठीवरुन माघार नाही, प्रताप सरनाईक ठाम, रिक्षा-टॅक्सीचालकांच्या बैठकीत काय ठरलं?
मोठी बातमी: मराठीवरुन माघार नाही, प्रताप सरनाईक ठाम, रिक्षा-टॅक्सीचालकांच्या बैठकीत काय ठरलं?
Mamata banerjee : निवडणुकांतील भाषणात जातीवाचक शब्दाचा वापर; आयोगाची ममता बॅनर्जींना नोटीस, तीन दिवसांत अहवालाचे निर्देश
निवडणुकांतील भाषणात जातीवाचक शब्दाचा वापर; आयोगाची ममता बॅनर्जींना नोटीस, तीन दिवसांत अहवालाचे निर्देश
Gold Silver Rate: सोने चांदीच्या दरवाढीच्या वेगाला ब्रेक, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरवाढीच्या वेगाला ब्रेक, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा, जाणून घ्या नवे दर
तुटलेलं लग्न जुळवून देतो म्हणत भोंदूबाबाने फसवले, पूजेचा घाट अन् महिलेवर लैंगिक अत्याचार; दोघांना अटक
तुटलेलं लग्न जुळवून देतो म्हणत भोंदूबाबाने फसवले, पूजेचा घाट अन् महिलेवर लैंगिक अत्याचार; दोघांना अटक
बंगालमध्ये भर निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाची सुद्धा राज्यव्यापी छापेमारी! पोलिस अधिकाऱ्यांना सूद्धा सूचना
बंगालमध्ये भर निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाची सुद्धा राज्यव्यापी छापेमारी! पोलिस अधिकाऱ्यांना सूद्धा सूचना
मुंबईतील 'केईएम'च्या नामांतरास ठाकरेंच्या दोन आमदारांचा विरोध, मंत्र्यांवर निशाणा; आता, मंगलप्रभात लोढांचा पलटवार
मुंबईतील 'केईएम'च्या नामांतरास ठाकरेंच्या दोन आमदारांचा विरोध, मंत्र्यांवर निशाणा; आता, मंगलप्रभात लोढांचा पलटवार
Raghav Chadha: आप सोडल्यानंतर तीन पर्याय, पण भाजपचीच निवड का? राघव चढ्ढांनी स्वत: कारण सांगितलं
आप सोडल्यानंतर तीन पर्याय, पण भाजपचीच निवड का? राघव चढ्ढांनी स्वत: कारण सांगितलं
Embed widget